शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

आर्थिक बेजार ४२२ सोसायट्यांना संजीवनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 22:55 IST

वाढत्या खर्चामुळे डबघार्ईस आलेल्या सेवा सहकारी संस्थांना सहकार विभागाद्वारा एक लाखांपर्यंत अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील ६१३ पैकी ४२२ सोसायट्या पात्र ठरल्या, तर १९१ सोसायटी निकषात बाद झाल्यात. या सर्व सोसायटींच्या प्रस्तावाची विभागीय सहनिबंधक कार्यालयातील लेखापरीक्षकांद्वारे पडताळणी होऊन प्रस्ताव अहकार आयुक्तांकडे पाठविला जाणार आहे.

ठळक मुद्दे१ लाखापर्यत अर्थसहाय्य१९१ संस्था निकषात बादपीककर्ज वाटपावर अनुदान

गजानन मोहोड ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : वाढत्या खर्चामुळे डबघार्ईस आलेल्या सेवा सहकारी संस्थांना सहकार विभागाद्वारा एक लाखांपर्यंत अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील ६१३ पैकी ४२२ सोसायट्या पात्र ठरल्या, तर १९१ सोसायटी निकषात बाद झाल्यात. या सर्व सोसायटींच्या प्रस्तावाची विभागीय सहनिबंधक कार्यालयातील लेखापरीक्षकांद्वारे पडताळणी होऊन प्रस्ताव अहकार आयुक्तांकडे पाठविला जाणार आहे.पीककर्ज पुरवठ्यासाठी गावपातळीवरील सेवा सहकारी संस्थांचे महत्त्व लक्षात घेता त्यांना आर्थिक बळकटी देण्यासाठी या सहकारी संस्थांचे सक्षमीकरण करण्याचे सहकार विभागाचे धोरण आहे. सन २००६-०७ या आर्थिक वर्षापासून जिल्हा सहकारी बँंकेद्वारा प्राथमिक पतपुरवठा संस्थांना वार्षिक ४ टक्के व्याजदराने व या संस्थांमार्फत शेतकऱ्यांना सहा टक्के व्याजदराने अल्पमुदती कर्जपुरवठा करण्यात येतो. या संस्थांना २००५-६ पर्यंत कर्जपुरवठ्यात व्याजाचा ३ टक्के दुरावा मिळत होता. मात्र, १६ मे २००६ च्या सासन निर्र्णयान्वये शेतकºयांना सहा टक्के व्याजाने कर्जपुरवठा करण्यात येत असल्याने सोसायट्यांच्या व्याजामधील दुरावा ३ वरून २ टक्क्यांवर आला आहे. यामुळे या सहकारी संस्था आर्थिकदृट्या अडचणीत आल्या, बहुतांश संस्थांचा आस्थापना व व्यवस्थापनाचा खर्च भागविण्यात अडचणी उत्पन्न झाल्याने संस्था तोट्यात आल्यात त्यामुळे या संस्थाचे सहकार विभागाद्वारा सक्षमीकरण करण्यात येणार आहे.पीककर्ज वाटपाच्या व्याजाचा परतावा योजनेंतर्गत २५ लाखांपर्यंत पीककर्ज वाटप केलेल्या संस्थांना १.५ टक्के, २५ ते ५० लाखांपर्यंत पीककर्ज वाटप केलेल्या संस्थांना १ टक्के, ५० लाख ते १ कोटीपर्यंत कर्जवाटप केलेल्या संस्थांना ०.७५ टक्के, तर १ कोटीवर कर्जवाटप करणाºया संस्थांना ०.५० टक्के अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ६१३ पैकी पात्र ४२२ सोसायटींचे प्रस्ताव जिल्हा उपनिबंधक कार्यालयामार्फत विभागीय सहनिबंधक कार्यालयात पाठविण्यात आलेले आहेत. यामध्ये १९१ सोसायटी अपात्र ठरल्या आहेत.तालुकानिहाय पात्र सोसायट्याजिल्ह्यात अमरावती तालुक्यातील ८, मोर्शी २६, नांदगाव खंडेश्वर ३८, चांदूर बाजार ३०, अचलपूर ४३, धामणगाव ३०, चिखलदरा १३, धारणी १८, अमरावती २१, भातकुली २८, तिवसा ३४, चांदूर रेल्वे १६ व दर्यापूर तालुक्यातील ७५ संस्था जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या छाननीमध्ये पात्र ठरल्या आहेत. या प्रस्तावांची विभागीय सहनिबंधक कार्यालयाच्या लेखापरीक्षकांद्वारा पडताळणी करून सहकार आयुक्तांना पाठविण्यात येईल.सोसायट्यांना या निकषांची पूर्तता आवश्यकगटसचिव व सचिवांची वेतनश्रेणी निश्चित करण्यासाठी सहकार आयुकांची मान्यता आवश्यक.सोसायटींचे लेखापरीक्षण विहित कालावधीत होणे आवश्यक आहे.संस्थेद्वारा लेखापरीक्षण अहवालातील कर्जवाटपाच्या अहवाल विहित कालावधीत डीडीआर यांना सादर हवा.५० लाखांवर कर्जवाटप करणाºया संस्थांच्या व्यवस्थापन व आस्थापनावरील खर्चाचे प्रमाण खेळत्या भांडवलाच्या २.५ टक्कयांपेक्षा जास्त नसावे.लेखापरीक्षण अहवालानुसार ज्या संस्थेमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाला, त्या अपात्र राहतील.संस्थेद्वारा पीककर्ज वसुलीचे प्रमाण किमान ६० टक्के असणे अनिवार्य आहे. यापेक्षा कमी प्रमाण असणाºया संस्था अपात्र ठरणार आहे.