शहरं
Join us  
Trending Stories
1
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
2
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
3
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
4
उल्हासनगरात गरब्याच्या ठिकाणी शिवसेना शाखाप्रमुखावर पिस्तूल रोखून गोळीबार करणारा गजाआड 
5
दसरा मेळाव्यात मनोज जरांगेंनी दिली पुढील आंदोलनाची हाक; म्हणाले, “सरकारला १ महिन्याची मुदत”
6
"सर्व प्रॉपर्टी देऊन टाका…!" निर्दयी सुनेची वृद्ध सासूला अमानुष मारहाण, केस ओढत केली शिवीगाळ; VIDEO पाहून तुमचाही संताप उडेल
7
Chaitanyananda Saraswati : डर्टी गेम! चैतन्यनंद सरस्वतीच्या मठात सेक्स टॉय, अश्लील CD; दिल्ली ते दुबईपर्यंत नेटवर्क
8
Zubeen Garg : स्कूबा डायव्हिंगमुळे नाही तर.... कसा झाला सिंगर झुबीन गर्गचा मृत्यू? आता मोठा खुलासा
9
VIDEO: बापरे... अगदी सहज उंच बिल्डिंगवरून तरूणाने स्विमिंग पूलमध्ये मारली उडी अन् मग...
10
Mohammed Siraj Record : मियाँ मॅजिक! सिराजनं साधला नंबर वन होण्याचा डाव; मिचेल स्टार्कला टाकले मागे
11
‘संघाला १०० वर्ष झाली तरी त्यांची ‘मुंह में राम, बगल में छुरी’ भूमिका आजही कायम, काँग्रेसची टीका    
12
बिल्सेरी, किनले, अक्वाफिनाला आता टक्कर देणार मुकेश अंबानी; ₹३०००० कोटींच्या व्यवसायात एन्ट्रीच्या तयारीत 
13
रशियाने मोठा धोका दिला? भारताच्या विनंतीकडे दुर्लक्ष करत पाकिस्तानला फायटर जेटचं इंजिन देण्याचा निर्णय घेतला; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
14
Viral Video: अशा मित्रांपासून सावध राहिलेलं बरं; एकदा 'हा' व्हिडीओ बघाच!
15
"गोपीनाथ मुंडेंनी मराठा आरक्षणाला विरोध केला नाही, पण..."; पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात स्पष्टच बोलल्या
16
दसरा मेळाव्यात भाषण सुरू असतानाच पंकजा मुंडे कार्यकर्त्यांवर संतापल्या, म्हणाल्या पोरांनो तुम्ही...  
17
“भारत खरोखरच स्वतंत्र आहे का?”; गीतांजली वांगचूक यांचा सवाल, केंद्रीय गृहमंत्रालयावर टीका
18
१९ वर्षे शनि, १८ वर्षे राहु महादशा: शनि महादशेत राहु अंतर्दशा आली? भाग्योदय; अपार पैसा-लाभ!
19
Goldman Sachs चे 'हे' ४ शेअर्स बनले सुपरस्टार; एका वर्षात १५५ टक्क्यांपर्यंतची तेजी, तुम्ही घेतलाय का?
20
 ...मग पोलिसांची हत्या करावी लागली तरी हरकत नाही, समोर आला तौकीर रजाचा भयानक डाव

गणपतीच्या निर्माल्यापासून बनणार खत

By admin | Updated: September 22, 2015 00:23 IST

सध्या शहरात गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. हजारोंच्या संख्येने गणपतींची स्थापना करण्यात आली आहे.

पुढाकार : आदर्श शिक्षिका रजनी आमले यांचा पुढाकार, विसर्जनस्थळी गोळा केले जाते निर्माल्य लोकमत शुभवर्तमानअमरावती : सध्या शहरात गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. हजारोंच्या संख्येने गणपतींची स्थापना करण्यात आली आहे. दररोज या गणपतींना हार, फुले, दुर्वा नेमाने वाहण्यात येतात. मात्र, गणपतीला श्रद्धापूर्वक वाहिले गेलेला दुर्वा आणि फुलांचे पुढे निर्माल्य होते. तसेच यामुळे प्रदूषणात भर पडते. ही बाब हेरून एका शिक्षिकेने निर्माल्यापासून खत बनविण्याची शक्कल लढविली आहे. गणपती विसर्जनाच्या दिवशी नदीकाठी उभे राहून त्या निर्माल्य संकलन करतात. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आदर्श पुरस्काराने पुरस्कृत सहायक शिक्षिका रजनी आमले या मागील सात ते आठ वर्षांपासून निर्माल्यापासून खत बनविणऱ्या प्रकल्पावर काम करीत आहेत. रजनी आमले यांनी सांगितले की, त्या गेल्या अनेक वर्षांपासून शालेय विद्यार्थ्यांच्या सहकार्याने गणेशाच्या मूर्तीवरून निघालेले निर्माल्य एकत्रित करतात. त्यापासून त्या खत तयार करतात. गणेशोत्सव मंडळांजवळ त्या निर्माल्य संकलनासाठी एक पोते ठेवतात. त्यात निर्माल्यासह मूर्तीवर वाहिली जाणारी सामग्री संकलित करतात. सण इको फ्रेंडली पद्धतीने साजरे करण्यावर रजनी आमले यांचा भर आहे. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाचा संदेश जावा, या उद्देशाने रजनी आमले हा उपक्रम राबवीत आहेत. (प्रतिनिधी)खत तयार करण्याची प्रक्रियारजनी आमले या अनेक वर्षांपासून घरगुती गणपती तसेच गणेशोत्सव मंडळ आणि नदीच्या काठावर उभे राहून निर्माल्य संकलित करतात. त्यानंतर त्यातून फूल, बेल आणि हार वेगळे करतात. त्यानंतर हे निर्माल्य शाळेच्या बगिच्यात खोल खड्डा करून पुरले जातात. दोन दिवस यात शेण टाकून ते कुजविले जाते. त्यानंतर मातीने ते झाकून ठेवण्यात येते. वर्षभरानंतर हे खत काढून पुन्हा हीच प्रक्रिया केली जाते. शाळेमध्येच वापररजनी आमले यांनी सांगितले की, वर्षभरात हे खत तयार होत असले तरी मध्ये हे खत काढून त्याचा उपयोग शाळेच्या बगिचासाठी केला जातो. यातून विद्यार्थ्यांना ज्ञान तर मिळतेच. पण, त्यांच्यामध्ये पर्यावरणविषयक जागरूकताही निर्माण होते. भारतीय चलनाचा अपव्यय अनेक गणेशोत्स्व मंडळांद्वारे विड्याखाली ठेवले जाणारे पैसेदेखील नदीमध्ये विसर्जित केले जातात. यामुळे भारतीय चलनाचा अपव्यय होतो. हे टाळण्यासाठी रजनी आमले यांनी गणेशोत्सव मंडळांना विड्याखाली ठेवलेली सुपारी आणि पैसे निर्माल्यासमवेत टाकण्याचे आवाहन रजनी आमले यांनी केले आहे.