शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

अमरावती विभागातील तीन जिल्ह्यांमध्ये दुष्काळाचा प्रथम ट्रिगर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 12:48 IST

आता शासनस्तरावर दुष्काळ जाहीर करण्याचे परिमाण व परिभाषा बदलली आहे. पावसाळ्याच्या चार महिन्यांत सरासरीपेक्षा ७५ टक्के पाऊस कमी असल्याने अमरावती, यवतमाळ व वाशीम जिल्ह्यात दुष्काळाचा प्रथम ट्रिगर लागू होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्दे७५ टक्क््यांंपेक्षा कमी पाऊस परिभाषा, परिमाण बदलले; सुधारित बदल लागू

आॅनलाईन लोकमतअमरावती : आता शासनस्तरावर दुष्काळ जाहीर करण्याचे परिमाण व परिभाषा बदलली आहे. पावसाळ्याच्या चार महिन्यांत सरासरीपेक्षा ७५ टक्के पाऊस कमी असल्याने अमरावती, यवतमाळ व वाशीम जिल्ह्यात दुष्काळाचा प्रथम ट्रिगर लागू होण्याची शक्यता आहे. संबंधित जिल्ह्यातील दुष्काळ देखरेख समितीद्वारा कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय समितीला दर आठवड्याला अहवाल व पाठपुरावा करावा लागणार आहे.शासन जाहीर करीत असलेली खरिपाची हंगामी, सुधारित व अंतिम पैसेवारी आणि कमी उत्पन्नावर दुष्काळ जाहीर करण्याची पद्धत यामध्ये आता बदल करण्यात आला आहे. केंद्र शासनाने दुष्काळ व्यवस्थापन संहिता २००९ मध्ये सुधारणा करून आता सुधारित दुष्काळ व्यवस्थापन संहिता २०१६ जाहीर केली आहे. यामध्ये शास्त्रीय निकष व सुधारित कार्यपद्धती विशद केली आहे. ही पद्धत या वर्षापासून राज्यानेही स्वीकारली आहे. दुष्काळी परिस्थितीवर देखरेख ठेवण्यासाठी प्रामुख्याने पर्जन्यमान, वनस्पती निर्देशांक, मृदा आर्द्रता निर्देशांक, जलविषयक निर्देशांक व पिकांचे क्षेत्रीय सर्वेक्षण, सत्यापन विचारात घेऊन समित्यांचे गठण करण्यात आले आहे. यामध्ये पर्जन्यमानाशी निगडित निर्देशांक हा पहिलाच घटक आहे. यानंतर प्रभावदर्शक निर्देशांक यामध्ये वनस्पतीशी निगडित निर्देशांक, सामान्य फरक आर्द्रता निर्देशांक, वनस्पती स्थिती निर्देशांक, लागवडीखालील क्षेत्र, मृदा आर्द्रता निर्देशांक तसेच जलविषयक निर्देशांक यामध्ये भूजल पातळी निर्देशांकाचा समावेश आहे. एकंदर दुष्काळ जाहीर करण्याची प्रक्रियाच शासनाने क्लिष्ट केली आहे. यानंतर तीन टप्प्यांमध्ये दुष्काळाची तपासणी केली जाणार आहे. एवढ्यावरच ही प्रक्रिया संपत नाही, तर यानंतर दुष्काळी स्थितीवर नियंत्रण ठेवून त्याचे मूल्यांकन करण्यासाठी कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय व जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा समिती मॉनिटरिंंग करणार आहे.असा आहे पर्जन्यमानाशी निगडित निर्देशांकदुष्काळासंदर्भात हा अनिवार्य निर्देशांक आहे. यामध्ये पर्जन्यमानाचे विचलन, पर्जन्यमानातील खंड तसेच जून व जुलै महिन्यात एकूण सरासरी पर्जन्याच्या ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस असल्यास व जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरी पर्जन्यमान ७५ टक्कयांपेक्षा कमी असल्यास दुष्काळाची प्रथम कळ लागू होणार आहे. पर्जन्यमानाच्या नोंदी तालुकानिहाय घेण्यात येतील. विभागातील अमरावती जिल्ह्यात सरासरीच्या ६७.३ टक्के, यवतमाळ जिल्ह्यात ६२ व वाशीम जिल्ह्यात ७२.९ टक्के पावसाची नोंद असल्याने या जिल्ह्यांमध्ये पावसाचा प्रथम ट्रिगर लागू होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Rainपाऊस