शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
2
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
3
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
4
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
5
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
6
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
7
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
8
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
9
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
10
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
11
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
12
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
13
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
14
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
15
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
16
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
17
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
18
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
19
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
20
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा

राज्याच्या वनविभागात सुधारित पदांचा फार्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:13 IST

अमरावती : ब्रिटिशकाळापासून वनविभागाची रचना कायम आहे. मात्र, वनक्षेत्र आणि वन्यजिवांवर वाढता ताण लक्षात घेता क्षेत्रीय वनाधिकारी, कर्मचाऱ्यांची ...

अमरावती : ब्रिटिशकाळापासून वनविभागाची रचना कायम आहे. मात्र, वनक्षेत्र आणि वन्यजिवांवर वाढता ताण लक्षात घेता क्षेत्रीय वनाधिकारी, कर्मचाऱ्यांची पदे न वाढविता ती खिळखिळी करून आयएफएस लॉबीने नवीन आकृतीबंधाच्या नावाखाली ‘गोंडस’ प्रकार पुढे आणला आहे.

तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि वनविभागाने पदांचा फेरआढावा घेण्यासाठी, पदांचा सुधारित आकृतीबंध आराखडा तयार करण्यासाठी समितीचे गठन केले होते. त्यानुसार प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबलप्रमुख) यांनी अहवाल तयार केल्यानंतर महसूल व वनविभागाने शासन निर्णय क्रमांक ७७/३८ नुसार २१ सप्टेंबर २०२१ रोजी पदांची फेररचना केली. परंतु, वनपरिक्षेत्राधिकारी, वनपाल, वनरक्षक ही पदे न वाढविता पदांची अदलाबदल केली आहे.

वनविभागात विविध संवर्गाची केवळ १९०३४ नियमित पदे आहेत. यात ८,३२९ वन मजुरांची पदे आहेत. वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांची ९९१, वनपाल ३०२५, वनरक्षक ९८७७, वन सर्व्हेअर २६०, कनिष्ठ अभियंता १०, सहायक वनरक्षक २८९ एवढी पदे आहेत. या पदात कोणतीही वाढ केलेली नाही. वनक्षेत्र वाढत असताना ब्रिटिशकाळापासून तेवढीच पदे असून, वनरक्षकांची पदे पोलीस खात्याच्या तुलनेत अत्यंत कमी आहेत.

-----------------

शिकार, अतिक्रमणाची समस्या

वनक्षेत्रात अतिक्रमणाची समस्या मोठी आहे. वनजमिनीची माेजणी, सीमा निश्चितीसाठी प्रत्येक विभागात सर्व्हेअर पद आहे. मात्र, वन विभागात सर्व्हेअर पदात वाढ केली नाही. हे पद तांत्रिक असल्याने वनविभागाने यावर लक्ष दिले नाही. वन्यजीवांची तस्करीचे प्रमाण वाढले असताना प्रतिनियुक्तीवरील काही पदे आवंटित करणे गरजचे आहे.

----------------

वनविभागात उपशाखा वाढल्या

पूर्वी वनविभागात प्रादेशिक वनविभाग हे एकच विंग होते. आता व्याघ्र प्रकल्प, सामाजिक वनीकरण, बांबू विकास मंडळ, जैवविविधता मंडळ, निसर्ग पर्यटन मंडळ, शिक्षण व प्रशिक्षण, मूल्यांकन, वन जमाबंदी कांदळवन, भूमी अभिलेख, कार्य आयोजना, प्राणी संग्रहालय, सिल्वा अशा १३ उपशाखांची भर पडली आहे. मात्र, पदे तितकीच ठेवण्यात आली आहे. वनपाल, वनरक्षकांची शेकडो पदे रिक्त असताना आयएफएस लॉबीचे लक्ष नाही.

----------------

अपुरे साधन, सामग्री

वनविभागात वन्यजीव- मानव संघर्ष, अतिक्रमण, सागवान तस्करी फोफावली आहे. अतिरिक्त कर्मचारी रेंजनिहाय असणे आवश्यक आहे. मात्र, त्यांना साधन, सामग्री व प्रशिक्षणाची सोय नाही. त्याअनुषंगाने वनखात्याने उपाययोजना केल्या नाहीत. इंधनाअभावी काही परिक्षेत्रात वाहने बंद आहेत. त्यामुळे वनकर्मचाऱ्यांना असंख्य समस्यांचा सामना करावा लागत आहे.