शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
3
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
4
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
5
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
6
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
7
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
8
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
9
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
10
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
11
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
12
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
13
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
14
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
15
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
16
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
17
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
18
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
19
Solapur Crime: 'तुला आणि तुझ्या आईला खल्लास करीन'; बापाकडूनच अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा अत्याचार
20
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका

दिल्ली कार्यक्रमावरून जिल्ह्यात परतल्या १८ व्यक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 05:00 IST

दिल्ली येथे ८ ते १० मार्च या कालावधीत तबलिगी जमातचा धार्मिक मेळावा निजामुद्दीन परिसरातील बंगलेवाली मशिदीत घेण्यात आला. या मेळाव्यात इंडोनेशिया, मलेशियासह अनेक देशांतील अडीच हजारांवर नागरिक सहभागी झाले होते. या समूहातील २४ जणांना कोविड-१९ ची बाधा झाल्याचे आतापर्यंत स्पष्ट झाले. त्यापैकी आठ व्यक्तींचा या आजाराने मृत्यू झालेला आहे.

ठळक मुद्देसर्वांचे थ्रोट स्वॅब तपासणीला : वलगाव येथील कक्षात सर्व १४ दिवस क्वारंटाइन

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दिल्ली येथील धार्मिक मेळाव्यात सहभागी झालेल्या शहरातील १५ व ग्रामीण भागातील तीन व्यक्ती जिल्ह्यात आल्याची माहिती प्रशासनाला मिळताच, या सर्वांना बुधवारी ताब्यात घेण्यात आले व त्यांची पथकाद्वारे आरोग्य तपासणी करण्यात आली. या सर्व व्यक्तींना वलगाव येथील संत गाडगे महाराज वृद्धाश्रमातील कक्षात १४ दिवसांकरिता क्वारंटाइन करण्यात आल्याची माहिती आहे.दिल्ली येथे ८ ते १० मार्च या कालावधीत तबलिगी जमातचा धार्मिक मेळावा निजामुद्दीन परिसरातील बंगलेवाली मशिदीत घेण्यात आला. या मेळाव्यात इंडोनेशिया, मलेशियासह अनेक देशांतील अडीच हजारांवर नागरिक सहभागी झाले होते. या समूहातील २४ जणांना कोविड-१९ ची बाधा झाल्याचे आतापर्यंत स्पष्ट झाले. त्यापैकी आठ व्यक्तींचा या आजाराने मृत्यू झालेला आहे. या पार्श्वभूमीवर सदर कार्यक्रमात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहभागी झालेल्या नागरिकांचा शोध प्रशासनाद्वारे घेण्यात आला. या अनुषंगाने दिल्लीे परिसरातील १८ नागरिक अमरावती जिल्ह्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाला मिळाली. शहरातील या नागरिकांचा गाडगेनगर ठाण्याच्या पोलीस पथकाने गुरुवारी शोध घेतला. त्यांना ते आढळून आले. महापालिकेच्या आरोग्य पथकाने या सर्व नागरिकांची प्राथमिक आरोग्य तपासणी केली व सर्वांना जिल्हा सामान्य रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी आणण्यात आले. या ठिकाणी त्यांचे थ्रोट स्वॅब घेण्यात आल्यानंतर त्यांना वलगाव येथील क्वारंटाइन कक्षात ठेवण्यात आल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. या सर्व व्यक्ती दिल्ली येथील सिलमपूर येथील आहेत व २४ फेब्रुवारीला त्यांनी अमरावतीला गाठल्याचे सांगितले, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.आणखी १० व्यक्तींचा शोघमिळालेल्या माहितीनुसार, शहरासह जिल्ह्यात आणखी १० व्यक्ती दिल्लीवरुन यापूर्वीच आल्या असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाला मिळाली आहे. आता या सर्वांचा शोध पोलिसांसह आरोग्य पथक घेत आहे. या नागरिकांचा दिल्ली येथील कार्यक्रमात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष सहभाग असल्याने त्यांचीही वैद्यकीय तपासणी आता होणार आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी १८ व्यक्ती जिल्ह्यात आल्याची माहिती दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या