शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

सुकळी कंपोस्टची आग ग्रामस्थांच्या जिव्हारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 21:47 IST

सुकळी कंपोस्ट डेपोतील कचऱ्याला लागलेली आग पंधरवडापासून धुमसत आहे. त्यातून निघणाऱ्या घातक तथा विषारी धुरामुळे ग्रामस्थांच्या आरोग्यावर दुष्परिणाम जाणवत आहे.

ठळक मुद्देजनआंदोलनाचा इशारा : घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प केव्हा?

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सुकळी कंपोस्ट डेपोतील कचऱ्याला लागलेली आग पंधरवडापासून धुमसत आहे. त्यातून निघणाऱ्या घातक तथा विषारी धुरामुळे ग्रामस्थांच्या आरोग्यावर दुष्परिणाम जाणवत आहे. त्याअनुषंगाने तीन दिवसांत तेथील कचरा विलगीकरण प्रक्रिया करावी, अन्यथा उसळणाऱ्या जनआंदोलनाला महापालिका प्रशासन जबाबदार असेल, असा इशारा सुकळी व लगतच्या ग्रामस्थांनी दिला आहे. याप्रकरणी महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले.निविदानानुसार, सुकळी कंपोस्ट डेपोची कचरा साठवणुकीची मर्यादा केव्हाच संपुष्टात आली असताना तेथे रोज ३०० टन कचरा विनाप्रक्रिया टाकला जात आहे. त्यात घरगुती कचऱ्यासह प्लास्टिक, ओला व सुका कचरा, जैववैद्यकीय कचरा, ब्लेड, सॅनिटरी नॅपकिन, डायपरचा समावेश आहे. तेथे कचऱ्याचा डोंगर साचला असून त्याला वारंवार आग लागत आहे. आग आणि धुरातून निघणाऱ्या विषारी वायुमुळे सुकळीसोबतच अमरावती शहराचे पर्यावरण धोक्यात आले आहे. हवा प्रदूषित झाली असून, स्थानिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्याबाबत १७ आॅक्टोबरला पर्यावरणस्रेही नंदकिशोर गांधी यांनी महापालिकेस निवेदनही दिले. सोबतच सुकळी कंपोस्ट डेपोलगत ज्यांची शेती आहे, त्या शेतकऱ्यांनीही निवेदन दिले. मात्र महापालिकेकडून अद्यापही सुकळी कंपोस्ट डेपो, तेथील आग व अन्य प्रश्न सोडविता आले नाहीत. २५ आॅक्टोबर रोजी पुन्हा आयुक्तांसह महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, पालकमंत्री तथा महापौरांना निवेदन दिल्याची माहिती मो. अकील यांनी दिली. तीन दिवसांत सुकळी कंपोस्ट डेपोतील कचरा विलगीकरण व प्रक्रिया करावी, अन्यथा जनआंदोलनाचा इशारा मो. शकील, राममिलन वर्मा, सादिक शहा, मो. अफसर, वि.दा.पवार आदींनी आयुक्तांना निवेदानातून दिला आहे. प्रशासनाने घनकचरा व्यवस्थापन नियम २०००, २००६ व २०१६ ची पायमल्ली चालविली आहे.