शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

‘आधार’वरील बोटांच्या ठशांसाठी भुर्दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 21:56 IST

पाच वर्षानंतर आधार कार्डवरील हातांच्या बोटांचे ठसे जुळत नसल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

ठळक मुद्देपाच वर्षानंतर आधार कार्डवरील हातांच्या बोटांचे ठसे जुळत नसल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पाच वर्षानंतर आधार कार्डवरील हातांच्या बोटांचे ठसे जुळत नसल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. परंतु आता त्यासाठी देखील शेतकºयांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतोय.सद्यस्थितीत अनेक शेतकरी कर्जमाफीचे आॅनलाईन अर्ज भरत आहेत. मात्र, आधारवरील त्यांच्या बोटांचे ठसे जुळत नसल्याने त्यांना बाहेरगावी जाऊन बोटांचे ठसे जुळवून घ्यावे लागत आहे. यामुळे शेतकरी वर्ग हैराण आहे.काही वर्षांपूर्वी शासनाने प्रत्येक नागरिकाला ‘आधार कार्ड’ अनिवार्य केले. त्यावेळी परिसरात ठिकठिकाणी आधार नोंदणी केंद्र उघडण्यात आले होते. लांबच लांब रांगा लाऊन नागरिकांनी आधार कार्ड काढले. आधार कार्ड हे शासनाच्या विविध योजनांसाठी बंधनकारक करण्यात आले आहे. यामध्ये बँकेत खाते उघडणे, ओळखपत्र, पॅनकार्ड जोडून घेणे, उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी, वाहनपरवाने यांसह विविध दाखल्यांसाठी आधार कार्ड बंधनकारक आहे. त्यामुळे आधार कार्डबाबत बहुतांश नागरिक जागृत झाले आहेत.आधार कार्ड काढतेवेळी दोन्ही हातांच्या बोटांचे ठसे आणि रेटिनाचे छायाचित्र घेण्यात येते. त्यामुळे संबंधित व्यक्ती तिच आहे की दुसरी आहे हे ओळखणे सुलभ होते. आता सर्वच मोबाईल कंपन्यांनी सुद्धा आधार कार्ड अनिवार्य केले आहे.बोेटाचे ठसे जुळविण्यासाठी येणाºया अडचणी लक्षात घेता तालुकास्तरावर ‘महा-ई सेवा’ केंद्राच्या माध्यमातून दोन किट उपलब्ध करून दिल्या आहेत. शेतकरी व नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनामार्फत उपाययोजना केल्या जात आहेत.- नितीन व्यवहारे,निवासी उपजिल्हाधिकारी, अमरावती.कर्जमाफी प्रक्रियेतही बाधा‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनें’तर्गत कर्जमाफीचे अर्ज भरण्याची प्रक्रिया फक्त गावांमधील ‘महा ई-सेवा‘ केंद्रात सुरू आहेत. याबाबत माहिती भरून देतांना शेतकºयांच्या हातांचे ठसे घेतले जात आहेत. मात्र, बहुतांश शेतकºयांचे ठसे बॉयोमेट्रिक मशिनवर जुळून येत नसल्याने शेतकºयांना मन:स्ताप सहन करावा लागत आहे. परिणामी सरपंचाचा रहिवासी दाखला घेऊन अंजनगाव सुर्जी तालुक्यातील शेतकºयांना त्यांच्या बोटांचे ठसे जुळवून घेण्यासाठी संबंधित केंद्रांवर हेलपाटे घ्यावे लागत आहेत. यात त्यांना आर्थिक भुंर्दंड सोसावा लागतोय.