शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
3
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
4
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
5
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
6
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
7
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
8
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
9
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
10
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
11
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
12
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
13
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
14
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
15
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
16
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
17
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
18
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
19
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
20
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत

‘अम्ब्लोपिया’मुळे मुलांची दृष्टी जाण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 01:20 IST

तिरळेपणा, जाड भिंगाचा चष्मा वापरणाऱ्या मुलांच्या डोळ्याची तपासणी ४ ते ८ वर्षांपर्यंत करणे गरजेचे आहे. अन्यथा अम्ब्लोपिया आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्यात ९१ हजार मुलांना दृष्टीदोष असल्याचे समोर आले आहे. याकडे पालकांनी दुर्लक्ष केल्यास अशा मुलांची दृष्टी कायमची जाण्याची भीती वैद्यकीय सूत्रांनी वर्तविली आहे.

ठळक मुद्देसावधान! : राज्यात ९१ हजार मुलांमध्ये दृष्टीदोष, वेळीच काळजी घेण्याचे तज्ज्ञांचे आवाहन

इंदल चव्हाण।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : तिरळेपणा, जाड भिंगाचा चष्मा वापरणाऱ्या मुलांच्या डोळ्याची तपासणी ४ ते ८ वर्षांपर्यंत करणे गरजेचे आहे. अन्यथा अम्ब्लोपिया आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्यात ९१ हजार मुलांना दृष्टीदोष असल्याचे समोर आले आहे. याकडे पालकांनी दुर्लक्ष केल्यास अशा मुलांची दृष्टी कायमची जाण्याची भीती वैद्यकीय सूत्रांनी वर्तविली आहे.अम्ब्लोपिया (लेझी आय) हा एक प्रादुर्भावामुळे आढळणारा डोळ्यांचा आजार आहे. ज्यामुळे जवळपास ५ ते १० टक्के लहान मुले ग्रस्त आहेत. आपल्या डोळ्यावर पडणारा प्रकाश डोळ्यातील दृष्टीपटलातून डोळ्यात शिरतो. त्याचे रुपांतर मज्जातंतू संदेशामध्ये होऊन तो डोळ्याच्या नसातून मेंदूपर्यंत जातो. मेंदू व डोळ्याच्या साह्याने आपणास दृष्टी येते. लेझी आय म्हणजे आपला एक किंवा दोन्ही डोळ्यांची दृष्टी काही कारणास्तव कमी होते व डोळा आळशी होतो. तपासणी केल्यावर जरी डोळा बाहेरून सामान्य वाटत असला तरी त्याची कार्यक्षमता कमी होते. परिणामी दुसºया डोळ्यावर ताण येतो. लहान मुले बरेचदा सांगण्यास असमर्थ असल्याने जोपर्यंत तिरळेपणा वा मोतीबिंदू स्पष्ट दिसणार नाही तोपर्यंत त्याचे निदान होेणार नाही.अम्ब्लोपिया आजारात डोळा बाहेरून सामान्य वाटत असेल तर पालकांनाही ते ओळखणे शक्य होणार नाही. ज्या कुटुंबात डोळा तिरळेपणा, चष्म्याचे नंबर, मोतीबिंदू वा इतर आजार असेल त्यांनी आपल्या १ ते ४ वर्षांपर्यंच्या मुला-मुलींच्या डोळ्यांची तपासणी करून घेणे गरजेचे आहे. नेत्रतज्ज्ञ विविध प्रकारच्या चिकित्सा करून लेझी आय निदान करण्यास समर्थ असतात. या आजाराचे शक्य तेवढे लवकर निदान व उपचार केल्यास दृष्टी टिकवून ठेवणे सोयीचे होईल. वेळीच उपचार न केल्यास कायमस्वरुपी दृष्टी निकामी होऊ शकते व नंतर सुधारणा होऊ शकत नाही. त्यामुळे अ‍ॅम्ब्लॉपिया आजारावर उपचार करण्याची योग्य वेळ म्हणजेच जन्मापासून ४ वर्षांपर्यंत करावे. तसे १० वर्षांपर्यंत होऊ शकेल आहे. पण त्याचा किती लाभ होऊ शकेल, हे सांगणे कठीण असल्याची इर्विन रुग्णालयाच्या बाल नेत्रतज्ज्ञ प्रीती तायडे म्हणाल्या.अम्ब्लोपिया आजाराची ओळख उशिरा होते. परंतु उपचार किमान ८ वर्षांपर्यंत करणे गरजेचे आहे. याकडे दुर्लक्ष केल्यास रुग्णाला आयुष्यभरासाठी दृष्टी गमावण्याची वेळ येते.- नम्रता सोनोने,जिल्हा नेत्र सर्जन,इर्विन रुग्णालय, अमरावतीउपाययोजनालेझी आयचे निदान उशिरा कळते. त्यावर उपचार दुष्कर होण्याची वाट न पाहता नेत्रतज्ज्ञांकडून तपासणी करून योग्य उपचाराद्वारे पाल्याला दृष्टीदोषापासून वाचवावे. मोबाईल, टी.व्ही.व्हिडीओ गेम खेळण्याची मुलांमधील क्रेज वाढत असून हे अम्ब्लोपिया आजारास कारणीभूत ठरू शकते.लक्षणे१ ते ४ वर्षांपर्यंत डोळ्यात तिरळेपणा, चष्म्याचा नंबर, एका डोळ्याची दृष्टी कमी होणे, डोळ्याची वृद्धी थांबणे आदी लक्षणे दिसल्यास त्वरित तपासणी करून घ्यावी.

टॅग्स :Healthआरोग्य