शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

मनसेच्या कार्यकर्त्यांचे स्मशानभूमीत उपोषण

By admin | Updated: December 22, 2016 00:39 IST

तालुका प्रशासनाला वारंवार निवेदन देऊन सुद्धा दाखल न घेतल्याने तालुक्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी ...

योजनांपासून बेदखल : मेळघाटात कर्मचारी बेपत्ता चिखलदरा : तालुका प्रशासनाला वारंवार निवेदन देऊन सुद्धा दाखल न घेतल्याने तालुक्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी जामली येथे बुधवारपासून चक्क स्मशानभूमितच साखळी उपोषणाला सुरुवात केली. जामली (आट) गावात निराधार योजनेचा लाभ आदिवासींना न देता वंचित ठेवण्यात आले आहे. पंचायत समिती विशेष घटक योजनेंतर्गत दिल्या जाणाऱ्या साहित्य वाटपाची यादी ग्रापं. कार्यालयात लावण्यात यावी, कृषीसेवकाने आठवड्यातून एक दिवस उपस्थित राहून आदिवासी शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचवावी, मग्रारोहयो अंतर्गत जॉबकार्डधारकांना रोजगार हमी योजनेची कामे द्यावीत, प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात औषधीसाठा उपलब्ध करून देण्यात यावा, आदिवासी विभागामार्फत कल्याणकारी योजनांची माहिती पोहोचविण्यात यावी, ग्रामसेवक, पटवारी, शिक्षक सतत बेपत्ता राहात असल्याने त्यांच्यावर कारवाई करावी, इंटरनेट सुविधा, मोबाईल टॉवर उभारण्यात यावे, विद्युत रिडिंग न घेता देयके काढणे बंद करावे, आदी मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी तसेच धारणी व चिखलदरा येथील तहसीलदारांना वारंवार निवेदन देण्यात आले. मात्र, त्याकडे लक्ष देण्यात आले नाही. परिणामी मनसेचे मणिराम दहिकर, प्रवीण बेलसरे, रामकिसन सेलुकर, दीपक भुसूम, गौतम देवगे, प्यारेलाल दहीकर, रामलाल कास्देकर, अरविंद दहीकर, रायबाबू दहीकर, श्रीराम दहीकर, नंदलाल बेलसरे, किरण सावरकर, सूर्या तोटे आदींनी बुधवारपासून जामली येथील स्मशानभूमित उपोषण सुरू केले आहे. मनेसेचे प्रियेश अवघड व अंकुश इंगळे यांच्या नेतृत्वात सुरु झालेल्या उपोषणाची प्रशासनाने तत्काळ दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देखील मनसेच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे. आदिवासींच्या हितार्थ सुरू करण्यात आलेल्या या उपोषणामुळे प्रशासनात खळबळ उडाली असून हा औत्सुक्याचा विषय ठरला आहे. परिसरात संताप आदिवासींपर्यंत योजनांचा लाभ पोहोचत नाही. अधिकारी, कर्मचारी बेपत्ता राहतात. प्रशासनाला निवेदन देऊन दखल घेतली जात नसल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.