शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
2
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
3
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
5
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
6
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
7
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
8
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
10
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
11
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
12
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
13
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
14
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
15
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
16
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
17
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
18
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
19
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
20
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ

बडनेरा स्थानकाच्या भोजनालयात आग

By admin | Updated: November 2, 2016 00:23 IST

बडनेरा रेल्वे स्थानकावरील एका भोजनालयाला सोमवारच्या रात्री अचानक आग लागल्याने रेल्वे स्थानक परिसरात एकच तारांबळ उडाली.

रेल्वे गाड्या धावल्या उशिरा : प्रवाशांची तारांबळ, अनर्थ टळलाबडनेरा : बडनेरा रेल्वे स्थानकावरील एका भोजनालयाला सोमवारच्या रात्री अचानक आग लागल्याने रेल्वे स्थानक परिसरात एकच तारांबळ उडाली. सुदैवाने आगीवर लवकरच नियंत्रण मिळविल्याने मोठी दुर्घटना टळली. मात्र यामुळे बऱ्याच प्रवासी गाड्या उशिराने धावल्यात. दुरंतो एक्सप्रेस तब्बल तीन तास आऊटरवर थांबून होती. सोमवारच्या रात्री १०.४५ वाजता बडनेरा रेल्वे स्थानकावरील वृंदावन नामक भोजनालयात अचानक आग लागली. रेल्वे स्थानकावरील कर्मचाऱ्यांना भोजनालयातील आगीचा भडका उडाल्याचे दिसून आल्यावर आग विझविण्याचा प्रयत्न सुरु झाला. बडनेरा शहरातच फटाका मार्केटजवळ उभी असलेली अग्निशामकची गाडी तत्काळ घटनास्थळी पोहोचल्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. या आगीत भोजनालयातील लाकडी छत जळाले. भोजनालयात ४ ते ५ सिलिंडर होते. या सिलेंडरचा भडका झाला असता तर मोठ्या दुर्घटनेला सामोरे जावे लागले असते. रेल्वेच्या विद्युत विभागाने टाकळी ते टीमटाळा पर्यंतचा रेल्वेचा विद्युत पुरवठा बंद केला होता. ही आग कशामुळे लागली, याची चौकशी रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी करीत आहे. ज्या भोजनालयात आग लागली त्याचे नूतनीकरण केले जात आहे. वायरिंगचेदेखील काम सुरू आहे. या कामात कुठला हलगर्र्र्र्जीपणा झाला काय हेदेखील तपासला जात आहे. चार तास रेल्वेचा विद्युत पुरवठा बंद असल्यामुळे प्रवासी गाड्या उशीराने धावण्यात दुरंतो एक्सप्रेस तब्बल तीन तास आउटवर थांबून होती. अमरावती- उदणा, सेवाग्राम एक्सप्रेस, माळदा, पॅसेंजर या गाड्या उशिराने धावल्यामुळे प्रवाशांना बऱ्याचवेळ पर्यंत ताटकळत राहावे लागले. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी तीन अग्निशमन बंबांचा वापर करावा लागला. रेल्वेचे वाणिज्य निरीक्षक व्ही.डी. कुंभारे, स्टेशन मास्टर अनेकर, मुख्य टी.सी. वकील खान, विद्युत अभियंता किशोर लोहबरे, पोलिस निरीक्षक डी.एम. पाटील, रेल्वे सुरक्षा रस्ताचे पटेल यासह अग्निशामक बळाचे कर्मचारी आग विझविण्यासाठी प्रयत्नरत होते. आगीमुळे प्रवाशांची एकच तारांबळ उडाली होती. (प्रतिनिधी)बडनेऱ्यातील बंब आला कामात गेल्या दोन महिन्यांपूर्वीचे महानगरपालिकेत बडनेऱ्यात कायमस्वरुपी अग्निशमन बलाचा एक बंब झोन कार्यालयाच्या आवारात २४ तास ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. हा पाण्याचा बंब शहरातील फटाका मार्केटजवळच उभा होता. तत्क्षण तो बंब घटनास्थळी पोहोचल्यामुळे आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले, अन्यथा रेल्वे स्थानकावर मोठी दुर्घटना घडली असती.