शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

अठरा लाख कर्मचारी कुटुंबासह उपोषणावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 23:29 IST

राज्यघटनेने दिलेला अधिकार काढण्यासाठी उच्चवर्णीय अन्याय करीत असल्याने राज्यातील तब्बल १८ लाख कर्मचारी कुटुंबासह दिल्लीच्या जंतर-मंतरवर उपोषणाला बसणार आहेत.

ठळक मुद्देठराव : राज्य पदोन्नती आरक्षण परिषद

लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे : राज्यघटनेने दिलेला अधिकार काढण्यासाठी उच्चवर्णीय अन्याय करीत असल्याने राज्यातील तब्बल १८ लाख कर्मचारी कुटुंबासह दिल्लीच्या जंतर-मंतरवर उपोषणाला बसणार आहेत. यासंदर्भातील ठराव धामणगाव येथे झालेल्या पदोन्नती आरक्षण परिषदेत घेण्यात आल्या.येथील बाजार समितीच्या भवनात पदोन्नती आरक्षण परिषदेचे आयोजन भटके विमुक्त संघर्ष परिषद, संघर्ष वाहिनी, वसंतराव नाईक अधिकारी कर्मचारी संघटनेच्यावतीने करण्यात आले होते़ राज्यातील सर्व प्रमुख पदाधिकाºयांच्या उपस्थितीत अनेक ठराव पारित करण्यात आले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने ४ आॅगस्ट १७ च्या आदेशानुसार राज्याने पारित केलेल्या आरक्षण कायदा २००४ नुसार मागसवर्गीयांना मिळालेल्या पदोन्नती बेकायदेशीर असल्याचा ठपका ठेवण्यात आला. यामुळे १८ लाख कर्मचाºयांना पूर्वीच्या पदावर यावे लागणार आहे़राज्य घटनेने एकीकडे अधिकार दिला, तर दुसरीकडे उच्च वर्णीय आरक्षणाचा विरोध करून भटके विमुक्त जमाती, विशेष मागास प्रवर्ग यांचे आरक्षण संपविण्याचा डाव रचला जात असल्याचा आरोप या आरक्षण परिषदेत करण्यात आला़ प्रत्येक तालुक्यात संघटन शक्ती वाढवून आपल्या कुटुंबासह उपोषणाला बसण्याची तयारी ठेवावी, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलनाला तयार रहावे, असे यावेळी ठरविण्यात आले.भटके विमुक्त जमातींचे आरक्षण संपविण्याचा डाव सर्वांनी हाणून पाडावा, यासाठी आता सर्वांनी एकजुटीने अन्यायाविरोधात लढा उभारण्याचा निर्णय घेतला असल्याचे मत व्यक्त करण्यात आले़यावेळी राजेंद्र बढीये, सुधाकर पांडे, एसक़े़ हनुमंते, राजू चव्हाण, भोई समाजाचे प्रफुल्ल पटेल, घनश्याम मेश्राम आदी उपस्थिती होती़ संचालन व आभार प्रमोद बमनोटे यांनी केले़