शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
2
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
3
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
4
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
5
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
6
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
7
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
8
पार्थ अजित पवार जमीन प्रकरणात शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “समाजासमोर वास्तव...”
9
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...
10
उपाशी ठेवलं, बेदम मारलं... पोटच्या लेकाने, सुनेने जमिनीसाठी केले जन्मदात्या आईचे हालहाल
11
"वहिनी, तुमची जोडी जमत नाही, हे काका कोण?", रील्सचं वेड, सर्वस्व असलेल्या नवऱ्याच संपवलं
12
Viral Video: मिरची पूड घेऊन ज्वेलर्समध्ये शिरली, पण प्लॅन फसला! दुकानदारानं २० वेळा थोबाडलं
13
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
14
शेजाऱ्याशी लफडं, गुपित पतीला कळलं; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केली हत्या, मृतदेह नदीत फेकला
15
उद्धव ठाकरेंसमोर व्यथा मांडताना ९० वर्षीय शेतकऱ्याला रडू कोसळले; म्हणाले, “कर्जमाफी...”
16
IND vs AUS 5th T20I : तिलक वर्माला बसवलं बाकावर! टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रिंकूची एन्ट्री
17
जरीन खान यांच्यावर हिंदू पद्धतीने झाले अंत्यसंस्कार, मुलगा झायेदने दिला अग्नी; कारण...
18
कतरिना कैफचे सासरे 'आजोबा' बनल्यानंतर झाले भावुक! 'ज्युनिअर कौशल'साठी शेअर केली प्रेमळ पोस्ट
19
राहू-केतू गोचर २०२५: राहू केतू तसे तापदायकच, पण नोव्हेंबरमध्ये 'या' ८ राशींवर होणार मेहेरबान!
20
Railway: धावत्या ट्रेनला गरुडाची समोरून धडक, जखमी होऊनही लोको पायलटनं प्रसंगावधान दाखवलं, नाही तर...

‘आधार’वरील बोटांच्या ठशांसाठी भुर्दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 21:56 IST

पाच वर्षानंतर आधार कार्डवरील हातांच्या बोटांचे ठसे जुळत नसल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

ठळक मुद्देपाच वर्षानंतर आधार कार्डवरील हातांच्या बोटांचे ठसे जुळत नसल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पाच वर्षानंतर आधार कार्डवरील हातांच्या बोटांचे ठसे जुळत नसल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. परंतु आता त्यासाठी देखील शेतकºयांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतोय.सद्यस्थितीत अनेक शेतकरी कर्जमाफीचे आॅनलाईन अर्ज भरत आहेत. मात्र, आधारवरील त्यांच्या बोटांचे ठसे जुळत नसल्याने त्यांना बाहेरगावी जाऊन बोटांचे ठसे जुळवून घ्यावे लागत आहे. यामुळे शेतकरी वर्ग हैराण आहे.काही वर्षांपूर्वी शासनाने प्रत्येक नागरिकाला ‘आधार कार्ड’ अनिवार्य केले. त्यावेळी परिसरात ठिकठिकाणी आधार नोंदणी केंद्र उघडण्यात आले होते. लांबच लांब रांगा लाऊन नागरिकांनी आधार कार्ड काढले. आधार कार्ड हे शासनाच्या विविध योजनांसाठी बंधनकारक करण्यात आले आहे. यामध्ये बँकेत खाते उघडणे, ओळखपत्र, पॅनकार्ड जोडून घेणे, उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी, वाहनपरवाने यांसह विविध दाखल्यांसाठी आधार कार्ड बंधनकारक आहे. त्यामुळे आधार कार्डबाबत बहुतांश नागरिक जागृत झाले आहेत.आधार कार्ड काढतेवेळी दोन्ही हातांच्या बोटांचे ठसे आणि रेटिनाचे छायाचित्र घेण्यात येते. त्यामुळे संबंधित व्यक्ती तिच आहे की दुसरी आहे हे ओळखणे सुलभ होते. आता सर्वच मोबाईल कंपन्यांनी सुद्धा आधार कार्ड अनिवार्य केले आहे.बोेटाचे ठसे जुळविण्यासाठी येणाºया अडचणी लक्षात घेता तालुकास्तरावर ‘महा-ई सेवा’ केंद्राच्या माध्यमातून दोन किट उपलब्ध करून दिल्या आहेत. शेतकरी व नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनामार्फत उपाययोजना केल्या जात आहेत.- नितीन व्यवहारे,निवासी उपजिल्हाधिकारी, अमरावती.कर्जमाफी प्रक्रियेतही बाधा‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनें’तर्गत कर्जमाफीचे अर्ज भरण्याची प्रक्रिया फक्त गावांमधील ‘महा ई-सेवा‘ केंद्रात सुरू आहेत. याबाबत माहिती भरून देतांना शेतकºयांच्या हातांचे ठसे घेतले जात आहेत. मात्र, बहुतांश शेतकºयांचे ठसे बॉयोमेट्रिक मशिनवर जुळून येत नसल्याने शेतकºयांना मन:स्ताप सहन करावा लागत आहे. परिणामी सरपंचाचा रहिवासी दाखला घेऊन अंजनगाव सुर्जी तालुक्यातील शेतकºयांना त्यांच्या बोटांचे ठसे जुळवून घेण्यासाठी संबंधित केंद्रांवर हेलपाटे घ्यावे लागत आहेत. यात त्यांना आर्थिक भुंर्दंड सोसावा लागतोय.