शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
2
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
3
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
4
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
5
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
6
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
7
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
8
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
9
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
10
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
11
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
12
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
13
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
14
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
15
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
16
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
17
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
18
अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू
19
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
20
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयाच्या आदेशानंतरही वनकामगारांची फरफट

By admin | Updated: August 3, 2015 00:17 IST

उच्च न्यायालयाने वनकामगारांना सेवेत कायम करण्याचा निर्णय दिल्यानंतरही वनविभाग वनकामगारांना सेवेत कायम करण्यापासून वंचित ठेवत आहेत

कुटुंबासह आत्मदहनाचा इशारा : कायम करण्याची मागणीअमरावती : उच्च न्यायालयाने वनकामगारांना सेवेत कायम करण्याचा निर्णय दिल्यानंतरही वनविभाग वनकामगारांना सेवेत कायम करण्यापासून वंचित ठेवत आहेत. न्यायालयाच्या पायऱ्या झिजवूनदेखील न्याय मिळत नसेल किमान कुटुंबीयांसह आत्मदहन करण्याची परवानगी तरी द्यावी, अशी मागणी अन्यायग्रस्त वनकामगारांनी केली आहे.राज्यस्तरीय वनकामगार, वनमजूर वनरक्षक, वनपाल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अवधूत जांभुळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या पत्रानुसार सन २००० नंतर न्यायालयातून आलेल्या वनकामगारांना सेवेत कायम करण्यासाठी वनविभाग दिरंगाई करीत आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील एक ते दीड हजार वनकामगार कायम होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. १९९९ मध्ये न्यायालयाच्या आदेशानुसार वनकामगार २००४ मध्ये सेवा पूर्ण करतात म्हणून कायम केले. परंतु २००० नंतर कार्यरत वनकामगारांची सेवा शासनाला पाठविण्यात आली नाही. किंबहुना न्यायालयाने सलग सेवा असे आदेश दिल्यानंतरही सदर वनकामगारांची सेवा ग्राह्य धरण्यात आली नाही. त्यामुळे २० वर्षे लढा देणाऱ्या वनकामगारांना वरिष्ठ वनअधिकाऱ्यांनी न्याय दिला नाही, असा आरोप संघटनेचे अध्यक्ष अवधूत जांभुळकर यांनी केला आहे. तसेच बहुतांश जिल्ह्यांमध्ये वनकामगारांचे हजेरी पुस्तक नसल्याने या कामगारांना न्याय मिळू शकला नाही, हे वास्तव आहे. काही जिल्ह्यांमध्ये वनकामगारांचे हजेरी पुस्तकांना उदई लागून नामशेष झाले आहे. कोठे गोदामात ते पाण्याने सडून गेल्याचे चित्र आहे. नियमाप्रमाणे शासकीय दस्तावेज हे ३० वर्षे सांभाळून ठेवणे अनिवार्य आहे. वनकामगारांच्या कॅशबुकमध्ये प्रचंड घोळ करून ठेवण्यात आला आहे. नावात तफावत, बदल अशा प्रकारमुळे कोणत्या वनकामगारांना न्याय मिळेल, ही बाब चिंतणीय आहे. वनविभागाने कर्मचाऱ्यांचे मस्टर व्यवस्थितरीत्या सांभाळून ठेवले नसल्याने याचा फटका वनकामगारांना बसत आहे. न्यायालयाने सलग सेवा, असे आदेश देऊनही वनकामगांराना न्याय मिळत नाही. त्यामुळे अन्यायग्रस्त वनकामगारांना किमान त्यांच्या कुटुंबीयांसह आत्मदहन करण्याची परवानगी द्यावी, असे अवधूत जांभुळकर यांनी पत्राद्वारे शासनाला कळविले आहे. (प्रतिनिधी)वनकामगारांवर अन्याय होत असेल तर तो कसा सहन करायचा? यावर दाद मागण्यासाठी मुख्यमंत्री, वनमंत्री, उच्चन्यायालयात पत्र पाठविण्यात आले आहे. दोन महिन्यांत सदर प्रश्न निकाली निघाला नाही तर आत्मदहन केले जाणार आहे.- अवधूत जांभुळकर, अध्यक्ष, वनकामगार संघटना.