शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

‘अम्ब्लोपिया’मुळे मुलांची दृष्टी जाण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 01:20 IST

तिरळेपणा, जाड भिंगाचा चष्मा वापरणाऱ्या मुलांच्या डोळ्याची तपासणी ४ ते ८ वर्षांपर्यंत करणे गरजेचे आहे. अन्यथा अम्ब्लोपिया आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्यात ९१ हजार मुलांना दृष्टीदोष असल्याचे समोर आले आहे. याकडे पालकांनी दुर्लक्ष केल्यास अशा मुलांची दृष्टी कायमची जाण्याची भीती वैद्यकीय सूत्रांनी वर्तविली आहे.

ठळक मुद्देसावधान! : राज्यात ९१ हजार मुलांमध्ये दृष्टीदोष, वेळीच काळजी घेण्याचे तज्ज्ञांचे आवाहन

इंदल चव्हाण।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : तिरळेपणा, जाड भिंगाचा चष्मा वापरणाऱ्या मुलांच्या डोळ्याची तपासणी ४ ते ८ वर्षांपर्यंत करणे गरजेचे आहे. अन्यथा अम्ब्लोपिया आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्यात ९१ हजार मुलांना दृष्टीदोष असल्याचे समोर आले आहे. याकडे पालकांनी दुर्लक्ष केल्यास अशा मुलांची दृष्टी कायमची जाण्याची भीती वैद्यकीय सूत्रांनी वर्तविली आहे.अम्ब्लोपिया (लेझी आय) हा एक प्रादुर्भावामुळे आढळणारा डोळ्यांचा आजार आहे. ज्यामुळे जवळपास ५ ते १० टक्के लहान मुले ग्रस्त आहेत. आपल्या डोळ्यावर पडणारा प्रकाश डोळ्यातील दृष्टीपटलातून डोळ्यात शिरतो. त्याचे रुपांतर मज्जातंतू संदेशामध्ये होऊन तो डोळ्याच्या नसातून मेंदूपर्यंत जातो. मेंदू व डोळ्याच्या साह्याने आपणास दृष्टी येते. लेझी आय म्हणजे आपला एक किंवा दोन्ही डोळ्यांची दृष्टी काही कारणास्तव कमी होते व डोळा आळशी होतो. तपासणी केल्यावर जरी डोळा बाहेरून सामान्य वाटत असला तरी त्याची कार्यक्षमता कमी होते. परिणामी दुसºया डोळ्यावर ताण येतो. लहान मुले बरेचदा सांगण्यास असमर्थ असल्याने जोपर्यंत तिरळेपणा वा मोतीबिंदू स्पष्ट दिसणार नाही तोपर्यंत त्याचे निदान होेणार नाही.अम्ब्लोपिया आजारात डोळा बाहेरून सामान्य वाटत असेल तर पालकांनाही ते ओळखणे शक्य होणार नाही. ज्या कुटुंबात डोळा तिरळेपणा, चष्म्याचे नंबर, मोतीबिंदू वा इतर आजार असेल त्यांनी आपल्या १ ते ४ वर्षांपर्यंच्या मुला-मुलींच्या डोळ्यांची तपासणी करून घेणे गरजेचे आहे. नेत्रतज्ज्ञ विविध प्रकारच्या चिकित्सा करून लेझी आय निदान करण्यास समर्थ असतात. या आजाराचे शक्य तेवढे लवकर निदान व उपचार केल्यास दृष्टी टिकवून ठेवणे सोयीचे होईल. वेळीच उपचार न केल्यास कायमस्वरुपी दृष्टी निकामी होऊ शकते व नंतर सुधारणा होऊ शकत नाही. त्यामुळे अ‍ॅम्ब्लॉपिया आजारावर उपचार करण्याची योग्य वेळ म्हणजेच जन्मापासून ४ वर्षांपर्यंत करावे. तसे १० वर्षांपर्यंत होऊ शकेल आहे. पण त्याचा किती लाभ होऊ शकेल, हे सांगणे कठीण असल्याची इर्विन रुग्णालयाच्या बाल नेत्रतज्ज्ञ प्रीती तायडे म्हणाल्या.अम्ब्लोपिया आजाराची ओळख उशिरा होते. परंतु उपचार किमान ८ वर्षांपर्यंत करणे गरजेचे आहे. याकडे दुर्लक्ष केल्यास रुग्णाला आयुष्यभरासाठी दृष्टी गमावण्याची वेळ येते.- नम्रता सोनोने,जिल्हा नेत्र सर्जन,इर्विन रुग्णालय, अमरावतीउपाययोजनालेझी आयचे निदान उशिरा कळते. त्यावर उपचार दुष्कर होण्याची वाट न पाहता नेत्रतज्ज्ञांकडून तपासणी करून योग्य उपचाराद्वारे पाल्याला दृष्टीदोषापासून वाचवावे. मोबाईल, टी.व्ही.व्हिडीओ गेम खेळण्याची मुलांमधील क्रेज वाढत असून हे अम्ब्लोपिया आजारास कारणीभूत ठरू शकते.लक्षणे१ ते ४ वर्षांपर्यंत डोळ्यात तिरळेपणा, चष्म्याचा नंबर, एका डोळ्याची दृष्टी कमी होणे, डोळ्याची वृद्धी थांबणे आदी लक्षणे दिसल्यास त्वरित तपासणी करून घ्यावी.

टॅग्स :Healthआरोग्य