शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

गणपतीच्या निर्माल्यापासून बनणार खत

By admin | Updated: September 22, 2015 00:23 IST

सध्या शहरात गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. हजारोंच्या संख्येने गणपतींची स्थापना करण्यात आली आहे.

पुढाकार : आदर्श शिक्षिका रजनी आमले यांचा पुढाकार, विसर्जनस्थळी गोळा केले जाते निर्माल्य लोकमत शुभवर्तमानअमरावती : सध्या शहरात गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. हजारोंच्या संख्येने गणपतींची स्थापना करण्यात आली आहे. दररोज या गणपतींना हार, फुले, दुर्वा नेमाने वाहण्यात येतात. मात्र, गणपतीला श्रद्धापूर्वक वाहिले गेलेला दुर्वा आणि फुलांचे पुढे निर्माल्य होते. तसेच यामुळे प्रदूषणात भर पडते. ही बाब हेरून एका शिक्षिकेने निर्माल्यापासून खत बनविण्याची शक्कल लढविली आहे. गणपती विसर्जनाच्या दिवशी नदीकाठी उभे राहून त्या निर्माल्य संकलन करतात. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आदर्श पुरस्काराने पुरस्कृत सहायक शिक्षिका रजनी आमले या मागील सात ते आठ वर्षांपासून निर्माल्यापासून खत बनविणऱ्या प्रकल्पावर काम करीत आहेत. रजनी आमले यांनी सांगितले की, त्या गेल्या अनेक वर्षांपासून शालेय विद्यार्थ्यांच्या सहकार्याने गणेशाच्या मूर्तीवरून निघालेले निर्माल्य एकत्रित करतात. त्यापासून त्या खत तयार करतात. गणेशोत्सव मंडळांजवळ त्या निर्माल्य संकलनासाठी एक पोते ठेवतात. त्यात निर्माल्यासह मूर्तीवर वाहिली जाणारी सामग्री संकलित करतात. सण इको फ्रेंडली पद्धतीने साजरे करण्यावर रजनी आमले यांचा भर आहे. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाचा संदेश जावा, या उद्देशाने रजनी आमले हा उपक्रम राबवीत आहेत. (प्रतिनिधी)खत तयार करण्याची प्रक्रियारजनी आमले या अनेक वर्षांपासून घरगुती गणपती तसेच गणेशोत्सव मंडळ आणि नदीच्या काठावर उभे राहून निर्माल्य संकलित करतात. त्यानंतर त्यातून फूल, बेल आणि हार वेगळे करतात. त्यानंतर हे निर्माल्य शाळेच्या बगिच्यात खोल खड्डा करून पुरले जातात. दोन दिवस यात शेण टाकून ते कुजविले जाते. त्यानंतर मातीने ते झाकून ठेवण्यात येते. वर्षभरानंतर हे खत काढून पुन्हा हीच प्रक्रिया केली जाते. शाळेमध्येच वापररजनी आमले यांनी सांगितले की, वर्षभरात हे खत तयार होत असले तरी मध्ये हे खत काढून त्याचा उपयोग शाळेच्या बगिचासाठी केला जातो. यातून विद्यार्थ्यांना ज्ञान तर मिळतेच. पण, त्यांच्यामध्ये पर्यावरणविषयक जागरूकताही निर्माण होते. भारतीय चलनाचा अपव्यय अनेक गणेशोत्स्व मंडळांद्वारे विड्याखाली ठेवले जाणारे पैसेदेखील नदीमध्ये विसर्जित केले जातात. यामुळे भारतीय चलनाचा अपव्यय होतो. हे टाळण्यासाठी रजनी आमले यांनी गणेशोत्सव मंडळांना विड्याखाली ठेवलेली सुपारी आणि पैसे निर्माल्यासमवेत टाकण्याचे आवाहन रजनी आमले यांनी केले आहे.