शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

धामणगाव तालुक्यातील पाच गावे काळोखात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:18 IST

साप विंचवाची वाढली भीती प्यावे लागतात दूषित पाणी धामणगाव रेल्वे : तालुक्यात अधिक पावसामुळे पाच गावांतील विद्युत ...

साप विंचवाची वाढली भीती

प्यावे लागतात दूषित पाणी

धामणगाव रेल्वे : तालुक्यात अधिक पावसामुळे पाच गावांतील विद्युत पुरवठा चार दिवसांपासून बंद आहे. महावितरणची सेवा कोलमडली आहे. यादरम्यान रात्री सरपटणाऱ्या प्राण्यांची भीती अधिक वाढली आहे.

तालुक्यातील वाढोणा, घुसळी, कामनापूर, काशीखेड, मलातपूर, महिमापूर या गावांत अधिक पाऊस झाला. यादरम्यान दोन दिवसांपासून कमी-अधिक पावसाची दररोज हजेरी लागत आहे. पाच दिवसांपासून या गावातील वीजपुरवठा खंडित आहे. दिवसभर शेतकरी शेतात काम करतात, मात्र रात्रीला विद्युत पुरवठा राहत नाही. त्यामुळे धान्य दळून आणायचे कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, या भागात अनेकांची घरे कच्च्या माती-विटांची असल्याने रात्रीला साप-विंचू निघतात. विद्युत पुरवठा बंद असल्याने पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. परिसरात चोरीचे प्रमाण वाढले असल्याने या भागातील नागरिक भयभीत झाले आहेत. महावितरणने आता तरी ग्रामीण भागाचा अंत पाहू नये, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मोहन घुसळीकर, सरपंच राजू बांते, उपसरपंच सुभाष डबले, चंद्रशेखर कडू, रवींद्र पणपलिया यांनी महावितरणला निवेदन दिले. त्यावर कार्यवाही करण्याचे आश्वासन उपविभागीय अभियंता यू.के. राठोड यांनी दिले.