शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
2
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
3
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
4
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
5
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
6
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
7
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
8
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
9
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
10
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
11
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
12
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
13
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
14
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
15
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
16
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
17
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
18
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
19
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
20
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम

कृत्रिम पाणीटंचाईला सदोष पाईपलाईन कारणीभूत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:12 IST

परतवाडा : शहरात नको त्या ठिकाणी अमृतची पाईपलाईन चंद्रभागेच्या पाईपलाईनला जोडल्यामुळे शहरात दोन्ही पाईपलाईनमधून एकाच वेळी पाणी फिरत आहे. ...

परतवाडा : शहरात नको त्या ठिकाणी अमृतची पाईपलाईन चंद्रभागेच्या पाईपलाईनला जोडल्यामुळे शहरात दोन्ही पाईपलाईनमधून एकाच वेळी पाणी फिरत आहे. परंतु या फिरत्या पाण्याची व शहरात अंथरल्या गेलेल्या वितरण व्यवस्थेतील पाईपलाईनची माहिती कार्यरत अभियंत्यांकडे नाही. यामुळे वितरण व्यवस्थेतील दोष याअभियंत्यांच्या हाती लागत नाहीत. या अमृतच्या पाईपलाईनमुळे शहरातील पाणीपुरवठ्याचा बट्ट्याबोळ झाला आहे.

शहरवासीयांना पाणीपुरवठा करण्यास ती अपयशी ठरली आहे. ती चंद्रभागेच्या वितरण व्यवस्थेतही अडथळे निर्माण करीत आहे. या अमृतमुळे सर्वच त्रस्त असून, अमृतच्या कामाची चौकशी केली जावी. त्यातील उणिवा शोधून त्या निकाली काढल्या जाव्यात. उर्वरित शिल्लक कामे संबंधित ठेकेदाराकडून पूर्ण करून घ्यावी. तोपर्यंत ठेकेदाराला प्रलंबित कामाचे बिल अदा केले जाऊ नये. अमृतमधील घोळ निस्तारून नागरिकांना पाणी उपलब्ध करून देण्याचे निर्देश राज्यमंत्री बच्चू कडू यांनी अचलपूर सर्किट हाऊसवर घेतलेल्या बैठकीत नगरपालिका प्रशासनाला एक वर्षापूर्वीच दिले होते. यात राज्यमंत्री चांगलेच आक्रमक झाले होते. पण अजूनही नगरपालिका प्रशासनाकडून अमृत योजनेतील घोळ निस्तारल्या गेलेला नाही.

ठेकेदार मिळत नाही!

पाणीपुरवठ्याची कामे करण्याकरिता नगरपालिकेला ठेकेदारच मिळत नाहीत. कंत्राटदार निविदा काढूनही भरत नाहीत. चार ते सात वेळा फेरनिविदा काढाव्या लागतात. जबरदस्तीने एखाद्याला पकडून आणून त्याच्या अटी मान्य करून निविदा भरून घ्याव्या लागत आहे. यात पांढऱ्या पुलाचे काम मागील एक वर्षापासून रखडले आहे. जयस्तंभपासून तहसीलपर्यंत अचलपूर शहराकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरणाचे काम दोन वर्षांपासून रखडले आहे. रस्त्याचे काम करताना त्रासदायक ठरत असलेली पाईपलाईन शिफ्ट करण्याबाबत ठेकेदाराकडून नगरपालिकेला पत्र देण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तसे नगरपरिषदेला सुचविले आहे. पण नगरपालिकेकडून अद्याप पाईपलाईन शिफ्ट करण्यात आलेली नाही.

कंत्राटदाराला जेव्हा जाग येते!

कंत्राटदाराला जेव्हा जाग येते, तेव्हा तो रस्त्याचे कुठेतरी खोदकाम सुरू करतो. अवघ्या ५० मीटरच्या खोदकामात चार ठिकाणी जेसीबीकडून पिण्याच्या पाण्याची ती पाईपलाईन फुटते. अवघ्या एक-दीड फुटावरील ही पाईपलाईन जागोजागी लिकेजमुळे नागरिकांना नव्याने पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य पाईपलाईनसह वितरण व्यवस्थेतील पाईपला ठिकठिकाणी गळती लागली आहे. यातून लाखो लिटर पाणी वाया जात आहे.