शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
6
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
7
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
8
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
9
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
10
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
11
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
12
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
13
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
14
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
15
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
16
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
17
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
18
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
19
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
20
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...

अन्न, प्रशासन विभाग एका कारवाईने काय सिद्ध करणार ?

By admin | Updated: April 24, 2016 23:59 IST

आंबे व केळी पिकविण्यासाठी फळेविक्रेते मोठ्या प्रमाणात कॅल्शियम कार्बाईडचा वापर करताहेत.

अमरावती : आंबे व केळी पिकविण्यासाठी फळेविक्रेते मोठ्या प्रमाणात कॅल्शियम कार्बाईडचा वापर करताहेत. अन्न, प्रशासन विभागाच्या नाकावर टिच्चून हा प्रकार सुरू असतानासुध्दा वर्षभरात अन्न प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कार्बाईड जप्त करून आंबे नष्ट करण्याची एकमेव कारवाई केली. शहरातील १२ लाख लोकांच्या जीविताशी फळेविक्रते दररोज खेळतात. लोकांचा जीव धोक्यात असताना केवळ एखादी कारवाई करून अन्न, प्रशासन विभाग काय सिध्द करणार, असा सवाल जनता उपस्थित करीत आहे. 'लोकमत'ने १२ दिवसांपूर्वी फळविक्रेत्यांनी चालविलेल्या या घातक प्रकाराचे सचित्र वृत्त प्रकाशित केले होते. आंबे तातडीने पिकविण्यासाठी फळविक्रेत्यांकडून ईथेलिन गॅसचा वापरदेखील करण्यात येतो. इथेलिन गॅसच्या वापरावर बंदी नाही. परंतु निर्धारित प्रमाणापेक्षा अधिक वापर केला तर ते आरोग्यासाठी घातक ठरते. असे असूनही झटपट पैसे कमविण्यासाठी फळेविक्रते लोकांच्या आरोग्यासोबत घातक खेळ करीत आहेत. कॅलशियम कार्बाईडच्या वापरावर मात्र पूर्णत: बंदी असताना धाडसत्र राबविताच फळविक्रेत्यांकडे कार्बाईड कसे काय सापडलं, असा सवाल उपस्थित केला जात आहे. अन्न व प्रशासन विभागाकडे मनुष्यबळाची वानवा असली तरी निकृष्ट दर्जाचे मानवी शरीराला हानीकारक ठरू शकणाऱ्या भेसळयुक्त अन्नाची विक्री रोखून अशा विक्रेत्यांवर कारवाई करायलाच हवी. हानीकारक पदार्थांच्या विक्रीवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी अन्न व प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांचीच आहे. असे असताना एकमेव कारवाई करून अधिकारी शांत कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. धडक कारवाई अपेक्षितअमरावती : नागरिकांच्या आरोेग्याशी सुरू असलेल्या खेळाचा पर्दाफाश झाल्यानंतर अन्न, प्रशासन विभागातील अधिकाऱ्यांनी शहरातील आंब्याच्या गोदामांवर धाडी टाकून कारवाई करणे अपेक्षित आहे. मात्र, तुर्तास एकच कारवाईवर अन्न, प्रशासन विभाग थांबला आहे. आंबे, केळी पिकविण्यासाठी कॅल्शियम कार्बाईडचा वापर होत असेल तर आंब्यांसोबत ही घातक द्रव्ये पोटात गेल्याने घशाचा कॅन्सर, किडनी निकामी होणे, लिव्हर खराब होणे, पोटाचे, तसेच मेंदूचे अनेक आजार, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.