शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
5
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
6
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
7
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
8
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
10
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
11
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
12
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
13
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
14
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
15
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
16
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
17
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
18
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
19
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
20
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...

अमरावती विभागातील तीन जिल्ह्यांमध्ये दुष्काळाचा प्रथम ट्रिगर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 12:48 IST

आता शासनस्तरावर दुष्काळ जाहीर करण्याचे परिमाण व परिभाषा बदलली आहे. पावसाळ्याच्या चार महिन्यांत सरासरीपेक्षा ७५ टक्के पाऊस कमी असल्याने अमरावती, यवतमाळ व वाशीम जिल्ह्यात दुष्काळाचा प्रथम ट्रिगर लागू होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्दे७५ टक्क््यांंपेक्षा कमी पाऊस परिभाषा, परिमाण बदलले; सुधारित बदल लागू

आॅनलाईन लोकमतअमरावती : आता शासनस्तरावर दुष्काळ जाहीर करण्याचे परिमाण व परिभाषा बदलली आहे. पावसाळ्याच्या चार महिन्यांत सरासरीपेक्षा ७५ टक्के पाऊस कमी असल्याने अमरावती, यवतमाळ व वाशीम जिल्ह्यात दुष्काळाचा प्रथम ट्रिगर लागू होण्याची शक्यता आहे. संबंधित जिल्ह्यातील दुष्काळ देखरेख समितीद्वारा कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय समितीला दर आठवड्याला अहवाल व पाठपुरावा करावा लागणार आहे.शासन जाहीर करीत असलेली खरिपाची हंगामी, सुधारित व अंतिम पैसेवारी आणि कमी उत्पन्नावर दुष्काळ जाहीर करण्याची पद्धत यामध्ये आता बदल करण्यात आला आहे. केंद्र शासनाने दुष्काळ व्यवस्थापन संहिता २००९ मध्ये सुधारणा करून आता सुधारित दुष्काळ व्यवस्थापन संहिता २०१६ जाहीर केली आहे. यामध्ये शास्त्रीय निकष व सुधारित कार्यपद्धती विशद केली आहे. ही पद्धत या वर्षापासून राज्यानेही स्वीकारली आहे. दुष्काळी परिस्थितीवर देखरेख ठेवण्यासाठी प्रामुख्याने पर्जन्यमान, वनस्पती निर्देशांक, मृदा आर्द्रता निर्देशांक, जलविषयक निर्देशांक व पिकांचे क्षेत्रीय सर्वेक्षण, सत्यापन विचारात घेऊन समित्यांचे गठण करण्यात आले आहे. यामध्ये पर्जन्यमानाशी निगडित निर्देशांक हा पहिलाच घटक आहे. यानंतर प्रभावदर्शक निर्देशांक यामध्ये वनस्पतीशी निगडित निर्देशांक, सामान्य फरक आर्द्रता निर्देशांक, वनस्पती स्थिती निर्देशांक, लागवडीखालील क्षेत्र, मृदा आर्द्रता निर्देशांक तसेच जलविषयक निर्देशांक यामध्ये भूजल पातळी निर्देशांकाचा समावेश आहे. एकंदर दुष्काळ जाहीर करण्याची प्रक्रियाच शासनाने क्लिष्ट केली आहे. यानंतर तीन टप्प्यांमध्ये दुष्काळाची तपासणी केली जाणार आहे. एवढ्यावरच ही प्रक्रिया संपत नाही, तर यानंतर दुष्काळी स्थितीवर नियंत्रण ठेवून त्याचे मूल्यांकन करण्यासाठी कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय व जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा समिती मॉनिटरिंंग करणार आहे.असा आहे पर्जन्यमानाशी निगडित निर्देशांकदुष्काळासंदर्भात हा अनिवार्य निर्देशांक आहे. यामध्ये पर्जन्यमानाचे विचलन, पर्जन्यमानातील खंड तसेच जून व जुलै महिन्यात एकूण सरासरी पर्जन्याच्या ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस असल्यास व जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरी पर्जन्यमान ७५ टक्कयांपेक्षा कमी असल्यास दुष्काळाची प्रथम कळ लागू होणार आहे. पर्जन्यमानाच्या नोंदी तालुकानिहाय घेण्यात येतील. विभागातील अमरावती जिल्ह्यात सरासरीच्या ६७.३ टक्के, यवतमाळ जिल्ह्यात ६२ व वाशीम जिल्ह्यात ७२.९ टक्के पावसाची नोंद असल्याने या जिल्ह्यांमध्ये पावसाचा प्रथम ट्रिगर लागू होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Rainपाऊस