शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

वऱ्हाडातील १९ लाख नागरिकांना अन्न सुरक्षेचा लाभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2018 22:24 IST

केंद्र शासनाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा संमत केल्याने राज्यात त्याची अंमलबजावणी होत आहे. राज्यात सात कोटी, तर पश्चिम विदर्भात १९.३९ लाख नागरिकांना सवलतीच्या दरात अन्न सुरक्षा मिळत आहे. 

अमरावती - केंद्र शासनाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा संमत केल्याने राज्यात त्याची अंमलबजावणी होत आहे. राज्यात सात कोटी, तर पश्चिम विदर्भात १९.३९ लाख नागरिकांना सवलतीच्या दरात अन्न सुरक्षा मिळत आहे. 

राज्यात ग्रामीण भागात ५५ टक्के तर शहरी भागातील ४५ टक्के जनतेला या योजनेंतर्गत हक्काचे धान्य मिळत आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत अमरावती विभागातील एपीएल (केशरी) कार्डधारक व शेतकरी लाभार्थी अशा एकूण १९ लक्ष ३९ हजार ५५५ लाभार्थी आहेत. त्यांना ६ हजार ७५० मेट्रिक टन गहू आणि २ हजार ९४८ मे.टन तांदूळ असे एकूण ९ हजार ६९८ मे.टन धान्याचे वितरण करण्यात आले.या कायद्याच्या अंमलबजावणीकरिता प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाºयांना जिल्हा तक्रार निवारण अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. लाभार्थींना धान्य मिळाले नसल्यास तक्रारीची सुनावणी घेऊन आवश्यक ती कार्यवाही करण्याचे अधिकार त्यांना आहेत. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी उपाययोजना करणे, तसेच जिल्हा तक्रार निवारण अधिकाºयांच्याविरुद्ध अपिलांची सुनावणी घेऊन योग्य निर्णय घेणे इत्यादी कामे या आयोगामार्फत करण्यात येतात.

वर्गवारीनुसार वाटप रेशन धान्य* अमरावती ६ लाख ३ हजार ३३२ लाभार्थ्यांना ३ हजार १७ मे.टन, अकोला २ लाख ५२ हजार ९३० लाभार्थ्यांना १ हजार २६५ मे.टन, वाशिम २ लाख ४६ हजार ९५७ लाभार्थ्यांना १ हजार २३५ मे.टन, बुलडाणा ४ लाख ३१ हजार १२१ लाभार्थ्यांना २ हजार १५५ मे. टन, यवतमाळ ४ लाख ५ हजार २१५ लाभार्थ्यांना २ हजार २६ मे.टन गहू-तांदूळ धान्याचे वितरण करण्यात आले आहे. * अन्न सुरक्षा योजने अंतर्गत अंत्योदय योजनेमध्ये अमरावती विभागातील ४ लाख ४ हजार ५२० कार्डधारकांना ९ हजार ६५१ मे.टन गहू व ४ हजार ५५३ मे. टन तांदूळ असे एकूण १४ हजार २०४ मे.टन धान्याचे वितरण करण्यात आले आहे. अन्न सुरक्षा योजने अंतर्गत प्राधान्य गट योजनेमध्ये अमरावती विभागातील ६ लाख ७२ हजार ८६९ लाभार्थ्यांना ३० हजार ५९० मे.टन धान्याचे वितरण करण्यात आले आहे. 

राज्य शासनाची ही महत्वाकांक्षी योजना आहे. याची प्रभावी अंमलबजावनी अमरावती विभागात सुरू आहे. रेशनकार्डच्या वर्गवारीनुसार विभागात नियमित वितरण सुरू आहे.- रमेश मावस्कर,उपायुक्त (पुरवठा)

टॅग्स :foodअन्नAmravatiअमरावती