शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
3
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
4
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
5
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
6
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
7
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
8
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
9
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
10
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
11
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
12
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
13
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
14
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
15
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
16
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
17
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
18
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
19
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
20
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा

श्रमाच्या पालवीला फुलविली यशाची फुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 22:45 IST

सततची नापिकी व कर्ज असल्याने आष्टा येथील शेतकरी राजेंद्र पिसे याने आत्महत्या केली.

ठळक मुद्देसंघर्षातून उन्नतीकडे : शेतकरी महिलेची जगण्याची जिद्द

मोहन राऊत । लोकमत न्यूज नेटवर्कधामनगाव रेल्वे : सततची नापिकी व कर्ज असल्याने आष्टा येथील शेतकरी राजेंद्र पिसे याने आत्महत्या केली. यामुळे पत्नी व एक मुलगी, दोन मुलाचे आयुष्य उघड्यावर आले. परंतु, संघर्षातून वाट काढत जिद्दीने संघर्षातून शेती जयवंताबाईने शेती करून तालुक्यातील महिलांसाठी आदर्श निर्माण केला.आष्टा येथील जयवंता पिसे शेतात राबून संसाराचा गाडा ओढत आहेत. पती नसला तरी दोन मुले अन् एक मुलगी तिला शेतीच्या कामात मदत करतात. २००७ साली पती राजेंद्र पिसे यांनी ५० हजार रुपयांच्या कर्जापाई आत्महत्या केली. या घटनेने हदरलेल्या तिच्या समोर आपल्या दोन मुलाचे काय हा प्रश्न कायम होता. नियतिशी दोन हात करण्याचा निर्णय घेवून तीने आपला जीवन लढा कायम ठेवण्याची जिद्द ठेवून, घरातील दोन एकर  शेती करण्याचा निश्चय केला. कुणाच्याही मदतची वाट न पाहता मुलगा सुमित ललित व मुलगी प्रगती  यांनी शिक्षणासह आईला शेतीच्या कामात मदत सुरु केली. पैशाची चणचण भासली की जयवंता दुसºयाच्या शेतात मजुरी करायची. मुलांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होणार नाही याचीदेखील ती काळजी घेत होतीच. पतिवियोगाचे दु:ख तर जयवंताला आहेच, मात्र आता रडत बसायचे सोडून कामासाठी पदर खोचला आहे.यंदा जयवंताने आपल्या दोन  एकर शेतात सोयाबीन पेरले असून या वर्षीसुद्धा तिला मोठ्या प्रमाणात नफा मिळेल, अशी अपेक्षा आहे आणि यात तिला मदत करतात तिचे दोन मुले मुले. शेतीच्या कामात ते सतत तिच्या सोबत असतात.  त्यासाठी मुलगीदेखील आपल्या अभ्यासासोबत  तिच्या आईला शेतात मदत करते.आज  जयवंताबाई उत्तम प्रकारे शेती करीत असून त्या स्वत: सक्षमपणे शेती व्यवसाय साभांळत आहेत. पतीच्या आत्महत्येनंतर त्या खचून न जाता आज स्वत:च शेतात खंबीरपणे निर्णय घेऊन राबत आहेत.