शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
5
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
6
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
7
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
8
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
9
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
10
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
11
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
12
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
13
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
14
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
15
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
16
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
17
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
18
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
19
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
20
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

वणवा संशोधनासाठी पाच विद्यापीठांकडे धुरा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 20:27 IST

राज्य शासन गंभीर : जंगलाचे सर्वेक्षण, माती तपासणी वर भर

 -गणेश वासनिक अमरावती : राज्यातील वनक्षेत्रांना गेल्या काही वर्षापासून लागत असलेल्या वणव्यामुळे राज्यशासनाने त्याची गंभीर दखल घेत यावर संशोधन करुन उपाययोजना आखण्याकरिता वनविभागाला ठोस कारणे शोधण्याचे निर्देश दिले आहे. संशोधनाकरिता राज्यातील ३ अकृषी विद्यापीठ तर दोन कृषी विद्यापीठ वणव्याचा अभ्यास करून राज्यशासनाला अहवाल देणार आहे.

राज्यात विशेषत: विदर्भातील वनक्षेत्र दरवर्षी वनांच्या आगीमुळे धुमसतेय. कोकण सारख्या वनांना सुध्दा आगी लागत असल्याने दरवर्षी अन्हाळ्यात २१००० ते ३८००० हेक्टर वनक्षेत्र जळून राख होत आहे. अमरावती जिल्ह्यात मेळघाटमध्ये दरवर्षी १००० हेक्टरच्यावर वनक्षेत्र आगी जळते.  परिणामी वनवणव्याचा मोठ्या प्रमाणात वन्यजीव, सुक्ष्म किटक, पक्षी, सरपटणारे प्राणी, गवत मौल्यवान प्रजाती नष्ट होत आहे. वनवनव्याचे आरोपी कमी प्रमाणात मिळत असल्याने दरवर्षी जंगलास आगी लावण्याच्या घटना घडत आहे. वनकायद्याचा धाक असला तरी अपुरे मनुष्यबळ, खुली संपत्ती या कारणाने जंगलास आगी लावणाºयांचे मनोबल धजावत आहे. दरवर्षी मोठ्या प्रमाणात लागणाºया आगीमुळे वनांचे हवी तशी वाढ होत नसल्याचा निष्कर्ष वनविभागाने काढलेला आहे.

शासनाची दखलराज्य शासनाने सन २०१८-१९ मध्ये वनवणवा संबंधित संशोधन व सर्व्हेक्षण करण्याबाबत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्रजळगाव विद्यापीठ, अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, राहुरी येथील कृषी विद्यापीठ यांच्याकडे संशोधनाची धुरा सोपविली आहे.अकृषी आणि कृषी विद्यापीठांचे प्राध्यापक जंगलात जाऊ न सतत ३ ते ५ वर्षे आग लागणाºया जंगलातील ठिकाणांचे सर्व्हे करून माती तपासणार आहे. या ठिकाणी लागणाºया आगीमुळे वनक्षेत्रावर त्याचा काय परिणाम झालेला आहे. याचे आकलन करून तसा अहवान वनविभागामार्फत राज्य शासनाला सादर करणार आहे.

विदर्भातील वनांचे सर्व्हेक्षणराज्यात विदर्भात चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती (मेळघाट), बुलढाणा, गचिरोली, गोंदिया, भंडारा व नागपूर जिल्ह्यातील वनक्षेत्रांना आगी लावल्या जातात. बहुतांश आगी ह्या मानव निर्मित असल्याचे पुढे आलेले आहे. परिणामी आरोपी मिळत नसल्याने वनविभाग हतबल आहे. कोट्यवधीची वनसंपदा वनात जळत आहे. यावर उपाय योजना केल्या जात असल्या तरी त्या कुचकामी ठरत आहे.

ब्लोअर मशीन पर्यायगेल्या ३ वर्षापासून वनवणवा रोखण्यासाठी वनविभागाने आग नियंत्रणाकरिता ब्लोअर मशीन उपलब्ध करून दिल्यात. मात्र, ही संख्या अपुरी आहे. प्रत्येक परिमंडळात केवळ २ ते ३ ब्लोअर मशीन आहेत. त्यांची संख्या वाढविणे आवश्यक आहे. वनवणव्याबाबत संशोधन झाल्यानंतर यात प्रगती होणार किंवा नाही हे बघणे औचित्याचे ठरले.

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ व अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ चमुने वणव्याच्या संशोधनाला सुरूवात केली आहे. तीन वर्षात हा अहवाल वन विभागाला मिळणार आहे. अमरावती प्रादेशिक स्तरावर अगोदरच सुरूवात झाली आहे.      - प्रवीण चव्हाण       मुख्य वनसंरक्षक, अमरावती.