शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

अमरावतीकरांचे नियमांना ‘फटाके’, आकाशात प्रदुषणकारी आतषबाजी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2021 05:01 IST

दिवाळी आणि फटाके हे समीकरण एकमेकांशी घट्ट असल्याने फटाक्यांशिवाय दिवाळी साजरीच होऊ शकत नाही, हे सत्य असले तरीही प्रदूषणाची समस्या पाहता दिवाळीत फटाक्यांचा अट्टहास नको, यासाठी जिल्हा व पोलीस प्रशासनाकडून स्वतंत्र  नियमावली जाहीर करण्यात आली. मात्र, ४ नोव्हेंबर रोजी रात्रभर झालेली आतषबाजी व फुटलेल्या फटाक्यांनी त्याला शहरात तिलांजली मिळाली. फटाक्यांची आतषबाजी वायू व ध्वनी प्रदुषण निर्माण करते. त्याचे विपरीत परिणाम दिवाळीनंतरही अनेक दिवसांपर्यंत दिसून येतात.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: कोरोनाची दुसरी लाट ओसरली तरीही धोका संपलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन गर्दी करू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले होते. फटाके उडविण्यासाठी रात्री ८ ते १० अशी मर्यादा देखील आखून देण्यात आली. मात्र, ‘दिवाळसण मोठा, नाही आनंदाला तोटा’ या उक्तीला जागत गुरूवारी कोरोना ओसरल्याच्या आनंदात प्रदुषणकारी फटाक्यांची दिवाळी साजरी करण्यात आली. शहरवासियांनी नियमांना ‘फटाके’ लावले.  अख्ख्या रात्रभर प्रदुषणार भर पडली. कारवाई केली ती केवळ पोलिसांनी. बाकी महापालिकेच्या पर्यावरण विभागाला व प्रदूषण नियंत्रण मंडळाला त्याचे काहीही सोयरसुतूक नव्हते. दिवाळी आणि फटाके हे समीकरण एकमेकांशी घट्ट असल्याने फटाक्यांशिवाय दिवाळी साजरीच होऊ शकत नाही, हे सत्य असले तरीही प्रदूषणाची समस्या पाहता दिवाळीत फटाक्यांचा अट्टहास नको, यासाठी जिल्हा व पोलीस प्रशासनाकडून स्वतंत्र  नियमावली जाहीर करण्यात आली. मात्र, ४ नोव्हेंबर रोजी रात्रभर झालेली आतषबाजी व फुटलेल्या फटाक्यांनी त्याला शहरात तिलांजली मिळाली. फटाक्यांची आतषबाजी वायू व ध्वनी प्रदुषण निर्माण करते. त्याचे विपरीत परिणाम दिवाळीनंतरही अनेक दिवसांपर्यंत दिसून येतात. कोरोना आजार झालेल्या किंवा यापूर्वी होऊन गेलेल्या नागरिकांना फटाक्यांच्या धुरामुळे प्रदुषणाचा त्रास होण्याची भीती आहे. हे लक्षात घेऊन नागरिकांनी फटाके फोडण्याचे टाळावे. त्याऐवजी दिव्यांची आरास करून उत्सव साजरा करावा, असे  जिल्हाधिकाऱ्यांनी केलेले आवाहन धनतेरसपासून हवेत विरले.

सर्वोच्च न्यायालयाचे आदेश पायदळी पर्यावरणपूरक दिवाळीसाठी केंद्र सरकारने यंदा  ग्रीन फटाके बाजारात आणले आहेत. यामध्ये पेन्सिल, फुलबाजी, सुतळी बॉम्ब, भुईचक्र या फटाक्यांचा समावेश आहे. नेहमीच्या फटाक्यांपेक्षा या फटाक्यांमुळे ३० टक्के कमी प्रदूषण होते. २०१८ मध्ये सुप्रीम कोर्टाने फटाक्यांवर निर्बंध घातले होते. यानंतर या ग्रीन फटाक्यांचा विचार झाला. ग्रीन कॅकर्स वापरावेत, अशी सुचना करण्यात आली. मात्र, दुसरीकडे अमरावती पोलिसांनी शहरातील अनेक ठिकाणी कारवाई करून प्रतिबंधित फटाके जप्त केले. अनेक विक्रेत्यांनी  प्रतिबंधित फटाक्यांची दणकून विक्री केली. अशा विक्रेत्यांवर व रात्री १० नंतर आतषबाजी करणाऱ्यांवर नागपुरी गेट, कोतवाली, राजापेठ, फ्रेजरपुरा व गाडगेनगर पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचे उल्लंघन करून रात्री १० नंतर फटाके फोडताना व प्रतिबंधित फटाके विक्री करणाऱ्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. गुरूवारी रात्री त्यासाठी ‘ऑलआऊट’ मोहिम राबविली. नागरिकांनी विहित वेळेत सामुदायिकरित्या फटाके फोडावेत. - डॉ. आरती सिंह, पोलीस आयुक्त

- विक्रेत्यांकडूनही नियमांना तिलांजली देण्यात आली. कमी उत्सर्जन करणारे आणि ग्रीन क्रॅकर्स फटाक्यांची विक्री करण्याची परवानगी होती. मात्र प्रतिबंधित फटाके विकले गेले.

 

टॅग्स :Diwaliदिवाळी 2021Crackers Banफटाके बंदी