शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

भरारी पथक कुचकामी

By admin | Updated: June 22, 2014 23:47 IST

बनावट बियाणे विक्रीच्या घटना ठिकठिकाणी उघडकीस येत असून शेतकऱ्यांची नाहक लूट सुरू आहे. या प्रकाराला आळा घालण्यासाठी व शेतकऱ्यांची फसवणूक थांबविण्यासाठी गठित करण्यात आलेले

बनावट बियाणे विक्रीला उधाण : कारवाई नाही, ‘फिक्सिंग’ झाल्याची चर्चाअमरावती : बनावट बियाणे विक्रीच्या घटना ठिकठिकाणी उघडकीस येत असून शेतकऱ्यांची नाहक लूट सुरू आहे. या प्रकाराला आळा घालण्यासाठी व शेतकऱ्यांची फसवणूक थांबविण्यासाठी गठित करण्यात आलेले जिल्हास्तरावरील भरारी पथक कुचकामी ठरल्याचे दिसते. बनावट बियाण्यांची विक्री करणाऱ्या रॅकेटशी या भरारी पथकाचे संधान तर नाही ना, असा सवालही या निमित्ताने उपस्थित होत आहे. जिल्ह्याच्या सरासरी पेरणी क्षेत्रापैकी ८० टक्के पेरणीक्षेत्र सोयाबीन व कपाशीचे आहे. त्यामुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी कपाशी व सोयाबीनच्या बनावट बियाण्यांची खुलेआम विक्री होत आहे. या प्रकाराला पायबंद घालण्याच्या उद्देशाने कृषी विभागाकडून जिल्ह्यात नेमण्यात आलेले १५ भरारी पथक सपशेल अपयशी ठरले आहेत. खरीप हंगाम २०१४ साठी जिल्ह्यात ७,०२,२०० हेक्टर क्षेत्र पेरणी योग्य आहे. यापैकी ३,७३,००० क्षेत्रात सोयाबीन व १,५९,००० हेक्टर क्षेत्रात कपाशीची लागवड होण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे. खरीप २०१३ च्या तुलनेत यंदा २९,६०० हेक्टरने कपाशीचे पेरणीक्षेत्र वाढणार आहे. त्यामुळे बीटी बियाण्यांना मागणी वाढली आहे. हे हेरून बनावट बीटी बियाणे बाजारात दाखल झाले आहेत. विनाप्रक्रिया बाजारात विक्रीसाठी आलेल्या या बनावट बियाण्यांच्या उगवणक्षमतेची कुठलीच खात्री नसते. अन्य राज्यातून छुप्या मार्गाने हे बनावट बियाणे जिल्ह्यात दाखल झाले असताना कृषी विभागाने नेमलेली तालुकास्तरीय १४ व जिल्हास्तरीय १ अशी १५ पथके मात्र अस्तित्वहीन ठरली आहेत. या पथकांकडून एक अपवाद वगळता कुठेही कारवाई नाही.शुक्रवारी वरूड तालुक्यातील घोराड येथे मलिका ५५ व बिगबॉल बी.जी.३ तसेच वोलगार्ड तणनाशक बीटी, या बनावट कंपन्यांची ६३ पाकिटे जप्त केली.जिल्ह्यात धामणगाव, मोर्शी व वरूड तालुक्यात मोठ्या प्रमाणात बनावट बीटी बियाण्यांची विक्री होत आहे. परंतु तालुकास्तरीय पथकांद्वारे कुठलीही कारवाई होत नसल्याने भरारी पथकांचे बनावट बियाण्यांची विक्री करणाऱ्या कंपन्यांसोबत ‘फिक्सिंग’ झाले काय? असा सवाल शेतकरी करीत आहेत. मागील खरीप हंगामात परतीच्या पावसामुळे सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त झाले. सोयाबीनची प्रतवारी कमी झाली. सोयाबीन पावसात ओले झाल्याने त्याला कीड लागली होती. त्यामुळे मिळेल त्या भावात शेतकऱ्यांनी सोयाबीन विकले. त्यामुळे जिल्ह्यात सोयाबीन बियाण्यांची टंचाई आहे. कृषी विभागाच्या माहितीनुसार जिल्ह्यात १ लाख ८८ हजार क्विंटल सोयाबीन बियाण्यांची आवश्यकता आहे. जिल्ह्यात महाबीज, राष्ट्रीय बीज निगम व खासगी कंपनीकडून केवळ १ लाख क्विंटल सोयाबीन बियाणे उपलब्ध होणार आहेत. परिणामी ८८ हजार क्विंटल बियाण्यांची यंदा कमतरता भासणार आहे. त्यामुळे बाजारातील सोयाबीन विकत घेऊन नामवंत कंपनीच्या नावाने विकण्याचा गोरखधंदा सुरू झाला आहे. असेच ३८ लाख रूपयांचे बनावट सोयाबीन बियाणे शुक्रवारी २० जीन रोजी अकोट येथे विभागीय भरारी पथकाने पकडले. याच ठिकाणावरून चार ट्रक बियाणे बाजारात विक्रीला पाठविण्यात आल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. त्यामुळे बनावट बियाणे विकत घेऊन शेतकऱ्यांची फसगत होणार आहे. सर्वच तालुक्यात बनावट बियाण्यांची सर्रास विक्री होत असताना जिल्ह्यातील सर्व भरारी पथके मात्र याकडे डोळेझाक करीत आहेत. मुळात जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनाच बनावट बियाण्यांविषयी गांभीर्य नसल्याने शेतकऱ्यांची लूट होत असल्याचा आरोप शेतकरी वर्गातून केला जात आहे. (प्रतिनिधी)