शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

बडनेऱ्यातील उडाणपूल झाला धोक्याचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 23:57 IST

गांधी विद्यालयासमोरील महामार्गाचा उड्डाणपूल धोक्याचा ठरू पाहत आहे. अपघातांचे प्रमाण वाढले आहे. मात्र, या गंभीर बाबींकडे प्रशासन डोळेझाक करीत आहे. अपघात घडल्यानंतरच थातूर - मातूर दुरूस्त्या करण्यापलीकडे ठोस काहीच केल्या जात नसल्याने शहरवासीयांध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

ठळक मुद्देप्रशासन झोपेत : साईड शोल्डर, खड्डे ठरताहेत जीवघेणे

लोकमत न्यूज नेटवर्कबडनेरा : साईड शोल्डर व रस्त्यामधील प्रचंड गॅप, खड्डेच खडे, फुटपाथ फुटणे, कठडेच नसणे यामुळे गांधी विद्यालयासमोरील महामार्गाचा उड्डाणपूल धोक्याचा ठरू पाहत आहे. अपघातांचे प्रमाण वाढले आहे. मात्र, या गंभीर बाबींकडे प्रशासन डोळेझाक करीत आहे. अपघात घडल्यानंतरच थातूर - मातूर दुरूस्त्या करण्यापलीकडे ठोस काहीच केल्या जात नसल्याने शहरवासीयांध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.जुन्या वस्तीतून जाणाऱ्या महामार्गावरील गांधी विद्यालयासमोरील उड्डाणपूल अत्यंत धोक्याचा ठरत आहे. या ठिकाणी अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या उड्डाणपुलावर खड्डेच - खड्डे पडले असून, दोनही बाजंूनी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून उभारण्यात आलेले लोखंडी कठडे गायब झाले आहेत. रस्ता व साईड शोल्डर यामध्ये मोठी गॅप तयार झाली आहे. रस्त्याच्या दुतर्फा झुडुपी वाढली आहेत. आधीच हा उड्डाणपूल अरूंद आहे. वाहतुकीची वर्दळ सतत राहत असल्याने वाहनचालकांना कसेबसे आपला मार्ग काढावा लागतो आहे. रस्ता व साईड शोल्डरची गॅप जीवघेणी ठरत आहे. नुकताच शुभम वाठ नामक तरुणाचा यात बळी गेला. त्यानंतर प्रशासनाने थातूर-मातूर मुरूम टाकला आहे. अपघात घडल्यानंतरच प्रशासन तात्पुरती कामे करीत असल्याचा आजपर्यंतचा अनुभव आहे. उड्डाणपुलाच्या दुरूस्तीचे ठोस काम केव्हा करणार, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. अजून किती बळी जाण्याची वाट प्रशासन पाहणार, अशा संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.अपुरी प्रकाश व्यवस्था पादचाऱ्यांसाठी जीवघेणीगांधी विद्यालयासमोरील उड्डाणपुलाच्या संपूर्ण दुरवस्थेला प्रशासनच जबाबदार आहे. यामुळेच आपघातांचे प्रमाण वाढले आहे. रस्ता व साईड शोल्डरमधील गॅप जीवघेणी ठरत आहे. अपुरी प्रकाश व्यवस्था तसेच पुलावर असणारे फुटपाथ पादचाºयांसाठी जीवघेणे ठरत आहे.अरुंद पुलामुळे अपघाताचा धोकागांधी विद्यालय नजीकच असल्याने वाहनांची मोठी वर्दळ राहते. त्यामानाने उड्डाणपूल अरूंद आहे. त्यात साईड शोल्डर व रस्ता यामधील गॅप दुचाकीस्वारांसाठी धोक्याची ठरत आहे. मोठे वाहन आले की दुचाकीस्वारांना मार्ग काढताना धोका पत्करावा लागतो.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा