शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

सुकळी कंपोस्टची आग ग्रामस्थांच्या जिव्हारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 21:47 IST

सुकळी कंपोस्ट डेपोतील कचऱ्याला लागलेली आग पंधरवडापासून धुमसत आहे. त्यातून निघणाऱ्या घातक तथा विषारी धुरामुळे ग्रामस्थांच्या आरोग्यावर दुष्परिणाम जाणवत आहे.

ठळक मुद्देजनआंदोलनाचा इशारा : घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प केव्हा?

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सुकळी कंपोस्ट डेपोतील कचऱ्याला लागलेली आग पंधरवडापासून धुमसत आहे. त्यातून निघणाऱ्या घातक तथा विषारी धुरामुळे ग्रामस्थांच्या आरोग्यावर दुष्परिणाम जाणवत आहे. त्याअनुषंगाने तीन दिवसांत तेथील कचरा विलगीकरण प्रक्रिया करावी, अन्यथा उसळणाऱ्या जनआंदोलनाला महापालिका प्रशासन जबाबदार असेल, असा इशारा सुकळी व लगतच्या ग्रामस्थांनी दिला आहे. याप्रकरणी महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले.निविदानानुसार, सुकळी कंपोस्ट डेपोची कचरा साठवणुकीची मर्यादा केव्हाच संपुष्टात आली असताना तेथे रोज ३०० टन कचरा विनाप्रक्रिया टाकला जात आहे. त्यात घरगुती कचऱ्यासह प्लास्टिक, ओला व सुका कचरा, जैववैद्यकीय कचरा, ब्लेड, सॅनिटरी नॅपकिन, डायपरचा समावेश आहे. तेथे कचऱ्याचा डोंगर साचला असून त्याला वारंवार आग लागत आहे. आग आणि धुरातून निघणाऱ्या विषारी वायुमुळे सुकळीसोबतच अमरावती शहराचे पर्यावरण धोक्यात आले आहे. हवा प्रदूषित झाली असून, स्थानिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्याबाबत १७ आॅक्टोबरला पर्यावरणस्रेही नंदकिशोर गांधी यांनी महापालिकेस निवेदनही दिले. सोबतच सुकळी कंपोस्ट डेपोलगत ज्यांची शेती आहे, त्या शेतकऱ्यांनीही निवेदन दिले. मात्र महापालिकेकडून अद्यापही सुकळी कंपोस्ट डेपो, तेथील आग व अन्य प्रश्न सोडविता आले नाहीत. २५ आॅक्टोबर रोजी पुन्हा आयुक्तांसह महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, पालकमंत्री तथा महापौरांना निवेदन दिल्याची माहिती मो. अकील यांनी दिली. तीन दिवसांत सुकळी कंपोस्ट डेपोतील कचरा विलगीकरण व प्रक्रिया करावी, अन्यथा जनआंदोलनाचा इशारा मो. शकील, राममिलन वर्मा, सादिक शहा, मो. अफसर, वि.दा.पवार आदींनी आयुक्तांना निवेदानातून दिला आहे. प्रशासनाने घनकचरा व्यवस्थापन नियम २०००, २००६ व २०१६ ची पायमल्ली चालविली आहे.