शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे किती विमान पाडले? हा प्रश्न विरोधकांच्या मनात कधी आला नाही; राजनाथ सिंह कडाडले
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान नेमकं काय घडलं, किती दहशतवादी मारले गेले? राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिली माहिती, म्हणाले...
3
Operation Mahadev: सैन्याला मोठे यश! पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी मुसा मारला गेल्याची शक्यता, तीन दहशतवादी ठार
4
IND vs ENG: टीम इंडियाला मोठा धक्का! ऋषभ पंत पाचव्या कसोटीतून बाहेर, CSKच्या खेळाडूला संघात स्थान
5
सातव्या वेतन आयोगांतर्गत पगारात लवकरच होणार अखेरची वाढ; कसा होणार १ कोटी कर्मचाऱ्यांना फायदा?
6
९० दीच्या लाटेवर स्वार व्हायला आली! कायनेटीकची DX ईव्ही लाँच झाली, पहा किंमत आणि रेंज...
7
Nitin Shete: शनि शिंगणापूर संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
8
Mumbai : 'Mhada अधिकाऱ्याची महिन्याला ४०-५० लाख काळी कमाई'; पत्नी वैतागली आणि संपवलं आयुष्य
9
"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
10
कुठे गायब झाली 'तेरे नाम'मधील भिकारीची भूमिका करणारी अभिनेत्री? पूर्ण बदललाय तिचा लूक
11
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
12
घरात मोठ्या आवाजात गाणी लावून पत्नीच्या डोक्यात टाकली वीट; हत्येनंतर पतीनेही संपवले जीवन
13
मेहनतीचं चीज! आई करते मजुरी, जेवणासाठी नव्हते पैसे, कोचिंगशिवाय ३ बहिणी UGC NET पास
14
जबरदस्त नफ्याचे संकेत देतोय GNG Electronics IPO चा GMP; शेअर्स अलॉट झालेत का, कसं चेक कराल?
15
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
16
आजीबाई जोमात, नागोबा कोमात; 8 फूट लांब सापाला अलगद पकडले, पाहा Video
17
IND vs ENG: "शुबमन गिलने जर शतक केलं नसतं तर..."; प्रशिक्षक गौतम गंभीरने ठणकावून सांगितलं
18
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
19
Shravan Somvar 2025: महादेवाला केतकीची फुले वाहू नये; त्यामागे आहे एक पौराणिक कथा!
20
'बॉर्डर २'मध्ये वरुण धवनसोबत झळकणार 'ही' अभिनेत्री, मेकर्सने केली अधिकृत घोषणा

पश्चिम विदर्भातील ५०२ प्रकल्पांत पाच दिवसांत सात टक्क्याने पाणीसाठ्यात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 12:37 IST

पश्चिम विदर्भातील ५०२ प्रकल्पांत पाच दिवसांत सरासरी सात टक्क्यांनी पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. मोठ्या नऊ प्रकल्पांत सरासरी ५.२८ टक्क्यांनी पाणी वाढल्याची माहिती जलसंपदा विभागाने शुक्रवारी दिली.

ठळक मुद्दे मोठ्या नऊ प्रकल्पांत पाच टक्के वाढ आठवडाभर पावसाची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पश्चिम विदर्भातील ५०२ प्रकल्पांत पाच दिवसांत सरासरी सात टक्क्यांनी पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. मोठ्या नऊ प्रकल्पांत सरासरी ५.२८ टक्क्यांनी पाणी वाढल्याची माहिती जलसंपदा विभागाने शुक्रवारी दिली.३० जुलै रोजी सकाळी ७ वाजेपर्यंतच्या अहवालानुसार ५०२ प्रकल्पांत १६.३७ टक्के पाणीसाठा शिल्लक होता, सद्यस्थिती २२.७९ टक्के पाणी संचयित झाला आहे. पाच दिवसांतील पावसामुळे काही मध्यम प्रकल्पांत पाणीसाठ्यात गतीने वाढ झाली असली तरी मोठ्या प्रकल्पांची पातळी चिंताजनक असल्याचे मत जलतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.सद्यस्थितीत मोठ्या नऊ प्रकल्पांत २१.८० टक्के, तर २४ मध्यम प्रकल्पांत ३४.०३ टक्के पाणीसाठा आहे. पूर्वीच्या तुलनेत मध्यम प्रकल्पांत ८.४१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ४६९ लघु प्रकल्पांतही वाढ झाली असून १७.१३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मोठे, लघु व मध्यम असे एकूण ५०२ प्रकल्पांचा प्रकल्पीय उपयुक्तसाठा हा ३१७४.११ दलघमी आहे. आजचा उपयुक्त जलसाठा ७२३.५१ दलघमी आहे. गेल्या आठवड्यात सार्वत्रिक पाऊस झाला असला तरी दोन ते तीन आठवडे पावसाने दडी मारल्यामुळे पिके करपली. पण पाच दिवस रिमझिम तथा मध्यम स्वरूपाचा, तर काही ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. मोठ्या प्रकल्पांतील पाणीसाठा चिंताजनक आहे. या आठवड्यात चांगला पाऊस बरसण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. त्यामुळे तहानलेल्या मोठ्या प्रकल्पांची टक्केवारी वाढण्याची अपेक्षा आहे.

टॅग्स :Waterपाणी