शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

देशभरातील लोकगीतांचे होणार संवर्धन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 12:19 IST

केंद्र सरकारच्या माहिती, सूचना व प्रसारण मंत्रालयाच्या पुढाकाराने देशभरातील निरनिराळ्या प्रांतांमध्ये वास्तव्यास असलेल्या जाती-जमातींच्या लोकगीतांचे दृक्श्राव्य स्वरूपात संकलन केले जात आहे.

ठळक मुद्देमाहिती सूचना व प्रसारण मंत्रालयाचा पुढाकारसंस्कृतीचा अविस्मरणीय ठेवा दृक्श्राव्य स्वरूपात संकलित करणार

गणेश वासनिक ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : केंद्र सरकारच्या माहिती, सूचना व प्रसारण मंत्रालयाच्या पुढाकाराने देशभरातील निरनिराळ्या प्रांतांमध्ये वास्तव्यास असलेल्या जाती-जमातींच्या लोकगीतांचे दृक्श्राव्य स्वरूपात संकलन केले जात आहे. जन्मापासून तर मृत्यूपर्यंतचे संस्कार, सण, उत्सव आणि त्यावर आधारित लोकगीतांच्या संवर्धनास प्रारंभ झाला आहे. महाराष्ट्रात लोकगीतांच्या संवर्धनाची जबाबदारी आकाशवाणी केंद्रांकडे सोपविण्यात आली आहे.प्रसार भारतीच्या विविध आकाशवाणी परिक्षेत्रात येणाऱ्या जाती-जमातींचे लोकगीत ध्वनिमुद्रित करणे, या गीतांची मूळ संहिता त्याच भाषेत लिहिणे, मूळ गीतांचे इंग्रजीत व हिंदीत भाषांतर करणे, त्या गीतांचे नोटेशन तयार करणे तसेच आॅडिओ तथा व्हिडिओ ध्वनिमुद्रण केले जात आहे. केंद्रीय माहिती सूचना व प्रसारणमंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प पूर्णत्वास आणला जात आहे. दुर्मिळ लोकगीतांच्या संवर्धनाचे काम २०१६ पासून सुरू आहे. आदिवासी भाषांना लिपी नसल्याने संशोधनासाठी आकाशवाणी केंद्रांकडे जबाबदारी देण्यात आली आहे. देशात विविध प्रांतांमध्ये प्रत्येक २०० ते ३०० किमी अंतरावर भाषा, संस्कृतीत बदल होतो. हीच बाब लोकगीतांच्या माध्यमातून संवर्धन केली जात आहे.मेळघाटच्या कोरकू, गवळींच्या २०० लोकगीतांचे संकलनअमरावती जिल्ह्यातील मेळघाटच्या कोरकू, गवळी जमातीची संपूर्ण जीवन व्यवस्था लोकगीतांनी व्यापली आहे. त्यांच्या लौकीक आणि पारलौकीक जीवनाची अभिव्यक्ती लोकगीतातूनच झाली आहे. या दोन्ही समाजांची गीते एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होत आलेली आहेत.अमरावती आकाशवाणी केंद्राच्या कार्यक्रम प्रमुख तथा प्रकल्पप्रमुख सुनालिनी शर्मा, प्रकल्प निर्मिती सहायक संजय ठाकरे, मार्गदर्शक काशीनाथ बºहाटे, सुनील मावस्कर, रामगोपाल भिलावेकर आदींच्या परिश्रमातून २०० लोकगीतांचे संकलन करण्यात आले आहे. ही लोकगीते आॅडिओ, व्हिडिओ, मूळ संहिता, हिंदी भाषांतर, संगीतबद्ध करून केंद्र सरकारकडे पाठविली आहेत.दिल्ली वगळता अन्य राज्यांतील १५० जिल्ह्यांमध्ये हा प्रकल्प पोहोचला आहे. आतापर्यंत २० हजार लोकगीतांची मूळ संहिता प्राप्त झाली आहे. प्रकल्पांचे हिंदी व इंग्रजी भाषांतर, छायाचित्र उपलब्ध झालेत. गुजरातपासून तर मणीपूर आणि काश्मीरपासून ते पोर्ट ब्लेअरपर्यंत १५० भाषांतील लोकगीते संकलित झाली आहेत.- सोमदत्त शर्मा, लोकगीत प्रकल्प प्रमुख, दिल्ली.

टॅग्स :cultureसांस्कृतिक