शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

पोहऱ्याच्या १० हेक्टर जंगलाला वणव्याचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2017 00:23 IST

अमरावती ते चांदूररेल्वे मार्गावरील पोहरा जंगलात टॉवरनजीक सुमारे १० हेक्टर परिसराला गुरुवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास अचानक आग लागली.

वन्यजीव बचावले : खोडसाळपणे आग लावल्याचा संशय, तीव्र हवेमुळे भडकलीअमरावती : अमरावती ते चांदूररेल्वे मार्गावरील पोहरा जंगलात टॉवरनजीक सुमारे १० हेक्टर परिसराला गुरुवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. तीव्र हवेमुळे आगीने वेग घेतला होता. ही आग कोणीतरी खोडसाळपणाने लावल्याचा अंदाज वनविभागाने वर्तविला आहे. तब्बल दीड तासांच्या महत्प्रयासाने आग आटोक्यात आली. मात्र या आगीत कोणतेही वन्यजीवांना हानी पोहोचली नाही, हे विशेष.उन्हाळा सुरू झाला की, जंगलात वणव्याच्या घटना घडतात. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी वनविभागाने सॅटेलाईटचा वापर सुरू केला आहे. गत काही दिवसांपूर्वी वडाळी जंगलात आगीची किरकोळ घटना घडली होती. मात्र चांदूररेल्वे मार्ग सतत वर्दळीचा असल्याने पोहरा जंगलात टॉवरनजीक रस्त्यावर कुणीतरी सिगारेट, विडी ओढल्यानंतर धुटुक फेकल्याने आग लागली असावी. अथवा कुणीतरी खोडसाळपणे जंगलास आग लावली असावी, असा अंदाज वनविभागाचा आहे. ज्यावेळी ही आग लागली तेव्हा जंगलात तीव्र वारे वाहत होते. त्यामुळे आग वेगाने पसरली. आगीवर नियंत्रणासाठी वनविभाग, अग्निशमन, पोलीस विभागाची चमू घटनास्थळी पोहोचली. सर्व यंत्रणांनी आपआपल्या परिने आग रोखली. परंतु तीव्र हवेमुळे सुमारे १० हेक्टर परिसराला आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ही अग्निशमन बंबाद्वारे विझविण्यात आली. वनखंड क्रमांक ७८ अंतर्गत उत्तर चोरआंबा बीटमध्ये ही आग लागली होती. वनपाल विनोद कोहळे यांच्या मार्गदर्शनात आगीचा पंचनामा करण्यात आला आहे. आग लागल्याप्रकरणी अज्ञाताविरुद्ध वनगुन्हा जारी करून वनविभागाने तपास चालविला आहे. आग विझविण्यासाठी वनकर्मचाऱ्यांनी ब्लोअर मशीनचा वापर केला होता. यात वनपाल विनोद कोहळे, वनरक्षक नितीन नेतनवार, पी.जी. शेंडे, शेख अनिस, नीलेश करवाडे, दिलीप काळबांडे, किशोर धोटे, छत्रपती वानखडे, दीपक नेवारे, बाबाराव पळस्कर आदींनी आग नियंत्रणात आणणयासाठी मोलाची भूमिका बजावली. (प्रतिनिधी)सॅटेलाईटवर झळकली आगपोहरा जंगलात गुरुवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास आग लागल्याची माहिती सॅटेलाईटवर झळकली होती. त्यानंतर त्वरेने वरिष्ठ वनाधिकाऱ्यांनी आग नियंत्रणात आणण्यासाठी सूत्रे हलविली. पोहरा वनविभागाची चमू काही वेळेतच घटनास्थळी पोहोचली. मात्र वेगवान हवेमुळे ही आग आटोक्यात आणण्यासाठी दीड तास पाण्याचा मारा करावा लागला. आता जंगलात आग लागल्यास नव्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून सॅटेलाईटद्वारे वनाधिकाऱ्यांना कोणत्या भागात आग लागली हे दिसून येते.