शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
4
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
5
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
6
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
7
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
8
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
9
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
10
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
11
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
12
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
13
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
14
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
15
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
16
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
17
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
18
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
19
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले

वणवा संशोधनासाठी पाच विद्यापीठांकडे धुरा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 20:27 IST

राज्य शासन गंभीर : जंगलाचे सर्वेक्षण, माती तपासणी वर भर

 -गणेश वासनिक अमरावती : राज्यातील वनक्षेत्रांना गेल्या काही वर्षापासून लागत असलेल्या वणव्यामुळे राज्यशासनाने त्याची गंभीर दखल घेत यावर संशोधन करुन उपाययोजना आखण्याकरिता वनविभागाला ठोस कारणे शोधण्याचे निर्देश दिले आहे. संशोधनाकरिता राज्यातील ३ अकृषी विद्यापीठ तर दोन कृषी विद्यापीठ वणव्याचा अभ्यास करून राज्यशासनाला अहवाल देणार आहे.

राज्यात विशेषत: विदर्भातील वनक्षेत्र दरवर्षी वनांच्या आगीमुळे धुमसतेय. कोकण सारख्या वनांना सुध्दा आगी लागत असल्याने दरवर्षी अन्हाळ्यात २१००० ते ३८००० हेक्टर वनक्षेत्र जळून राख होत आहे. अमरावती जिल्ह्यात मेळघाटमध्ये दरवर्षी १००० हेक्टरच्यावर वनक्षेत्र आगी जळते.  परिणामी वनवणव्याचा मोठ्या प्रमाणात वन्यजीव, सुक्ष्म किटक, पक्षी, सरपटणारे प्राणी, गवत मौल्यवान प्रजाती नष्ट होत आहे. वनवनव्याचे आरोपी कमी प्रमाणात मिळत असल्याने दरवर्षी जंगलास आगी लावण्याच्या घटना घडत आहे. वनकायद्याचा धाक असला तरी अपुरे मनुष्यबळ, खुली संपत्ती या कारणाने जंगलास आगी लावणाºयांचे मनोबल धजावत आहे. दरवर्षी मोठ्या प्रमाणात लागणाºया आगीमुळे वनांचे हवी तशी वाढ होत नसल्याचा निष्कर्ष वनविभागाने काढलेला आहे.

शासनाची दखलराज्य शासनाने सन २०१८-१९ मध्ये वनवणवा संबंधित संशोधन व सर्व्हेक्षण करण्याबाबत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्रजळगाव विद्यापीठ, अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, राहुरी येथील कृषी विद्यापीठ यांच्याकडे संशोधनाची धुरा सोपविली आहे.अकृषी आणि कृषी विद्यापीठांचे प्राध्यापक जंगलात जाऊ न सतत ३ ते ५ वर्षे आग लागणाºया जंगलातील ठिकाणांचे सर्व्हे करून माती तपासणार आहे. या ठिकाणी लागणाºया आगीमुळे वनक्षेत्रावर त्याचा काय परिणाम झालेला आहे. याचे आकलन करून तसा अहवान वनविभागामार्फत राज्य शासनाला सादर करणार आहे.

विदर्भातील वनांचे सर्व्हेक्षणराज्यात विदर्भात चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती (मेळघाट), बुलढाणा, गचिरोली, गोंदिया, भंडारा व नागपूर जिल्ह्यातील वनक्षेत्रांना आगी लावल्या जातात. बहुतांश आगी ह्या मानव निर्मित असल्याचे पुढे आलेले आहे. परिणामी आरोपी मिळत नसल्याने वनविभाग हतबल आहे. कोट्यवधीची वनसंपदा वनात जळत आहे. यावर उपाय योजना केल्या जात असल्या तरी त्या कुचकामी ठरत आहे.

ब्लोअर मशीन पर्यायगेल्या ३ वर्षापासून वनवणवा रोखण्यासाठी वनविभागाने आग नियंत्रणाकरिता ब्लोअर मशीन उपलब्ध करून दिल्यात. मात्र, ही संख्या अपुरी आहे. प्रत्येक परिमंडळात केवळ २ ते ३ ब्लोअर मशीन आहेत. त्यांची संख्या वाढविणे आवश्यक आहे. वनवणव्याबाबत संशोधन झाल्यानंतर यात प्रगती होणार किंवा नाही हे बघणे औचित्याचे ठरले.

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ व अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ चमुने वणव्याच्या संशोधनाला सुरूवात केली आहे. तीन वर्षात हा अहवाल वन विभागाला मिळणार आहे. अमरावती प्रादेशिक स्तरावर अगोदरच सुरूवात झाली आहे.      - प्रवीण चव्हाण       मुख्य वनसंरक्षक, अमरावती.