शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
5
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
6
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
7
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
8
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
9
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
10
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
11
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
12
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
13
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
14
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
15
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
16
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
17
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
18
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
19
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
20
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

पोलीस ठाण्यावर हल्ला करून पेटविली स्वातंत्र्याची मशाल !

By admin | Updated: August 9, 2015 00:37 IST

बेनोडा, इत्तमगाव, लोणी या भागातील जनतेने सरकारवर हात न उचलता अगदी गांधीगिरीने हसत-हसत मृत्युच्या दाढेत ...

वरुड : बेनोडा, इत्तमगाव, लोणी या भागातील जनतेने सरकारवर हात न उचलता अगदी गांधीगिरीने हसत-हसत मृत्युच्या दाढेत जाण्याचा जो पराक्रम केला तो आफ्रिकेत महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली झालेल्या सत्याग्रहाच्या तोडीचा किंबहुना त्याहूनही अधिक उदात्त असा होता, असे म्हणायला हवे.धवलगिरीच्या लढ्याला संग्राम म्हणण्यापेक्षा तो खऱ्या सत्याग्रहच होता, हे म्हणणे अधिक संयुक्तीक ठरेल. या ठिकाणी कुण्या पोलिसावर ती तलवार चालविली नाही. महात्मा गांधीच्या भाषेत सांगायचे झाले तर ‘क्रोधात येऊन विवेक गमाविलेल्या स्थितीत कुणाचे बळी घेण्यापेक्षा स्वत: मरण पत्करुन शत्रूचे हृदय परिवर्तन करणे हे अधिक उदात्त व श्रेष्ठ जीवनमूल्य होय’ या परीक्षेला धवलगिरीचा परिसर उतरला खरा उतरला.१५ आॅगस्ट १९४७ हा दिवस देश स्वातंत्र्याचा पहिल्या सूर्योदयाने साजरा केला गेला. त्यावेळी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर तिरंगा फडकला. तिरंगा फडकविण्यासाठी देशवासीयांनी जो त्याग केला त्यापैकी बेनोडा (शहीद) चा रणसंग्राम काही औरच होता. आजही शहीदस्तंभ त्या दिवसाची आठवण येणाऱ्या पिढीकरिता प्रेरणादायी ठरत आहे.९ आॅगस्ट क्रांतीदिन म्हणजे ९ आॅगस्ट १९४२ रोजी ‘इंग्रजांना भारत छोडो’चा इशारा देऊन राष्ट्रपिता महात्मा गांधींनी ‘करा या मरा’चा नारा दिला. या एका शब्दाने संपूर्ण भारत पेटून उठला. याचा परिणाम वरुड तालुक्यातील बेनोडा (शहीद) परिसरातील गावेसुध्दा मागे राहिली नाहीत. यामध्ये इत्तमगाव, लोणी, बेनोडा ही गावेसुध्दा अग्रेसर होती. केशवराव ताथोडे, श्रावण फरकाडे, महादेवराव क्षीरसागर, वामनराव पाटील, बाबूशेठ चांडक, पंजाबराव सदातपुरे, लालजी कानफाडे आणि त्यांचे बंधूंसह आदी देशभक्तांमध्ये क्रांतीची ज्वाला भडकली. ‘चले जाव’चा नारा वरुड परिसरात बुलंद करण्यात आला. या काळात जनजागृतीसाठी अनेक आंदोलने झालीत. प्रभातफेरी निघाली, पटवाऱ्यांची दफ्तरे ताब्यात घेण्यात आलीत. सरकारी कार्यालयावर तिरंगा फडकविण्यात आला. शेकडो देशभक्तांची धरपकड झाली. जाहीर सभा घेताना अनेकांना कारागृहात डांबण्यात आले. १६ आॅगस्ट १९४२ रोजी सकाळी ८ वाजता इत्तमगावचे वीर वामनराव पाटील यांच्या नेतृत्वात बेनोडा येथे क्रांती दिंडी निघाली. या दिंडीत करजगाव, परसोडा, बेलोरा, सावंगा, इत्तमगाव, येथील शेकडो सत्याग्रही सहभागी झाले होते. लोकमान्य टिळकांच्या नेतृत्त्वापासून या परिसरातील युवक राष्ट्रीय भावनेने प्रेरित होऊन स्वातंत्र्याच्या युध्दात सहभागी झाले होते. यादवराव खांडपासोळे, शेषराव मुधोळकर, बळीराम फरकाडे यांनी सत्याग्रहाची दिशा ठरविण्यासाठी गोपनीय सभा घेतली. यावेळी बेनोडा येथे कार्यरत सबइन्स्पेक्टर निंबाळकर यांनी त्यांना अटक केली. यामुळे संतापलेल्या युवकांनी आक्रमक पाऊल उचलले. सरकारी दफ्तर जाळण्याची स्वयंस्फूर्त घटना घडली. यामुळे पोलीस खाते सतर्क झाले. या घटनेपूर्वीच अटक झालेले केशवराव बारमासे व गणपतराव चिंचमलातपुरे ठाण्यात उपस्थित होते. पाचही युवकांना अमरावतीच्या तुरुंगात रवाना करण्याच्या दृष्टीने पोलीस बंदोबस्तात नेत असतांना बेनोड्याच्या बसथांब्यावर जमलेल्या लोकांनी पाहिले असताना प्रचंड घोषणाबाजी करुन नेत्यांच्या सुटकेची मागणी केली. या आंदोलनाचे वृत्त सुशिक्षित व तडफदार क्रांतिवीर केशवराव ताथोडे यांना सांगण्याकरिता पुंडलिकराव गोहाड आणि अयुबभाई बेलोऱ्याला रवाना झाले. स्वातंत्र्य प्राप्तीकरिता युवकांनी पुढाकार घेऊन आॅगस्ट क्रांतीची ज्वाला पेटविली. यामुळे तत्कालीन डीएसपीने कुणाचाही मुलाहिजा न करण्याचा आदेश दिला. यामुळे पोलिसांनी दडपशाही करण्यास प्रारंभ केला. यावेळी शेषराव मुधोळकर, बळीराम फरकाडेंसह अनेकांना तुरूंगात डांबण्यात आले. १६ आॅगस्ट १९४२ रोजी नागपंचमीच्या दिवशी धवलगिरीच्या पावनकाठी धरतीमातेला बेनोड्याच्या सुपुत्रांनी रक्ताचा अभिषेक केला आणि क्रांतीची मशाला पेटविली. लोणी, करजगाव, पळसवाडा, इत्तमगाव, बेलोरा, सावंगा, बेनोडा आदी गावामध्ये महात्मा गांधींच्या ‘करा किंवा मरा’ या मंत्राने बलिदानाचे वारे वाहू लागले होते. या अनुषंगाने ठाणाठुणीच्या जंगलात केशवराव ताथोडे यांच्या नेतृत्वात कार्यक्रम ठरविण्याकरिता गोपनीय बैठक घेण्यात आली. यावेळी पकडले गेले किंवा मृत्यू झाल्यास उत्तरार्धाची जबाबदारी कोण सांभाळणार हा प्रश्न निर्माण झाला होता. यामुळे ताथोडे यांना भूमिगत ठेवून कार्य करण्याची सूचना देण्यात आली. बेनोड्याची क्रांती गाथा आज ९ आॅगस्ट. आॅगस्ट क्रांती दिन. १९४२ साली देशभरात या दिवशी क्रांतीची मशाल पेटली. त्यात अमरावती जिल्हादेखील मागे नव्हता. महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, पंडित जवाहरलाल नेहरू आणि इतर अनेक देशभक्तांच्या पावलांवर पाऊल टाकून स्वातंत्र्यलढ्यात लोक सहभागी होत होते. स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडात आपल्याकडूनही आहुती पडावी, अशी प्रत्येकाचीच धडपड होती. या लढ्यात वरूड तालुक्यातील बेनोडा या छोट्याशा गावाने दिलेले योगदान अविश्वसनीय असे आहे. संपूर्ण वरूड तालुक्यातील शेकडो देशभक्तांनी बलिदान दिले. तुरूंगवास भोगले, इंग्रजांच्या काठ्या झेलल्या. हजारो लोक भूमिगत झाले. कित्येकांचा तुरूंगातच मृत्यू झाला. त्यांच्या धाडसाच्या, देशभक्तीच्या आणि त्यांनी दिलेल्या बलिदानाच्या सुरस कथा आजही मोठ्या अभिमानाने सांगितले जातात. अशा या देशभक्तांना ‘लोकमत’चा सलाम. बेनोडा पोलीस ठाण्यावर तिरंगा लावण्याचा ध्यास सबंध बेनोडा सर्कल पेटले असताना कोणत्याही घटकेला विपरीत घटना घडू नये म्हणून इंग्रज प्रशासनाने खबरदारीच्या उपायोजना म्हणून बेनोडा ठाणेदाराच्या मदतीला वरुडचे सर्कल इन्स्पेक्टर पाठविले होते. तर गावागावातून स्वातंत्र्य संग्राम सैनिक एकत्र झाले. ठरल्याप्रमाणे सत्याग्रहींचा मोर्चा निघाला. महात्मा गांधींचा जयजयकार करीत 'भारत माता की जय'चा नारा सर्वत्र गरजला. यावेळी वीर वामनराव पाटील यांनी ‘छातीवर गोळ्या झेलण्याची ज्यांची तयारी असेल त्यांनीच फक्त आमच्याबरोबर यावे’ असे आवाहन केले. याचवेळी उपस्थितांनी जयघोष केला ‘ हम तुम्हारे साथ है ’असे म्हणून मिरवणूक पुढे सरकत होती. सर्वत्र गगणभेदी घोषणा गरजल्या. याचवेळी बेनोडा बस थांब्यावर जलालउद्दीन नावाचा कॉन्स्टेबल दिसताच काही उत्साही तरुणांनी सरकारी टोपी आणि पट्टा काढून घेतला. या सत्याग्रहामध्ये १६ आॅगस्टच्या क्रांती लढ्यात पोलिसांनी बेधूंद गोळीबार केला. यामध्ये तिधांना वरीमरण आले. यामध्ये विनायक यावले, महादेव बारमासे आणि पांडुरंग मालपे यांचा समावेश होता. असे असतानादेखील स्वातंत्र्यवीरांचे मनोधैर्य खचले नाही. उलट संतापाने पेटनू उठलेले पोलीस निरीक्षक निंबाळकर यांनी महादेव पावडे यांच्या पोटात गोळी घातली. त्यांना सावरण्याकरिता वीर वामनराव पाटील पुढे सरसावले. त्यांना दुसरी गोळी लागली. दोघेही जमिनीवर कोसळले, शेकडो वीर जवान जखमी झाले. तरीसुध्दा पोलीस ठाण्यावर झेंडा फडकला. या स्वातंत्र्य संग्रामाची आठवण म्हणून बेनोडा येथील शहिदांच्या पावनभूमीत १३ फूट उंचीचा शहीदस्तंभ उभारण्यात येऊन याचे १६ आॅगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य संग्राम सेनानी ब्रिजलाल बियाणी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या पावनभूमीला माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक, शहीद भगतसिंगाचे भाऊ कुलविरसिंगांसह आदींचे चरणस्पर्श लाभले आहे. अशा पध्दतीने अविस्मरणीय असा बेनोड्याचा स्वातंत्र्य संग्राम आहे.