शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
4
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
5
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
6
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
7
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
8
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
9
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
10
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
11
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
12
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
13
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
14
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
15
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
16
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
17
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
18
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
19
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
20
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!

पश्चिम विदर्भातील ५०२ प्रकल्पांत पाच दिवसांत सात टक्क्याने पाणीसाठ्यात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 12:37 IST

पश्चिम विदर्भातील ५०२ प्रकल्पांत पाच दिवसांत सरासरी सात टक्क्यांनी पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. मोठ्या नऊ प्रकल्पांत सरासरी ५.२८ टक्क्यांनी पाणी वाढल्याची माहिती जलसंपदा विभागाने शुक्रवारी दिली.

ठळक मुद्दे मोठ्या नऊ प्रकल्पांत पाच टक्के वाढ आठवडाभर पावसाची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पश्चिम विदर्भातील ५०२ प्रकल्पांत पाच दिवसांत सरासरी सात टक्क्यांनी पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. मोठ्या नऊ प्रकल्पांत सरासरी ५.२८ टक्क्यांनी पाणी वाढल्याची माहिती जलसंपदा विभागाने शुक्रवारी दिली.३० जुलै रोजी सकाळी ७ वाजेपर्यंतच्या अहवालानुसार ५०२ प्रकल्पांत १६.३७ टक्के पाणीसाठा शिल्लक होता, सद्यस्थिती २२.७९ टक्के पाणी संचयित झाला आहे. पाच दिवसांतील पावसामुळे काही मध्यम प्रकल्पांत पाणीसाठ्यात गतीने वाढ झाली असली तरी मोठ्या प्रकल्पांची पातळी चिंताजनक असल्याचे मत जलतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.सद्यस्थितीत मोठ्या नऊ प्रकल्पांत २१.८० टक्के, तर २४ मध्यम प्रकल्पांत ३४.०३ टक्के पाणीसाठा आहे. पूर्वीच्या तुलनेत मध्यम प्रकल्पांत ८.४१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ४६९ लघु प्रकल्पांतही वाढ झाली असून १७.१३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मोठे, लघु व मध्यम असे एकूण ५०२ प्रकल्पांचा प्रकल्पीय उपयुक्तसाठा हा ३१७४.११ दलघमी आहे. आजचा उपयुक्त जलसाठा ७२३.५१ दलघमी आहे. गेल्या आठवड्यात सार्वत्रिक पाऊस झाला असला तरी दोन ते तीन आठवडे पावसाने दडी मारल्यामुळे पिके करपली. पण पाच दिवस रिमझिम तथा मध्यम स्वरूपाचा, तर काही ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. मोठ्या प्रकल्पांतील पाणीसाठा चिंताजनक आहे. या आठवड्यात चांगला पाऊस बरसण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. त्यामुळे तहानलेल्या मोठ्या प्रकल्पांची टक्केवारी वाढण्याची अपेक्षा आहे.

टॅग्स :Waterपाणी