शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

पंधरावा वित्त आयोग; २७ कोटींच्या निधीला जिल्हा परिषद मुकली

By जितेंद्र दखने | Updated: March 29, 2024 22:24 IST

प्रशासक राजवटीचा फटका : दोन वर्षांपासून छदामही तिजोरीत नाही

अमरावती : जिल्हा परिषदेत गत दोन वर्षांपासून निवडणुका लांबल्यामुळे याचा मोठा फटका जिल्हा परिषद, पंचायत समित्यांना बसला आहे. निवडणुका न झाल्याने या स्थानिक स्वराज्य संस्थंचा संपूर्ण कारभार हा प्रशासकाच्या हातात आहे. परिणामी जिल्हा परिषदेला १५व्या वित्त आयोगाकडून १० टक्के प्रमाणे मिळणारा सन २०२२-२३ व २०२३-२४ या दोन वर्षांतील  सुमारे  टाइटचा १६ कोटी ७२ लाख १५ हजार, तर अनटाइटचा सुमारे ११ कोटी १४ लाख ७७ हजार अशा एकूण २७ कोटी ८६ लाख ९२ हजार रुपयांचा पैकी छदामही मिळाला नाही.

जिल्हा परिषदा, पंचायत समिती व अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांना केंद्र शासनाकडून वित्त आयोगाच्या माध्यमातून घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छता, आरोग्य, पाणीपुरवठा, पायाभूत प्रकल्प, याबरोबरच मूलभूत सुविधांशी संबंधित कामांसाठी निधी दिला जातो. सन २०२०-२१ या वर्षापासून १५वा वित्त आयोग सुरू केला आहे. या आयोगातून ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना निधी देताना नागरी भागात करसंकलनाच्या प्रमाणात, तर ग्रामीण भागात लोकसंख्या व क्षेत्रफळाच्या तुलनेत निधीचे वाटप होते. जिल्हा परिषद व नगरपंचायती या बहुतांश वित्त आयोगाकडून दिल्या जाणाऱ्या निधीवर अवलंबून असतात. आयोगाकडून मिळवणाऱ्या निधीतून ग्रामीण भागात विकासकामे केली जातात. मात्र, दोन वर्षांपासून जिल्हा परिषदेसह जिल्ह्यातील १४ पैकी ११ पंचायत समित्यांना वित्त आयोगाचा निधी मिळाला नाही.

विकासावर विपरीत परिणामगत दोन वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच घेतल्या गेलेल्या नसल्याने प्रशासकीय राजवटीमुळे वित्त आयोगाकडून निधीच दिला गेलेला नाही. त्यामुळे वित्त आयोगाकडून येणारा जिल्हा परिषदेचा २७ कोटींचा निधी अडकला आहे. परिणामी ग्रामीण भागाच्या विकासावर त्याचा विपरीत परिणाम झाला असून, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निधीला ब्रेक लागला आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती