शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
3
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
4
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
5
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
6
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
7
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
8
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
9
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
10
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
11
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
12
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
13
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
14
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
15
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
16
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
17
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
18
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
19
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
20
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  

राज्याच्या वनविभागात सुधारित पदांचा फार्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:13 IST

अमरावती : ब्रिटिशकाळापासून वनविभागाची रचना कायम आहे. मात्र, वनक्षेत्र आणि वन्यजिवांवर वाढता ताण लक्षात घेता क्षेत्रीय वनाधिकारी, कर्मचाऱ्यांची ...

अमरावती : ब्रिटिशकाळापासून वनविभागाची रचना कायम आहे. मात्र, वनक्षेत्र आणि वन्यजिवांवर वाढता ताण लक्षात घेता क्षेत्रीय वनाधिकारी, कर्मचाऱ्यांची पदे न वाढविता ती खिळखिळी करून आयएफएस लॉबीने नवीन आकृतीबंधाच्या नावाखाली ‘गोंडस’ प्रकार पुढे आणला आहे.

तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि वनविभागाने पदांचा फेरआढावा घेण्यासाठी, पदांचा सुधारित आकृतीबंध आराखडा तयार करण्यासाठी समितीचे गठन केले होते. त्यानुसार प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबलप्रमुख) यांनी अहवाल तयार केल्यानंतर महसूल व वनविभागाने शासन निर्णय क्रमांक ७७/३८ नुसार २१ सप्टेंबर २०२१ रोजी पदांची फेररचना केली. परंतु, वनपरिक्षेत्राधिकारी, वनपाल, वनरक्षक ही पदे न वाढविता पदांची अदलाबदल केली आहे.

वनविभागात विविध संवर्गाची केवळ १९०३४ नियमित पदे आहेत. यात ८,३२९ वन मजुरांची पदे आहेत. वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांची ९९१, वनपाल ३०२५, वनरक्षक ९८७७, वन सर्व्हेअर २६०, कनिष्ठ अभियंता १०, सहायक वनरक्षक २८९ एवढी पदे आहेत. या पदात कोणतीही वाढ केलेली नाही. वनक्षेत्र वाढत असताना ब्रिटिशकाळापासून तेवढीच पदे असून, वनरक्षकांची पदे पोलीस खात्याच्या तुलनेत अत्यंत कमी आहेत.

-----------------

शिकार, अतिक्रमणाची समस्या

वनक्षेत्रात अतिक्रमणाची समस्या मोठी आहे. वनजमिनीची माेजणी, सीमा निश्चितीसाठी प्रत्येक विभागात सर्व्हेअर पद आहे. मात्र, वन विभागात सर्व्हेअर पदात वाढ केली नाही. हे पद तांत्रिक असल्याने वनविभागाने यावर लक्ष दिले नाही. वन्यजीवांची तस्करीचे प्रमाण वाढले असताना प्रतिनियुक्तीवरील काही पदे आवंटित करणे गरजचे आहे.

----------------

वनविभागात उपशाखा वाढल्या

पूर्वी वनविभागात प्रादेशिक वनविभाग हे एकच विंग होते. आता व्याघ्र प्रकल्प, सामाजिक वनीकरण, बांबू विकास मंडळ, जैवविविधता मंडळ, निसर्ग पर्यटन मंडळ, शिक्षण व प्रशिक्षण, मूल्यांकन, वन जमाबंदी कांदळवन, भूमी अभिलेख, कार्य आयोजना, प्राणी संग्रहालय, सिल्वा अशा १३ उपशाखांची भर पडली आहे. मात्र, पदे तितकीच ठेवण्यात आली आहे. वनपाल, वनरक्षकांची शेकडो पदे रिक्त असताना आयएफएस लॉबीचे लक्ष नाही.

----------------

अपुरे साधन, सामग्री

वनविभागात वन्यजीव- मानव संघर्ष, अतिक्रमण, सागवान तस्करी फोफावली आहे. अतिरिक्त कर्मचारी रेंजनिहाय असणे आवश्यक आहे. मात्र, त्यांना साधन, सामग्री व प्रशिक्षणाची सोय नाही. त्याअनुषंगाने वनखात्याने उपाययोजना केल्या नाहीत. इंधनाअभावी काही परिक्षेत्रात वाहने बंद आहेत. त्यामुळे वनकर्मचाऱ्यांना असंख्य समस्यांचा सामना करावा लागत आहे.