शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
4
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
5
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
6
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
7
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
8
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
9
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
10
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
11
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
12
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
13
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
14
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
15
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
16
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
17
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
18
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
19
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
20
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...

आंदोलनाने गाजला आठवड्याचा पहिला दिवस

By admin | Updated: October 6, 2015 00:31 IST

आठवडयाच्या पहिल्याच दिवशी विविध सामाजिक संघटनासह नागरिक व राजकीय पक्षाच्या नेत्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले.

निवेदने, धरणे : जिल्हा कचेरीवर नागरिकांनी गर्दीअमरावती : आठवडयाच्या पहिल्याच दिवशी विविध सामाजिक संघटनासह नागरिक व राजकीय पक्षाच्या नेत्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. यावेळी निवेदक, धरणे, आणि निदर्शकांनी गर्दी केल्याने या परीसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयात सभागृहात लोकशाही दिवसाचे कामकाज सुरू असल्याने ही गर्दी खोळंबून राहीली.मात्र अशातच लोकशाही दिन संपताच जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी आंदोलन कर्त्याची निवेदने स्विकारलीत. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या मदतीसाठी प्रहारची धडक जिल्ह्यातील सोयाबीन ,संत्रा, कापुस व सर्व पिकांना दिवाळी पर्यत सरसकट प्रती हेक्टर ५० हजार रूपये नुकसान भरपाई देण्यात यावी, रखडलेले ठिंबक व स्पिंकलर पाईपचे अनुदान देण्यात यावे, हद्य विकाराच्या झटक्याने मरण पावणाऱ्या शेतकऱ्यांना नैसगीक आपत्तीमध्ये समाविष्ट करण्यात यावे आदी मागण्यासाठी प्रहार पक्षाचे वतीने सोमवारी जिल्हाकचेरीवर धडक दिली. यावेळी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी आंदोलन कर्त्याशी दालना बाहेर येऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्यादरम्यान जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी सोयाबीन , संत्रा फळाची प्रत्यक्ष आंदोलन क र्त्यासमोर पाहणी केली आणि याबाबत शासनाकडे योग्य तो पाठपुरावा करण्याचे आश्वासन देण्यात आले यावेळी मंगेश देशमुख, राजेश वाटाणे, भाष्कर सायंदे, अजय तायडे, सागर धनसांडे, मंगेश शळके, सुरज चव्हाण, संजय राऊत , अविनाश बायस्कर व पदाधिकारी उपस्थित होते.शासकीय योजनाची अंमलबजावणी शेतकऱ्यांपर्यत कराशेतकऱ्याच्या विकासासाठी राज्य व केंद्र शासनाच्या विकास योजना शेतकऱ्यांन पर्यत पोहचविण्यासाठी शेतकरी मित्राना माहीती देण्यात यावी यासह इतर मागण्याचे निवेदन सोमवारी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्याक डे निवेदनाव्दारे केली आहे.शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनातील प्रमुख मागण्यामध्ये शेतकरी मित्रांना कामाचा मोबदला म्हणून रोख रक्कम देण्यात यावी, किड सर्वेक्षक , किड नियंत्रक म्हणून अनुभवी शेतकरी मित्रांची निवड करण्यात यावी, अशा विविध मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. यावेळी अर्चना सवाई, प्रमोद बांबल, श्यामकांत सनके, पुडंलीक खोबरखेडे, विनोद धंदर, चरणदास ठाकरे, पुरूषोत्तम कथे, निलेश बोबडे मनोज खटे, आदी उपस्थित होते.महागाई विरोधात भाकपचे जिल्हाकचेरीवर निदशर््नेकेंद्रात दिड वर्षापूर्वी सत्तेत आलेल्या भाजपा सरकारने महागाई वर नियंत्रण आण्यापेक्षा महागाई वालविण्याचा उच्चांक गाठला आहे.त्यामुळे वाढलेल्या जिवनावश्यक वस्तुचे भाव कमी करण्यात यावे यासाठी सोमवारी भारतीय कम्युनिष्ठ पक्षाचे वतीने जिल्हाकचेरी समोर निदर्शने केली. यावेळी मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.सन २०१४ च्या तुलनेत महागाई मध्ये १२ टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे केंद्र शासनाने सर्व प्रकारच्या डाळी, खाण्याचे तेल, साखर, औषधे, कापड अशा वस्तुचे वाढलेले दर कमी करण्यात यावे अशी मागणी भाकपने निवेदनाव्दारे केली आही. यावेळी तुकाराम भस्मे, शरद सुरजुसे, जे.एम कोठारी , उमेश बनसोड, अशोक सोनारकर, सुनिल मेटकर, सुनिल घटाळे, गणेश अवझाडे, उषा घटाळे, इंदु बोकेशरद मंगळे बी.के जाधव आणि पदाधिकारी उपस्थित होते.शासकीय जागेवरील भूखंड कायम करातिवसा तालुक्यातील गुरूदेव नगर येथील हनुमान नगर येथील शासकीय जागेवर राहत असलेल्या नागरिकांचे घरांचे बांधकाम आणि शासकीय भूखंड कायम क रण्यात यावे अशी मागणी सोमवारी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्याकडे निवेदनाव्दारे शेकडो नागरिकांनी केली आहे.