शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

आधी माघार नंतर होकार, आता लोकसभा लढवणार; आनंदराज आंबेडकरांनी भूमिका केली स्पष्ट  

By उज्वल भालेकर | Updated: April 7, 2024 19:23 IST

कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव तसेच मिळणाऱ्या पाठिंब्यामुळे आपण निर्णय बदलल्याचे आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

अमरावती: अमरावती लोकसभा निवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा करणाऱ्या आनंदराज आंबेडकर यांनी अखेर निर्णय बदलवून निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले आहे. रविवारी त्यांनी पत्रकार परिषदेतून आपली भूमिका स्पष्ट केली. कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव तसेच मिळणाऱ्या पाठिंब्यामुळे आपण निर्णय बदलल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू असलेले आनंदराज आंबेडकर यांनी ‘रिपब्लिकन सेना’ या पक्षावर अमरावती लोकसभा मतदारसंघातून २ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. उमेदवारी अर्ज दाखल करताना निघालेल्या त्यांच्या रॅलीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी न झाल्याने त्यांनी दुसऱ्याच दिवशीच म्हणजेच ३ एप्रिलला सायंकाळी आपण उमेदवारी मागे घेत असल्याचे जाहीर पत्र काढून ‘वंचित’ला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु ४ एप्रिल रोजी वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी आनंदराज आंबेडकर यांना पाठिंबा देत ‘वंचित’चा उमेदवार अर्ज दाखल करणार नसल्याचे पत्र काढले होते. मात्र यानंतरही आनंदराज आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा हा फसवा असल्याचे सांगत त्यांनी उमेदवारी मागे घेण्याच्या निर्णयावर ते ठाम असल्याचे जाहीर केले होते.

त्यानंतर मागील दोन दिवसांपासून ते आपल्या निर्णयाबद्दल मौन बाळगून होते. अशातच त्यांनी रविवारी आपण निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले. अमरावतीमधून आंबेडकरी समाजाचे नेतृत्व करणारा एकही पक्ष नसल्याने तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा वारंवार आग्रहामुळे निवडणूक लढण्याचा निर्णय घेत असल्याचे आनंदराज यांनी स्पष्ट केले. यावेळी रिपब्लिकन सेनेचे प्रदेशाध्यक्ष काकासाहेब खांबाळकर, ‘वंचित’चे जिल्हाध्यक्ष शैलेश गवई, रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष अनिल बरडे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Amravatiअमरावती