शहरं
Join us  
Trending Stories
1
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालणार; २०७ खासदारांचा पाठिंबा
2
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
3
एक सेकंदात दोन्ही स्विच बंद करणं अशक्य, त्यावेळी नेमकं काय घडलं? या ५ बाबींमधून उघड होणार, अमेरिकन रिपोर्टचं पितळ उघडं पडणार
4
केरळचे माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ माकप नेते व्ही.एस. अच्युतानंदन यांचं निधन, वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
5
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...
6
'आणखी किती पुरावे हवेत ते सांगा'; कोकाटेंचे आणखी व्हिडीओ समोर, आव्हाड म्हणाले, "व्यवस्थित बघा,कुठला पत्ता"
7
महाराष्ट्रानंतर आता बंगालमध्ये 'भाषा' पॉलिटिक्स? ममता बॅनर्जी यांनी उघड-उघड खेळलं 'बांगला कार्ड'!
8
'चायनीज' माल निघाला दगाबाज! बांगलादेशात कॉलेजवर कोसळलेले 'ते' लढाऊ विमान चिनी बनावटीचे
9
Deep Amavasya 2025: रिल्स करण्याच्या नादात चुकीचे पायंडे पाडू नका; दिव्यांची आवस 'अशी' करा!
10
IND vs ENG : 'ऑल इज वेल सीन'! विकेट किपिंगचा सराव करताना दिसला पंत (VIDEO)
11
Sonam Raghuvanshi : सोनमला अजिबात पश्चाताप नाही, कैद्यांसोबत...; जेलमध्ये कशी जगतेय राजाच्या हत्येची मास्टरमाईंड?
12
२३ विद्यार्थिनी-विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार, व्हिडीओही बनवले; वासनांध शिक्षकाचे हादरवून टाकणारे कृत्य
13
वेळीच व्हा सावध! सोमवारीच का असतो हार्ट अटॅकचा सर्वाधिक धोका? 'या' गोष्टी कारणीभूत
14
तुमच्या नावे कोणी बनावट लोन तर घेतलं नाहीये ना? घरबसल्या पॅन कार्डावरुन कसं तपासाल, दिसलं तर काय कराल?
15
७/११तील सर्व दोषी निर्दोष; असदुद्दीन ओवेसी म्हणतात, “गेली १७ वर्षे निष्पाप लोक जेलमध्ये...”
16
“कृषीमंत्री रमीत रमतो, हनीट्रॅपचा फास सत्ताधाऱ्यांच्या गळ्यात, उच्चस्तरीय चौकशी करा”: सपकाळ
17
सचिन पिळगावकरांनी घेतलेली मधुबालाची भेट, म्हणाले, "ती बाई जितकी सुंदर होती त्यापेक्षा १० पटीने..."
18
MBA ग्रॅज्युएट चोर; २० वर्षांत चोरल्या १०० हून अधिक आलिशान गाड्या, असा लागला पोलिसांच्या हाती
19
भारत-पाक मॅच रद्द; आफ्रिदीसोबत गप्पा मारताना दिसल्यामुळे अजय देवगण ट्रोल, जाणून घ्या त्यामागचं सत्य
20
अंबानींच्या आवडत्या कंपनीचा शेअर आपटला; पण, 'या' स्टॉक्समुळे सेन्सेक्स-निफ्टीची दमदार वाढ

न्यायालयाच्या आदेशानंतरही वनकामगारांची फरफट

By admin | Updated: August 3, 2015 00:17 IST

उच्च न्यायालयाने वनकामगारांना सेवेत कायम करण्याचा निर्णय दिल्यानंतरही वनविभाग वनकामगारांना सेवेत कायम करण्यापासून वंचित ठेवत आहेत

कुटुंबासह आत्मदहनाचा इशारा : कायम करण्याची मागणीअमरावती : उच्च न्यायालयाने वनकामगारांना सेवेत कायम करण्याचा निर्णय दिल्यानंतरही वनविभाग वनकामगारांना सेवेत कायम करण्यापासून वंचित ठेवत आहेत. न्यायालयाच्या पायऱ्या झिजवूनदेखील न्याय मिळत नसेल किमान कुटुंबीयांसह आत्मदहन करण्याची परवानगी तरी द्यावी, अशी मागणी अन्यायग्रस्त वनकामगारांनी केली आहे.राज्यस्तरीय वनकामगार, वनमजूर वनरक्षक, वनपाल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अवधूत जांभुळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या पत्रानुसार सन २००० नंतर न्यायालयातून आलेल्या वनकामगारांना सेवेत कायम करण्यासाठी वनविभाग दिरंगाई करीत आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील एक ते दीड हजार वनकामगार कायम होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. १९९९ मध्ये न्यायालयाच्या आदेशानुसार वनकामगार २००४ मध्ये सेवा पूर्ण करतात म्हणून कायम केले. परंतु २००० नंतर कार्यरत वनकामगारांची सेवा शासनाला पाठविण्यात आली नाही. किंबहुना न्यायालयाने सलग सेवा असे आदेश दिल्यानंतरही सदर वनकामगारांची सेवा ग्राह्य धरण्यात आली नाही. त्यामुळे २० वर्षे लढा देणाऱ्या वनकामगारांना वरिष्ठ वनअधिकाऱ्यांनी न्याय दिला नाही, असा आरोप संघटनेचे अध्यक्ष अवधूत जांभुळकर यांनी केला आहे. तसेच बहुतांश जिल्ह्यांमध्ये वनकामगारांचे हजेरी पुस्तक नसल्याने या कामगारांना न्याय मिळू शकला नाही, हे वास्तव आहे. काही जिल्ह्यांमध्ये वनकामगारांचे हजेरी पुस्तकांना उदई लागून नामशेष झाले आहे. कोठे गोदामात ते पाण्याने सडून गेल्याचे चित्र आहे. नियमाप्रमाणे शासकीय दस्तावेज हे ३० वर्षे सांभाळून ठेवणे अनिवार्य आहे. वनकामगारांच्या कॅशबुकमध्ये प्रचंड घोळ करून ठेवण्यात आला आहे. नावात तफावत, बदल अशा प्रकारमुळे कोणत्या वनकामगारांना न्याय मिळेल, ही बाब चिंतणीय आहे. वनविभागाने कर्मचाऱ्यांचे मस्टर व्यवस्थितरीत्या सांभाळून ठेवले नसल्याने याचा फटका वनकामगारांना बसत आहे. न्यायालयाने सलग सेवा, असे आदेश देऊनही वनकामगांराना न्याय मिळत नाही. त्यामुळे अन्यायग्रस्त वनकामगारांना किमान त्यांच्या कुटुंबीयांसह आत्मदहन करण्याची परवानगी द्यावी, असे अवधूत जांभुळकर यांनी पत्राद्वारे शासनाला कळविले आहे. (प्रतिनिधी)वनकामगारांवर अन्याय होत असेल तर तो कसा सहन करायचा? यावर दाद मागण्यासाठी मुख्यमंत्री, वनमंत्री, उच्चन्यायालयात पत्र पाठविण्यात आले आहे. दोन महिन्यांत सदर प्रश्न निकाली निघाला नाही तर आत्मदहन केले जाणार आहे.- अवधूत जांभुळकर, अध्यक्ष, वनकामगार संघटना.