शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
3
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
4
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
5
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
6
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
7
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
8
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
9
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
10
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
11
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
12
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
13
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
14
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
15
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
16
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
17
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
18
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
19
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
20
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण

पोलीस दलात बदलीचे वारे क्रीम ठाण्यासाठी अनेकांची फिल्डिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:11 IST

अमरावती : एकाच ठिकाणी पाच वर्षांपेक्षा अधिक कार्यकाळ झालेल्या पोलीस कॉन्सटेबल ते एएसआयपर्यंतच्या बदल्या एरवी एप्रिल, मे महिन्यात करण्यात ...

अमरावती : एकाच ठिकाणी पाच वर्षांपेक्षा अधिक कार्यकाळ झालेल्या पोलीस कॉन्सटेबल ते एएसआयपर्यंतच्या बदल्या एरवी एप्रिल, मे महिन्यात करण्यात येतात. परंतु यंदा कोविडच्या पार्श्वभूमीवर बदल्या ३० जूनपर्यंत थांबविण्यात आल्या होत्या. जिल्हाअंतर्गत बदल्यांचे आदेश जरी झाले नसले तरी पोलीस दलात मात्र, बदल्यांचे वारे वाहू लागल्याची विभागात चर्चा आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील महत्त्वाचे क्रीम ठाणे मिळण्यासाठी अनेकांनी वरिष्ठांकडे फिल्डिंग लावली आहे.

पोलीस अधीक्षक ग्रामीण कार्यालयांतर्गत येणाऱ्या पोलीस शिपाई ते पोलीस उपअधीक्षकांपर्यंत एकूण २,४७८ पदे आहेत. सार्वत्रिक बदल्या २०२१ साठी ५९० कर्मचारी पात्र ठरले आहेत. मात्र, पीएसआय ते पोलीस निरीक्षकांच्या बदल्या पोलीस महासंचालक करतात. डीवायएसपी पातळीवरील बदल्या गृहविभागाकडून केली जाते. मात्र, जिल्हा अंतर्गत पोलीस शिपाई ते सहायक पोलीस उपनिरीक्षक पातळीवर बदल्यांचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक काढतात. मात्र, आता बदल्यांचे वारे वाहू लागल्यामुळे आपल्याला क्रीम ठाणे मिळावे यासाठी काहींनी मोर्चेबांधणी सुरू केल्याची माहिती आहे. बदल्यांसाठी पोलीस शिपाई ते एएसआयमध्ये बदलीस पात्र ठरलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये सहायक पोलीस उपनिरीक्षक ४१, पोलीस हवालदार १३३, पोलीस नाईक १४९, पोलीस शिपाई १४९, महिला कर्मचारी ९३ यांचा समावेश आहे.

पोलीस कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या होणार बदल्या

५९०

पदनाम हजर पदे बदलीस पात्र

१) पोलीस उपअधिक्षक ५ ३

२)पोलीस निरीक्षक २४ ३

३) एपीआय ७० ८

४) पीएसआय ९७ ११

५)एएसआय २२४ ४१

६) पोलीस हवालदार ३६० १३३

७) पोलीस नाईक ५२२ १४९

८) महिला कर्मचारी ४२८ ९३

बॉक्स

या तीन ठाण्यांना पसंती

जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखा, परतवाडा पोलीस ठाणे, अचलपूर, वरूड ठाणे अशा क्रीम ठाण्यात जाण्यास पोलीस कर्मचाऱ्यांनी पसंती दर्शविली आहे. मोठ्या तालुक्यात शिक्षणाच्या व राहण्याची चांगली सुविधा असल्याने पसंती अधिक आहे.

बॉक्स

या ठाण्यात नको रे बाबा

जिल्ह्यातील खोलापूर, रहिमापूर चिंचोली, मंगरूळ चव्हाळा, धारणी अशा ठिकाणी पोलीस कर्मचारी जाण्यास उत्सुक नाही. या ठिकाणी मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टीने व राहण्याच्या दृष्टीने सुविधासुद्धा नाही. ही ठाणे क्रीम मानली जात नसल्यामुळे पोलीस कर्मचारी तेथे जाण्यास टाळतात.