शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

बडनेरा स्थानकाच्या भोजनालयात आग

By admin | Updated: November 2, 2016 00:23 IST

बडनेरा रेल्वे स्थानकावरील एका भोजनालयाला सोमवारच्या रात्री अचानक आग लागल्याने रेल्वे स्थानक परिसरात एकच तारांबळ उडाली.

रेल्वे गाड्या धावल्या उशिरा : प्रवाशांची तारांबळ, अनर्थ टळलाबडनेरा : बडनेरा रेल्वे स्थानकावरील एका भोजनालयाला सोमवारच्या रात्री अचानक आग लागल्याने रेल्वे स्थानक परिसरात एकच तारांबळ उडाली. सुदैवाने आगीवर लवकरच नियंत्रण मिळविल्याने मोठी दुर्घटना टळली. मात्र यामुळे बऱ्याच प्रवासी गाड्या उशिराने धावल्यात. दुरंतो एक्सप्रेस तब्बल तीन तास आऊटरवर थांबून होती. सोमवारच्या रात्री १०.४५ वाजता बडनेरा रेल्वे स्थानकावरील वृंदावन नामक भोजनालयात अचानक आग लागली. रेल्वे स्थानकावरील कर्मचाऱ्यांना भोजनालयातील आगीचा भडका उडाल्याचे दिसून आल्यावर आग विझविण्याचा प्रयत्न सुरु झाला. बडनेरा शहरातच फटाका मार्केटजवळ उभी असलेली अग्निशामकची गाडी तत्काळ घटनास्थळी पोहोचल्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. या आगीत भोजनालयातील लाकडी छत जळाले. भोजनालयात ४ ते ५ सिलिंडर होते. या सिलेंडरचा भडका झाला असता तर मोठ्या दुर्घटनेला सामोरे जावे लागले असते. रेल्वेच्या विद्युत विभागाने टाकळी ते टीमटाळा पर्यंतचा रेल्वेचा विद्युत पुरवठा बंद केला होता. ही आग कशामुळे लागली, याची चौकशी रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी करीत आहे. ज्या भोजनालयात आग लागली त्याचे नूतनीकरण केले जात आहे. वायरिंगचेदेखील काम सुरू आहे. या कामात कुठला हलगर्र्र्र्जीपणा झाला काय हेदेखील तपासला जात आहे. चार तास रेल्वेचा विद्युत पुरवठा बंद असल्यामुळे प्रवासी गाड्या उशीराने धावण्यात दुरंतो एक्सप्रेस तब्बल तीन तास आउटवर थांबून होती. अमरावती- उदणा, सेवाग्राम एक्सप्रेस, माळदा, पॅसेंजर या गाड्या उशिराने धावल्यामुळे प्रवाशांना बऱ्याचवेळ पर्यंत ताटकळत राहावे लागले. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी तीन अग्निशमन बंबांचा वापर करावा लागला. रेल्वेचे वाणिज्य निरीक्षक व्ही.डी. कुंभारे, स्टेशन मास्टर अनेकर, मुख्य टी.सी. वकील खान, विद्युत अभियंता किशोर लोहबरे, पोलिस निरीक्षक डी.एम. पाटील, रेल्वे सुरक्षा रस्ताचे पटेल यासह अग्निशामक बळाचे कर्मचारी आग विझविण्यासाठी प्रयत्नरत होते. आगीमुळे प्रवाशांची एकच तारांबळ उडाली होती. (प्रतिनिधी)बडनेऱ्यातील बंब आला कामात गेल्या दोन महिन्यांपूर्वीचे महानगरपालिकेत बडनेऱ्यात कायमस्वरुपी अग्निशमन बलाचा एक बंब झोन कार्यालयाच्या आवारात २४ तास ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. हा पाण्याचा बंब शहरातील फटाका मार्केटजवळच उभा होता. तत्क्षण तो बंब घटनास्थळी पोहोचल्यामुळे आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले, अन्यथा रेल्वे स्थानकावर मोठी दुर्घटना घडली असती.