शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

...अखेर अमरावती विद्यापीठ कुलगुरू पदासाठी निघाली जाहिरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2023 11:05 IST

उमेदवारांकडून अर्ज मागविले, संकेतस्थळावर माहिती

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावतीविद्यापीठाला नऊ महिन्यांनंतरही कायमस्वरूपी कुलगुरू मिळाले नाहीत. अखेर प्रशासनाने रविवारी नव्या कुलगुरू पदासाठीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. उशिराने का होईना कुलगुरू निवडीसाठी गठित शोध व निवड समिती मात्र कामाला लागल्याचे चित्र आहे.

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम ११ (३)(च) नुसार कुलगुरू पदासाठी विहित केलेली शैक्षणिक अर्हता व अनुभवाची पूर्तता करणाऱ्या प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ व्यक्तींकडून अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी अर्ज मागविले जाणार आहेत. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर १७ नोव्हेंबर २०२३ पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे.

त्यामुळे विलंबाने का होईना, नव्या कुलगुरू पदासाठीची प्रक्रिया सुरू झाली असल्याने येत्या वर्षात अमरावती विद्यापीठाला नवे कुलगुरू मिळतील, असे संकेत आहेत. तत्कालीन कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांचे गंभीर आजाराने २८ जानेवारी २०२३ रोजी निधन झाले. तेव्हापासून अमरावती विद्यापीठाचा प्रभारी कारभार सुरू आहे. हल्ली नांदेड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले हे अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा प्रभार सांभाळत आहे. मात्र, नांदेड ते अमरावती असा सुमारे ५०० किमीचा पल्ला गाठून कारभार हाताळणे डॉ. येवले यांना आता शक्य होत नसल्याचे चित्र आहे.

नऊ महिने कायम कुलगुरूविना...

दुसरीकडे व्यवस्थापन परिषदेने नव्या कुलगुरू निवडी प्रक्रियेसंदर्भात समिती गठित केली. मात्र, या शोध व निवड समितीचे कामकाज फारच संथगतीने सुरू आहे. परिणामी, कुलगुरू पदासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी बराच अवधी लागला. विद्यापीठाशी सुमारे ४२५ संलग्नित महाविद्यालये आहेत. नऊ महिन्यांपासून कायमस्वरूपी कुलगुरू नसल्याने विद्यापीठासह महाविद्यालयांच्या विकासासाठी ही बाब मारक ठरणारी असल्याचे पुढे आले आहे. विद्यापीठाचे घसरलेले ‘नॅक’ कसे सुधारणार, अशा अनेक विषयांवरही आता प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रuniversityविद्यापीठAmravatiअमरावती