शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना पक्ष, चिन्हाचा खटला पुन्हा लांबणीवर; अंतिम सुनावणीसाठी पुढील तारीख, कोर्टात आज काय घडलं?
2
भारत डिजिटल तंत्रज्ञानाचा 'पॉवरहाऊस', ‘Make in India’ची खिल्ली उडवणाऱ्यांना PM मोदींचे उत्तर
3
Google भारतात करणार ८८,७०० कोटींची गुंतवणूक, 'या' राज्यात उभं राहणार आशियातील सर्वात मोठं डेटा सेंटर
4
म्यानमारमध्ये धार्मिक कार्यक्रमादरम्यान पॅराग्लायडरने बॉम्ब हल्ला; २४ जणांचा मृत्यू, ४७ जखमी
5
Nashik Crime: कंटाळलो होतो म्हणून आईची हत्या केली, पोटच्या मुलानेच घेतला जीव; पोलिसही हादरले
6
अक्कलकोट हेच गाणगापूर! स्वामी देतात नृसिंह सरस्वती स्वरुपात दर्शन, पुजारी होतात नतमस्तक
7
सैफ अली खानची एक्स पत्नी अमृता सिंहसोबत कसं होतं नातं? बहीण सोहा म्हणाली, "आम्ही दोघी..."
8
भारत-पाकिस्तान यांच्यात पुन्हा युद्धाचे सावट?; पाक संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांची पोकळ धमकी
9
८४ वर्षांनी नवपंचम नीचभंग राजयोग: ८ राशींचे कल्याण, सरकारी लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, शुभ-मंगल!
10
धक्कादायक! राजस्थानमध्ये प्राणघातक गोळ्या! नमुने फेल झाले होते तरीही हजारो गोळ्या विकल्या
11
सोने-चांदीच्या किमतीचा फुगा फुटणार? भाव ₹१.२२ लाखांवरून थेट ₹७७,७०० पर्यंत कोसळणार? कोणी दिला इशारा
12
टाटा कॅपिटल आणि एलजी इलेक्ट्रॉनिक्सच्या IPO मध्ये चढाओढ; कोणाची किती मागणी, तुम्ही गुंतवणूक केलीये का?
13
वस्ताद द्रविडचं नाव घेत रोहित शर्मानं ठोकला गंभीरविरोधात शड्डू! शेअर केली यशामागची खरी गोष्ट
14
भारतात येणासाठी फ्लाइटमध्ये प्रवेश करताच ब्रिटिश PM स्टार्मर म्हणाले, 'मी तुमचा पंतप्रधान बोलतोय...!'; जाणून घ्या नेमकं काय घडलं
15
VIRAL : ७ वर्षांपूर्वी झोमॅटोवर किती रुपयांना मिळायचा पनीर टिक्का? बील होतंय व्हायरल; आकडा पाहून विश्वासच बसणार नाही!
16
"नवरा मेल्याचा पश्चाताप नाही, ४ मुलांच्या मृत्यूचं दुःख"; काय म्हणाली बॉयफ्रेंडसोबत पळालेली महिला?
17
मुंबईत दाऊदच्या जवळच्या माणसाभोवती ईडीने फास आवळला, सलीम डोलाच्या ८ ठिकाणांवर धाडी
18
आता चष्म्याद्वारेही UPI पेमेंट करता येणार; मोबाईल फोनची गरजच भासणार नाही, पाहा डिटेल्स
19
'खेलने का बहुत शॉक था उसे, फिर मैने भी सिखा दिया...!' निक्की तांबोळीचा धनश्री वर्मावर निशाणा
20
Cough Syrup : पालकांनो अलर्ट! लहान मुलांना कधी, कसं, किती द्यावं कफ सिरप? AIIMS च्या डॉक्टरांचा मोलाचा सल्ला

महाराष्ट्राच्या आराध्यदैवताचा प्रशासनाला विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:14 IST

ग्रामपंचायत, तलाठी कार्यालयात कागदावरच जयंती, ग्रामसेवक, तलाठी यांनी मारल्या दांड्या धामणगाव रेल्वे : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती ...

ग्रामपंचायत, तलाठी कार्यालयात कागदावरच जयंती, ग्रामसेवक, तलाठी यांनी मारल्या दांड्या

धामणगाव रेल्वे : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा तालुक्यातील ग्रामपंचायती व तलाठी कार्यालयांना विसर पडला. १९ फेब्रुवारी रोजी या कार्यालयांमध्ये केवळ कागदावरच जयंती साजरी करण्यात आली असल्याची तक्रार जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षांनी राज्य शासन व जिल्हा केली आहे.

राज्यभरात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात पार पडली. कोविड-१९ च्या काळात हा कार्यक्रम कशा पद्धतीने आयोजित करायचा, याबाबतीत जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी परिपत्रक काढून सर्व विभागप्रमुखांना सूचना दिल्या होत्या. स्वच्छता अभियानासारखे उपक्रम गावोगावी राबविण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व ग्रामपंचायत व महसूल विभागाला दिले होते. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती महापुरुष जयंतीच्या यादीत असतांना ग्रामपंचायत, शाळा, तलाठी कार्यालयांमध्ये ही जयंती साजरी करण्यात आली नाही. धामणगाव रेल्वे तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतींमधील ग्रामसेवक तसेच तलाठी जयंतीला कार्यालयात आलेच नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. प्रत्येक गावातील शासकीय कार्यालयांच्या प्रमुखांवर आपापल्या मुख्यालयी हजर राहून, कोरोना प्रादुर्भावाच्या काळातील नियमांना अधीन राहून जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्याची जबाबदारी असताना, केवळ कागदोपत्री ही जयंती साजरी करण्यात आली असल्याची तक्रार जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयराव भैसे यांनी जिल्हा परिषद तसेच राज्याच्या ग्रामीण विकास व महसूल खात्याकडे केली आहे. ज्या कार्यालयात ही जयंती साजरी करण्यात आली नाही, त्या संबंधित ग्रामसेवक तथा तलाठी तलाठ्यावर कारवाई करण्याची मागणी भैसे यांनी आपल्या तक्रारीतून राज्य शासनाकडे केली आहे

मी स्वतः अनेक ग्रा.प. सरपंच- उपसरपंचना फोनद्वारे याबाबत चौकशी केली असता ग्रामपंचायत मध्ये सचिवांची तलाठी कार्यालयात तलाठी व शाळांमध्ये मुख्याध्यापकांची गैरहजेरी होतीमहाराष्ट्राच्या आराध्य दैवताच्या जयंतीबाबत अशा प्रकारची अनास्था बाळगणाऱ्या

या संबंधितावर कारवाई होणे गरजेचे आहे

विजय भैसे

माजी जी प अध्यक्ष, अमरावती