शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
4
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
5
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
6
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
7
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
8
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
9
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
10
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
11
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
12
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
13
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
14
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
15
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
16
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
17
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
18
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
19
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक

सरळसेवेच्या वनक्षेत्रपाल, सहायक वनसंरक्षकांनी लावला चुना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 17:43 IST

वनविभागात सरळसेवेतील वनक्षेत्रपाल (आरएफओ), सहायक वनसंरक्षक (एसीएफ) यांनी निवड भरतीनुसार बंधपत्राचा भंग केल्यानंतरही त्यांच्याकडून करारानुसार रक्कम वसूल करण्यात आली नाही.

 - गणेश वासनिक 

अमरावती - वनविभागात सरळसेवेतील वनक्षेत्रपाल (आरएफओ), सहायक वनसंरक्षक (एसीएफ) यांनी निवड भरतीनुसार बंधपत्राचा भंग केल्यानंतरही त्यांच्याकडून करारानुसार रक्कम वसूल करण्यात आली नाही. ही संख्या शेकडोच्या घरात असताना शासनाचा बुडीत महसूल वसूल करण्यासाठी वरिष्ठ वनाधिका-यांनी पुढाकार घेतला नाही, हे विशेष.सन १९७६ पासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सहायक वनसंरक्षक वर्ग २ ची पदे आता वर्ग १ ची झाली आहेत. सन १९९० पासून वर्ग २ च्या पदांसाठी उमेदवारांची निवड भरती नियमानुसार केली जाते. सदर उमेदवारांची निवड झाल्यानंतर त्यांना प्रशिक्षणासाठी पाठविण्यापूर्वी राज्य सरकारचे त्या उमेदवारास पाच वर्षे सेवा करण्याचे बंधपत्र देण्याचे करारानुसार बंधनकारक आहे. या पत्रातील शर्र्थींचा भंग केल्यास अथवा मध्येच सेवा सोडून गेल्यास प्रशिक्षणावर झालेला पूर्ण खर्च व उर्वरित पाच वर्षांपेक्षा कमी कालावधीत उमेदवारांवर खर्च केलेली रक्कम वसूल करणे बंधनकारक आहे. मात्र, गत ३५ वर्षांत सरळसेवेतील आरएफओ, एसीएफ यांनी वनविभागाची सेवा सोडून आयएएस, आयएफएस, आयपीएस, डीवायएसपी, जिल्हा निबंधक, तहसीलदार अशा विविध पदांवर त्यांची वर्णी लागली आहे. वनविभागाची सेवा सोडून गेलेल्या अशा उमेदवारांकडून बंधपत्रातील करारानुसार प्रधान मुख्यवनसंरक्षक, प्रादेशिक मुख्य वनसंरक्षकांनी एकही रूपया वसूल केला नाही. त्यामुळे वनविभागात वरिष्ठांकडूनच नियमांचे पालन होत नसेल तर कनिष्ठ वनकर्मचाºयांकडून काय अपेक्षा करावी, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

सरळसेवेतील आरएफओ, एसीएफ यांनी केला भंगवनविभागात सरळेसेवेत सहायक वनसंरक्षकपदी रूजू झालेत. मात्र, कालावधी पूर्ण न करता मध्येच दुसरीकडे नोकरी स्वीकारल्यास बंधपत्रातील तरतुदींनुसार भंग केल्याची नोंद आहे. यात सरळसेवेतील सहायक वनसंरक्षक शेषराव पाटील, चंद्रकांत खाडे, एस.के. सिसोदीया, अशोक रामटेके, एस.बी. गायकवाड तर वनक्षेत्रपाल म्हणून डी. गुजेला, रामचंद्र पोळे, संभाजी गवई, वडतकर, सैंगदाने, कुळकर्णी, भालेकर आदींचा समावेश आहे.

प्रधान वनसचिवांकडून आदेशाची प्रतीक्षासरळसेवेचे आरएफओ, एसीएफ यांनी करारानुसार भंग केल्याप्रकरणी १९८४ पासून त्यांच्यावर राज्य शासनाने खर्च केलेली रक्कम बंधपत्रातील तरतुदीनुसार कोणीही वसूल केलेली नाही. हा सरळसरळ शासन तिजोरीवर डल्ला मारण्याचा प्रकार आहे. तथापि, ज्यांनी करारानुसार बंधपत्राचे अटींचे पालन केले नाही, अशा अधिकाºयांकडून व्याजाच्या रक्कमेसह पैसे वसूल करण्यासाठी प्रधान वनसचिवांनी आदेश पारित करावे, अशी प्रतीक्षा आहे.

टॅग्स :forestजंगलforest departmentवनविभागAmravatiअमरावती