शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
2
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
3
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
4
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
5
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
6
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
7
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी
8
IPL 2025: "धोनीचे फॅन्स खरे आहेत, बाकीच्यांचे..."; हरभजन सिंगने विराट कोहलीवर केला शाब्दिक हल्ला?
9
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
10
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
11
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
12
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
13
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
14
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
15
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
16
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
17
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
18
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
19
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?
20
अनिल अंबानी पुन्हा ॲक्शन मोडमध्ये! मुकेश अंबानींना देणार टक्कर? भूतानसोबत २००० कोटींचा करार

नेरपिंगळाई ग्रामपंचायतीच्या विरोधात उपोषण

By admin | Updated: February 7, 2015 23:17 IST

स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनामुळे येथील नागरिक त्रस्त झाले असून तसेच ग्रामसचिवाच्या बेताल वागण्यामुळे अखेर येथील नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासनाच्या विरोधात विविध

नेरपिंगळाई : स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनामुळे येथील नागरिक त्रस्त झाले असून तसेच ग्रामसचिवाच्या बेताल वागण्यामुळे अखेर येथील नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासनाच्या विरोधात विविध मागण्यांसाठी बेमुदत उपोषण सुरु केले आहे.महाराष्ट्र राज्य स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पाअंतर्गत २०.३१ रुपये खर्च करुन बांधलेले बाजार ओटे व काँक्रीट रस्ते विना परवाना तोडल्याने या प्रकरणाची चौकशी होऊन त्यांचेवर फौजदारी गुन्हे दाखल व्हावे. २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताकदिनी झालेल्या ग्रामसभेत, सदस्यांनी सरपंचावर अविश्वास दाखवून त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली. सन २०११ ते १२ मध्ये रमाई आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेले घरकूल शासकीय जागेवर अतिक्रमण करुन ४५ ते ५० वर्षांपासून राहत असलेल्या लाभार्थ्यांना घरकुलाकरिता जागेचे पट्टे देण्यात यावे. ज्या नागरिकांचे बीपीएल यादीमध्ये नावे आहेत त्यांना नियमानुसार घरकूल देण्यात यावे, अशा मागण्यांसाठी राजेश कोंडवते, प्रल्हाद गेडाम, कमल धुर्वे, लखन वरखडे, प्यारेलाल शेलोकर, किसन टेकाम, पंजाब मोहोकर, फत्तू गायकवाड, दिलीप पांडे, किसन सोनोने, देवराव पांडे, मंदा सोनोने, चंद्रकला तुमसरे आदी नागरिक बेमुदत उपोषणावर ग्रामपंचायत समोर बसले आहेत. दोन दिवसांपासून सुरु असलेल्या नागरिकांच्या या बेमुदत उपोषणाकडे ग्रामसचिव वाघ हे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे. (वार्ताहर)