शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

बडनेरा स्थानकाच्या भोजनालयात आग

By admin | Updated: November 2, 2016 00:23 IST

बडनेरा रेल्वे स्थानकावरील एका भोजनालयाला सोमवारच्या रात्री अचानक आग लागल्याने रेल्वे स्थानक परिसरात एकच तारांबळ उडाली.

रेल्वे गाड्या धावल्या उशिरा : प्रवाशांची तारांबळ, अनर्थ टळलाबडनेरा : बडनेरा रेल्वे स्थानकावरील एका भोजनालयाला सोमवारच्या रात्री अचानक आग लागल्याने रेल्वे स्थानक परिसरात एकच तारांबळ उडाली. सुदैवाने आगीवर लवकरच नियंत्रण मिळविल्याने मोठी दुर्घटना टळली. मात्र यामुळे बऱ्याच प्रवासी गाड्या उशिराने धावल्यात. दुरंतो एक्सप्रेस तब्बल तीन तास आऊटरवर थांबून होती. सोमवारच्या रात्री १०.४५ वाजता बडनेरा रेल्वे स्थानकावरील वृंदावन नामक भोजनालयात अचानक आग लागली. रेल्वे स्थानकावरील कर्मचाऱ्यांना भोजनालयातील आगीचा भडका उडाल्याचे दिसून आल्यावर आग विझविण्याचा प्रयत्न सुरु झाला. बडनेरा शहरातच फटाका मार्केटजवळ उभी असलेली अग्निशामकची गाडी तत्काळ घटनास्थळी पोहोचल्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. या आगीत भोजनालयातील लाकडी छत जळाले. भोजनालयात ४ ते ५ सिलिंडर होते. या सिलेंडरचा भडका झाला असता तर मोठ्या दुर्घटनेला सामोरे जावे लागले असते. रेल्वेच्या विद्युत विभागाने टाकळी ते टीमटाळा पर्यंतचा रेल्वेचा विद्युत पुरवठा बंद केला होता. ही आग कशामुळे लागली, याची चौकशी रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी करीत आहे. ज्या भोजनालयात आग लागली त्याचे नूतनीकरण केले जात आहे. वायरिंगचेदेखील काम सुरू आहे. या कामात कुठला हलगर्र्र्र्जीपणा झाला काय हेदेखील तपासला जात आहे. चार तास रेल्वेचा विद्युत पुरवठा बंद असल्यामुळे प्रवासी गाड्या उशीराने धावण्यात दुरंतो एक्सप्रेस तब्बल तीन तास आउटवर थांबून होती. अमरावती- उदणा, सेवाग्राम एक्सप्रेस, माळदा, पॅसेंजर या गाड्या उशिराने धावल्यामुळे प्रवाशांना बऱ्याचवेळ पर्यंत ताटकळत राहावे लागले. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी तीन अग्निशमन बंबांचा वापर करावा लागला. रेल्वेचे वाणिज्य निरीक्षक व्ही.डी. कुंभारे, स्टेशन मास्टर अनेकर, मुख्य टी.सी. वकील खान, विद्युत अभियंता किशोर लोहबरे, पोलिस निरीक्षक डी.एम. पाटील, रेल्वे सुरक्षा रस्ताचे पटेल यासह अग्निशामक बळाचे कर्मचारी आग विझविण्यासाठी प्रयत्नरत होते. आगीमुळे प्रवाशांची एकच तारांबळ उडाली होती. (प्रतिनिधी)बडनेऱ्यातील बंब आला कामात गेल्या दोन महिन्यांपूर्वीचे महानगरपालिकेत बडनेऱ्यात कायमस्वरुपी अग्निशमन बलाचा एक बंब झोन कार्यालयाच्या आवारात २४ तास ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. हा पाण्याचा बंब शहरातील फटाका मार्केटजवळच उभा होता. तत्क्षण तो बंब घटनास्थळी पोहोचल्यामुळे आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले, अन्यथा रेल्वे स्थानकावर मोठी दुर्घटना घडली असती.