शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

अमरावती जिल्ह्यात शेतकऱ्याचा तहसील कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 09:23 IST

वारंवार प्रशासनाचे लक्ष वेधूनही कर्जमाफी न मिळाल्याने नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील राजना या गावच्या नरेंद्र रामचंद्र मुंदे या तरुण शेतकऱ्याने मंगळवारी दुपारी तहसील कार्यालयात अंगावर रॉकेल घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला.

ठळक मुद्दे‘मी लाभार्थी’चा बुरखा फाटला नांदगाव तहसील कार्यालयातील घटना

आॅनलाईन लोकमतअमरावती : वारंवार प्रशासनाचे लक्ष वेधूनही कर्जमाफी न मिळाल्याने नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील राजना या गावच्या नरेंद्र रामचंद्र मुंदे या तरुण शेतकऱ्याने मंगळवारी दुपारी तहसील कार्यालयात अंगावर रॉकेल घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला. या घटनेनंतर प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. राज्य शासनाद्वारा सर्वत्र नियमित गाजावाजा करण्यात येणाऱ्या ‘मी लाभार्थी’च्या जाहिराती किती फसव्या आहेत, याची प्रचिती यानिमित्ताने पुन्हा एकदा आली.नरेंद्र रामचंद्र मुंदे (३२) यांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, तहसीलदार आणि लोणीच्या ठाणेदारांना ६ नोव्हेंबर रोजी निवेदन देऊन कर्जमाफी मिळाली नसल्याने २१ नोव्हेंबरला दुपारी १ वाजता नांदगाव खंडेश्वर तहसील कार्यालयात आत्मदहन करू, असा इशारा दिला होता. त्यांच्या या इशाऱ्याची प्रशासनाने दखलच घेतली नाही. नरेंद्र यांनी मंगळवारी दुपारी १ च्या दरम्यान तहसील कार्यालयाच्या व्हरांड्यात अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. तहसीलमध्ये उपस्थितांनी प्रसंगवधान राखून अनर्थ टळला.याप्रकरणी नांदगाव खंडेश्वर पोलिसांनी भादंविच्या कलम ३०९ अन्वये आत्महत्येचा प्रयत्न केल्याबद्दल गुन्हा दाखल केला. घटनास्थळी ठाणेदार मगन मेहते, पोलीस उपनिरीक्षक दिलीप सहारे, नांदगाव व लोणी येथील पोलीस ताफा हजर होता. पोलिसांनी नरेंद्र मुंदे याला पोलीस ठाण्यात नेताच तहसील कार्यालयात मोठ्या संख्येने उपस्थित असलेले शेतकरी पोलीस ठाण्यात जमा झाले. मात्र, त्यांना गेटवरच थोपविण्यात येऊन ठाणेदाराने शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलाविले. यावेळी सचिन रिठे, विलास बोरकर, नगराध्यक्ष अक्षय पारसकर, अमोल धवसे, इद्रिसभाई, विनोद मुंदे, गणेश मुंदे आदींनी शेतकऱ्यांची होत असलेल्या लुटीचा विषय अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिले.

शेतकऱ्यांचे प्रसंगावधानआत्मदहनाचा इशारा दिल्याची माहिती राजना व परिसरातील काही शेतकऱ्यांना होती. नरेंद्र यांची परिस्थिती पाहता, ते आत्मघाती पाऊल उचलू शकतील, अशी शंका वाटल्याने काही शेतकरी त्यांच्यावर लक्ष ठेवून होते.परिसरातील कोव्हळा, काजना, राजना, निमसवाडा, साखरा, पिंप्री निपाणी, सुकळी, धानोरा फसी व इतर गावांतील शेतकºयांच्या सतर्कतेने अनर्थ टळला.कर्जाचा बोजा अन् वसुलीचा तगादामुंदे यांच्याकडे पाच एकच शेती आहे. त्यावर २०१४ मध्ये पापळ येथील अलाहाबाद बँकेच्या शाखेतून साडेतीन लाख रुपये पीक कर्ज घेतले आहे. सततच्या नापिकीमुळे व शेतमालाला हमीभाव नसल्यामुळे कर्जाचा बोजा वाढतच राहिला. यंदाच्या हंगामातही अपुऱ्या पावसामुळे खरीपाचे पीक उद्ध्वस्त झाले. उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण, आणि शेतीसाठी लागणारा उत्पादन खर्चही पिकातून काढणे कठीण झाले. वसुलीचा तगादा कायमच होता. कंटाळून हे पाऊल उचलले.

कर्जमाफीसाठीचे अर्ज प्रक्रियेत आहे. घडलेल्या घटनेची माहिती घेतो. वस्तुनिष्ठ अहवाल शासनाला पाठवितो.- पीयूष सिंगविभागीय आयुक्त, अमरावती

टॅग्स :Farmerशेतकरी