शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
2
Kolhapur Mahadevi Elephant : अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
3
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
4
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
5
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
6
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
7
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
8
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
9
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
10
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
11
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
12
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा
13
'सैयारा'साठी 'या' रिअल लाईफ जोडीला होती ऑफर, मोहित सूरींनी बदलला निर्णय; कारण...
14
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
15
"तुझे ओठ सेक्सी आहेत, किस करू?", असित मोदींवर TMKOC फेम अभिनेत्रीचे गंभीर आरोप
16
"तो मला टॉर्चर करतोय"; पत्नीच्या पोलीस तक्रारीनंतर पती घरातून पळाला, पण त्यानंतर जे घडलं...
17
खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
18
राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन
19
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
20
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी

आधी माघार नंतर होकार, आता लोकसभा लढवणार; आनंदराज आंबेडकरांनी भूमिका केली स्पष्ट  

By उज्वल भालेकर | Updated: April 7, 2024 19:23 IST

कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव तसेच मिळणाऱ्या पाठिंब्यामुळे आपण निर्णय बदलल्याचे आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

अमरावती: अमरावती लोकसभा निवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा करणाऱ्या आनंदराज आंबेडकर यांनी अखेर निर्णय बदलवून निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले आहे. रविवारी त्यांनी पत्रकार परिषदेतून आपली भूमिका स्पष्ट केली. कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव तसेच मिळणाऱ्या पाठिंब्यामुळे आपण निर्णय बदलल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू असलेले आनंदराज आंबेडकर यांनी ‘रिपब्लिकन सेना’ या पक्षावर अमरावती लोकसभा मतदारसंघातून २ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. उमेदवारी अर्ज दाखल करताना निघालेल्या त्यांच्या रॅलीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी न झाल्याने त्यांनी दुसऱ्याच दिवशीच म्हणजेच ३ एप्रिलला सायंकाळी आपण उमेदवारी मागे घेत असल्याचे जाहीर पत्र काढून ‘वंचित’ला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु ४ एप्रिल रोजी वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी आनंदराज आंबेडकर यांना पाठिंबा देत ‘वंचित’चा उमेदवार अर्ज दाखल करणार नसल्याचे पत्र काढले होते. मात्र यानंतरही आनंदराज आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा हा फसवा असल्याचे सांगत त्यांनी उमेदवारी मागे घेण्याच्या निर्णयावर ते ठाम असल्याचे जाहीर केले होते.

त्यानंतर मागील दोन दिवसांपासून ते आपल्या निर्णयाबद्दल मौन बाळगून होते. अशातच त्यांनी रविवारी आपण निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले. अमरावतीमधून आंबेडकरी समाजाचे नेतृत्व करणारा एकही पक्ष नसल्याने तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा वारंवार आग्रहामुळे निवडणूक लढण्याचा निर्णय घेत असल्याचे आनंदराज यांनी स्पष्ट केले. यावेळी रिपब्लिकन सेनेचे प्रदेशाध्यक्ष काकासाहेब खांबाळकर, ‘वंचित’चे जिल्हाध्यक्ष शैलेश गवई, रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष अनिल बरडे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Amravatiअमरावती