शहरं
Join us  
Trending Stories
1
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
2
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
3
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
4
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
5
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
6
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
7
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
8
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
9
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
10
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
11
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
12
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
13
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
14
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
15
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
16
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
17
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
18
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
19
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
20
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन

शेतकरी संकटात, भरपाईची मागणी

By admin | Updated: February 12, 2015 00:18 IST

मंगळवारी रात्रीला आलेल्या वादळासह अवकाळी पावसाने रबीच्या पिकाचे मोठे नुकसान झाले. संत्र्याच्या आंबिया व मृग बहाराची फळे गळली.

अमरावती : मंगळवारी रात्रीला आलेल्या वादळासह अवकाळी पावसाने रबीच्या पिकाचे मोठे नुकसान झाले. संत्र्याच्या आंबिया व मृग बहाराची फळे गळली. नांदगाव तालुक्यात काही ठिकाणी हरभऱ्याच्या आकाराची गारपीट झाली. अंजनगाव, पथ्रोट परिसरात केळी पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. नुकसानग्रस्त भागाचे तातडीने सर्व्हेक्षण करण्याची मागणी जोर धरत आहे. शेतकऱ्यांवर वारंवार नैसर्गिक आपत्तीचा मार बसत असल्याने जगावे कसे हा प्रश्न निर्माण झाला आहे. नांदगाव तालुक्यात गारांसह पाऊसनांदगाव खंडेश्वर : तालुक्यात रात्री १ वाजताच्या सुमारास वादळी पावसासह बोराच्या आकाराच्या गारा पडल्याने संत्रा गहू, हरभरा, तूर, आंबा या पिकाचे नुकसान झाले. खंडाळा, पळसमंडळ, हंसराजपूर परिसरात वादळी पावसाचा तडाखा बसला. तुरीच्या गंज्याही भिजल्या. तालुक्यात ८८४ हेक्टर संत्रात संत्रा, ९७ हेक्टरमध्ये लिंबू व ४२०० हेक्टरमध्ये गव्हाची पेरणी झाली. बुधवारी पळसमंडळचे सरपंच महेंद्र शेंडे, उपसरपंच नरेश ठाकरे, सर्फराज खान, नशीब खान, राजकुमार ठाकरे, भैया रोडे, किशोर ठाकरे, रणजित खडसे यांनी तहसीलदार, तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे मदतीची मागणी केली.