शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
2
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
3
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
4
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
5
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
6
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
7
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
8
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
9
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
10
मल्याळी असूनही स्वामींचा भक्त आहे जयवंत वाडकरांचा होणारा जावई; म्हणाले, "तो दर महिन्याला..."
11
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
12
Travel: पिकनिक प्लॅन करताय? महाराष्ट्रात 'या' ठिकाणी अनुभवा हॉट एअर बलून राईडचा थरार!
13
घरात पाणी येत नसल्याने दिव्यांग वयोवृद्धाचा टेरेसवरून उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न
14
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
15
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
16
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
17
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
18
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
19
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
20
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज

अखेर जिल्हा परिषदेतील पाणीटंचाईचे निवारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 00:58 IST

पाणीटंचाईच्या तीव्र झळा सोसत असलेल्या जिल्ह्यातील लाखो ग्रामस्थांची तहान भागविणाऱ्या जिल्हा परिषदेत पाणीटंचाईचे वृत्त ‘लोकमत’मध्ये झळकताच प्रशासकीय यंत्रणेकडून गंभीर दखल घेतली. जिल्हा परिषदेतील पाणीटंचाईचे निवारण करण्यासाठी पाण्याच्या स्रोत असलेल्या जागेचा शोध घेण्यात आला आणि मुख्यालय परिसरातच नव्याने बोअरवेल करण्यात आली.

ठळक मुद्देनवा स्रोत शोधला । प्रशासनाने घेतली दखल

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पाणीटंचाईच्या तीव्र झळा सोसत असलेल्या जिल्ह्यातील लाखो ग्रामस्थांची तहान भागविणाऱ्या जिल्हा परिषदेत पाणीटंचाईचे वृत्त ‘लोकमत’मध्ये झळकताच प्रशासकीय यंत्रणेकडून गंभीर दखल घेतली. जिल्हा परिषदेतील पाणीटंचाईचे निवारण करण्यासाठी पाण्याच्या स्रोत असलेल्या जागेचा शोध घेण्यात आला आणि मुख्यालय परिसरातच नव्याने बोअरवेल करण्यात आली. त्यामुळे येत्या काही दिवसांत मिनी मंत्रालयातील पाणीटंचाई दूर होणार आहे.सध्या दुष्काळ व पाणीटंचाईमुळे ग्रामीण भागातील जनता त्रस्त आहे. अनेक गावांत पिण्याच्या पाण्याचे टंचाई असल्यामुळे जिल्हाभरातील ४३ गावांत ३८ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे, तर २४९ गावांत २७६ विहिरींच्या अधिग्रहणाद्वारे आपली तहान भागवावी लागत आहे. अशातच पाणीटंचाईची झळ ही जिल्हा परिषदेत पोहोचली होती. परिणामी ग्रामस्थांची तहान भागवण्याची जबाबदारी स्वीकारलेल्या जिल्हा परिषदेसही पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. प्रशासनाने नवीन बोअर केले. मात्र, या बोअरला पाण्याचा पुरेसा स्रोत न मिळाल्याने परिस्थिती कायम होती. काही दिवसांपासून झेडपी अध्यक्ष वगळता, उपाध्यक्ष दत्ता ढोमणे, सभापती जयंत देशमुख, वनिता पाल, सुशीला कुकडे, बळवंत वानखडे आदींच्या दालनात पिण्यासोबत वापरासही पाणी नसल्याने प्रसाधनगृहाला टाळे लागल्याचे वास्तव आहे. पाण्याची कॅन बोलवावी लागत आहे. सध्या उन्हाचा पारा वाढत असल्याने जिवाची लाही-लाही होत आहे. उकाड्यापासून बचावासाठी अधिकाऱ्यांच्या दालनात लावलेल्या कूलरमध्येही पाणी राहत नसल्याने पंख्याची हवा घ्यावी लागत आहे.झेडपीचे मुख्यालय असलेल्या ठिकाणी पाण्याची समस्या होती. त्यावर पर्यायी व्यवस्था केली. मात्र, ती यशस्वी झाली नव्हती. त्यामुळे पुन्हा नव्या पाणी स्रोताचा शोध घेऊन बोअर करण्यात आले. त्यामुळे पाण्याचा प्रश्न निकाली काढण्यात आला.- नारायन सानप,डेप्युटी सीईओ, सामान्य प्रशासन

टॅग्स :water shortageपाणीटंचाई