शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
2
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
3
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
5
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
6
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
7
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
8
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
9
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
10
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
11
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
12
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
13
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
14
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
15
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
16
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
17
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
18
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
19
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
20
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त

सरळसेवेच्या वनक्षेत्रपाल, सहायक वनसंरक्षकांनी लावला चुना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 17:43 IST

वनविभागात सरळसेवेतील वनक्षेत्रपाल (आरएफओ), सहायक वनसंरक्षक (एसीएफ) यांनी निवड भरतीनुसार बंधपत्राचा भंग केल्यानंतरही त्यांच्याकडून करारानुसार रक्कम वसूल करण्यात आली नाही.

 - गणेश वासनिक 

अमरावती - वनविभागात सरळसेवेतील वनक्षेत्रपाल (आरएफओ), सहायक वनसंरक्षक (एसीएफ) यांनी निवड भरतीनुसार बंधपत्राचा भंग केल्यानंतरही त्यांच्याकडून करारानुसार रक्कम वसूल करण्यात आली नाही. ही संख्या शेकडोच्या घरात असताना शासनाचा बुडीत महसूल वसूल करण्यासाठी वरिष्ठ वनाधिका-यांनी पुढाकार घेतला नाही, हे विशेष.सन १९७६ पासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सहायक वनसंरक्षक वर्ग २ ची पदे आता वर्ग १ ची झाली आहेत. सन १९९० पासून वर्ग २ च्या पदांसाठी उमेदवारांची निवड भरती नियमानुसार केली जाते. सदर उमेदवारांची निवड झाल्यानंतर त्यांना प्रशिक्षणासाठी पाठविण्यापूर्वी राज्य सरकारचे त्या उमेदवारास पाच वर्षे सेवा करण्याचे बंधपत्र देण्याचे करारानुसार बंधनकारक आहे. या पत्रातील शर्र्थींचा भंग केल्यास अथवा मध्येच सेवा सोडून गेल्यास प्रशिक्षणावर झालेला पूर्ण खर्च व उर्वरित पाच वर्षांपेक्षा कमी कालावधीत उमेदवारांवर खर्च केलेली रक्कम वसूल करणे बंधनकारक आहे. मात्र, गत ३५ वर्षांत सरळसेवेतील आरएफओ, एसीएफ यांनी वनविभागाची सेवा सोडून आयएएस, आयएफएस, आयपीएस, डीवायएसपी, जिल्हा निबंधक, तहसीलदार अशा विविध पदांवर त्यांची वर्णी लागली आहे. वनविभागाची सेवा सोडून गेलेल्या अशा उमेदवारांकडून बंधपत्रातील करारानुसार प्रधान मुख्यवनसंरक्षक, प्रादेशिक मुख्य वनसंरक्षकांनी एकही रूपया वसूल केला नाही. त्यामुळे वनविभागात वरिष्ठांकडूनच नियमांचे पालन होत नसेल तर कनिष्ठ वनकर्मचाºयांकडून काय अपेक्षा करावी, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

सरळसेवेतील आरएफओ, एसीएफ यांनी केला भंगवनविभागात सरळेसेवेत सहायक वनसंरक्षकपदी रूजू झालेत. मात्र, कालावधी पूर्ण न करता मध्येच दुसरीकडे नोकरी स्वीकारल्यास बंधपत्रातील तरतुदींनुसार भंग केल्याची नोंद आहे. यात सरळसेवेतील सहायक वनसंरक्षक शेषराव पाटील, चंद्रकांत खाडे, एस.के. सिसोदीया, अशोक रामटेके, एस.बी. गायकवाड तर वनक्षेत्रपाल म्हणून डी. गुजेला, रामचंद्र पोळे, संभाजी गवई, वडतकर, सैंगदाने, कुळकर्णी, भालेकर आदींचा समावेश आहे.

प्रधान वनसचिवांकडून आदेशाची प्रतीक्षासरळसेवेचे आरएफओ, एसीएफ यांनी करारानुसार भंग केल्याप्रकरणी १९८४ पासून त्यांच्यावर राज्य शासनाने खर्च केलेली रक्कम बंधपत्रातील तरतुदीनुसार कोणीही वसूल केलेली नाही. हा सरळसरळ शासन तिजोरीवर डल्ला मारण्याचा प्रकार आहे. तथापि, ज्यांनी करारानुसार बंधपत्राचे अटींचे पालन केले नाही, अशा अधिकाºयांकडून व्याजाच्या रक्कमेसह पैसे वसूल करण्यासाठी प्रधान वनसचिवांनी आदेश पारित करावे, अशी प्रतीक्षा आहे.

टॅग्स :forestजंगलforest departmentवनविभागAmravatiअमरावती