शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

सहा तालुक्यातील नदीनाल्यांना पूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 23:28 IST

जिल्ह्यात चार दिवसांपासून पावसाची झड आहे. शनिवारी सात मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्यानंतर गेल्या २४ तासांत पुन्हा सार्वत्रिक दमदार पाऊस झाला. यामध्ये चिखलदरा व धारणी तालुक्यात दशकातला रेकार्ड तुटला. तब्बल १२ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाल्याने नदी-नाले ओव्हर-फ्लो झाले.

ठळक मुद्दे२७ गावांचा संपर्क तुटलासिपनावरील उतवली गावाजवळ पूल वाहून गेलाभिंती कोसळल्याने चार जखमीसहा तालुक्यातील तीन पुलांचे नुकसानपेढी नदीलाही पूर, पिके बाधितफैलढाणा, हरिसाल, दुनीमध्ये घरे वाहून गेलीतहसील प्रशासनाद्वारे पंचनामे सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात चार दिवसांपासून पावसाची झड आहे. शनिवारी सात मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्यानंतर गेल्या २४ तासांत पुन्हा सार्वत्रिक दमदार पाऊस झाला. यामध्ये चिखलदरा व धारणी तालुक्यात दशकातला रेकार्ड तुटला. तब्बल १२ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाल्याने नदी-नाले ओव्हर-फ्लो झाले. धारणी तालुक्यात सिपना नदीला पूर आल्याने दिया व उतावली दरम्यानचा पूल वाहून गेला. यामुळे २७ गावांचा संपर्क तुटला आहे. संततधार पावसाने शेकडो घरांचे नुकसान झाले, तर तीन घटनांमध्ये घरांच्या भिंती कोसळल्याने चार व्यक्ती जखमी झाल्या. शहानूर नदीपात्रात एक युवक बुडाला. तीन ठिकाणी पूल खचल्याने व दोन ठिकाणी झाडे कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली.चिखलदरा तालुक्यात १४८.९ व धारणी तालुक्यात ८५.२ मिमी अशी पावसाची नोंद गेल्या २४ तासांत झाली. या तालुक्यांसह अचलपूर व चांदूरबाजार तालुक्यातील नदी-नाल्यांनाही पूर आलेला आहे. जिल्ह्यात सार्वत्रिक ४२.८ मिमी पावसाची नोंद झाली. यामध्ये अमरावती तालुक्यात २१.८ मिमी, भातकुली १९ मिमी, नांदगाव खंडेश्वर ११ मिमी, चांदूर रेल्वे ४.९ मिमी, धामणगाव ८.४ मिमी, तिवसा ८.४ मिमी, मोर्शी ४०.६ मिमी, वरुड ५३.५ मिमी, अचलपूर ६०.९ मिमी, चांदूरबाजार ६२.१ मिमी, दर्यापूर ३१.८ मिमी व अंजनगाव सुर्जी तालुक्यात ४२ मिमी पावसाची नोंद झाली. चार दिवसांपासून जिल्ह्यात झड असल्याने पावसाची सरासरी सुधारली असली तरी अद्यापही सात तालुक्यांत पाऊस ७५ टक्क््यांपेक्षा कमी आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४०४ मिमी पावसाची सरासरी अपेक्षित असताना प्रत्यक्षात ३०९.३ मिमी पावसाची नोंद झाली. ही टक्केवारी ७६.४ आहे. यामध्ये ९५.६ टक्के पाऊस चांदूर बाजार तालुक्यात झालेला आहे. अमरावती तालुक्यात ८३ टक्के, भातकुली ४८.४, नांदगाव खंडेश्वर ५३.३, चांदूर रेल्वे ७२.६, धामणगाव रेल्वे ७६, तिवसा ६३, मोर्शी ६५.१, वरूड ५६.९, अचलपूर ९५.२, दर्यापूर ७०.७, अंजनगाव सुर्जी ८६.४, धारणी ९३.९, तर चिखलदरा तालुक्यात सरासरीच्या ९५.३ टक्के पाऊस कोसळला आहे.१२ महसूल मंडळामध्ये अतिवृष्टीजिल्ह्यात १२ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली. यामध्ये चिखलदरा २१७, टेंब्रुसोडा ११७, सेमाडोह २०७.४, धारणी १०९, धूळघाट ९८, हरिसाल ९०, चांदूर बाजार ७१, तळेगाव मोहणा ९५, ब्राम्हणवाडा थडी ७४, अचलपूर ९०, परतवाडा ८० व राजुराबाजार ६५ मिमी पाऊस कोसळला.याव्यतिरिक्त चुरणी ५४.२, सावलीखेडा ४५, सातेगाव ४३, भंडारज ५०, विहिगाव ५१, अंजनगाव सुर्जी ५२, कोकर्डा ४१, दर्यापूर ३५, वडनेरगंगाई ५४, येवदा ३८, बेलोरा ४८, करजगाव ५७, आसेगाव ४२, शिरजगाव कसबा ४८, परसापूर ३८, रासेगाव ६३, पथ्रोट ६२, वरूड ५२, बेनोडा ४४, लोणी ५५ शेंदूरजनाघाट ४१, पुसदा ६०, अंबाडा ६२, हिवरखेड ४८ व रिद्धपूर मंडळात ५९ मिमी पावसाची नोंद झाली आहे.तीन घरे कोसळली; चार जखमीजिल्हाधिकारी कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, तीन तालुक्यांमध्ये घराची भिंत कोसळून चार व्यक्ती जखमी झाल्या आहेत. अंजनगाव सुर्जी तालुक्यात कसबेगव्हाण येथे घराची भिंत कोसळल्याने बानोजी सलाबतखाँ मुदताजबी सलाबतखाँ या जखमी झाल्या, तर सोनू भासकर यांचा पाय फॅक्चर झाला आहे. चांदूरबाजार तालुक्यात वसंता धुर्वे यांच्या घरांची भिंत कोसळून भाग्यश्री उईके ही चिमुकली गंभीर जखमी झाली तसेच वैष्णवी अनिल उईके व विमल ओझालाल धुर्वे जखमी झाले आहेत. धारणी तालुक्यात १० घरांमध्ये पाणी शिरल्याने त्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. अचलपूर तालुक्यात सावळी, गौरखेडा व इतर गावांमध्ये काही घरांचे नुकसान झाले असल्याची प्र्राथमिक माहिती आहे. तलाठ्यांद्वारे बाधित क्षेत्राचे सर्वेक्षण सुरू अहे.असा झाला सहा तालुक्यात कहरअतिवृष्टीमुळे अचलपूर तालुक्यात भुलेश्वरी नदीला महापूरपरतवाडा- अंजनगाव राज्य मार्ग बंद. पथ्रोट, शिंदीमध्ये पाणी शिरले.धारणी, चिखलदऱ्यात अतिवृष्टी.आदिवासींचे जीवनमान विस्कळीत.सपन प्रकल्पाची दारे उघडली. पूर्णा, शहानूर, चंद्रभागातील जलसाठा वाढलाधारणी तालुक्यातील तापी, गडगा, सिपना नद्यांना पूरचिखलदरा तालुक्यात सलोना ते लोणाझरी रस्त्यावर दरड कोसळली.अचलपूर तालुक्यातील चमक येथील तीन बंधारे गेले वाहूनखरपी ते परतवाडा मार्गातील पूल खचला. वाहतूक खोळंबली.पर्यायी मार्ग पाण्याखाली आल्याने अमरावती-मोर्शी वाहतूक बंद.दिया-बैरागड व धारणमहू-ढाकरमल मार्गावरील पूल खचला.भातकुली तालुक्यातील पेढी नदीला पूर. नदीकाठची पिके बाधित.