शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

अमरावती जिल्ह्यात शेतकऱ्याचा तहसील कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 09:23 IST

वारंवार प्रशासनाचे लक्ष वेधूनही कर्जमाफी न मिळाल्याने नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील राजना या गावच्या नरेंद्र रामचंद्र मुंदे या तरुण शेतकऱ्याने मंगळवारी दुपारी तहसील कार्यालयात अंगावर रॉकेल घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला.

ठळक मुद्दे‘मी लाभार्थी’चा बुरखा फाटला नांदगाव तहसील कार्यालयातील घटना

आॅनलाईन लोकमतअमरावती : वारंवार प्रशासनाचे लक्ष वेधूनही कर्जमाफी न मिळाल्याने नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील राजना या गावच्या नरेंद्र रामचंद्र मुंदे या तरुण शेतकऱ्याने मंगळवारी दुपारी तहसील कार्यालयात अंगावर रॉकेल घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला. या घटनेनंतर प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. राज्य शासनाद्वारा सर्वत्र नियमित गाजावाजा करण्यात येणाऱ्या ‘मी लाभार्थी’च्या जाहिराती किती फसव्या आहेत, याची प्रचिती यानिमित्ताने पुन्हा एकदा आली.नरेंद्र रामचंद्र मुंदे (३२) यांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, तहसीलदार आणि लोणीच्या ठाणेदारांना ६ नोव्हेंबर रोजी निवेदन देऊन कर्जमाफी मिळाली नसल्याने २१ नोव्हेंबरला दुपारी १ वाजता नांदगाव खंडेश्वर तहसील कार्यालयात आत्मदहन करू, असा इशारा दिला होता. त्यांच्या या इशाऱ्याची प्रशासनाने दखलच घेतली नाही. नरेंद्र यांनी मंगळवारी दुपारी १ च्या दरम्यान तहसील कार्यालयाच्या व्हरांड्यात अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. तहसीलमध्ये उपस्थितांनी प्रसंगवधान राखून अनर्थ टळला.याप्रकरणी नांदगाव खंडेश्वर पोलिसांनी भादंविच्या कलम ३०९ अन्वये आत्महत्येचा प्रयत्न केल्याबद्दल गुन्हा दाखल केला. घटनास्थळी ठाणेदार मगन मेहते, पोलीस उपनिरीक्षक दिलीप सहारे, नांदगाव व लोणी येथील पोलीस ताफा हजर होता. पोलिसांनी नरेंद्र मुंदे याला पोलीस ठाण्यात नेताच तहसील कार्यालयात मोठ्या संख्येने उपस्थित असलेले शेतकरी पोलीस ठाण्यात जमा झाले. मात्र, त्यांना गेटवरच थोपविण्यात येऊन ठाणेदाराने शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलाविले. यावेळी सचिन रिठे, विलास बोरकर, नगराध्यक्ष अक्षय पारसकर, अमोल धवसे, इद्रिसभाई, विनोद मुंदे, गणेश मुंदे आदींनी शेतकऱ्यांची होत असलेल्या लुटीचा विषय अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिले.

शेतकऱ्यांचे प्रसंगावधानआत्मदहनाचा इशारा दिल्याची माहिती राजना व परिसरातील काही शेतकऱ्यांना होती. नरेंद्र यांची परिस्थिती पाहता, ते आत्मघाती पाऊल उचलू शकतील, अशी शंका वाटल्याने काही शेतकरी त्यांच्यावर लक्ष ठेवून होते.परिसरातील कोव्हळा, काजना, राजना, निमसवाडा, साखरा, पिंप्री निपाणी, सुकळी, धानोरा फसी व इतर गावांतील शेतकºयांच्या सतर्कतेने अनर्थ टळला.कर्जाचा बोजा अन् वसुलीचा तगादामुंदे यांच्याकडे पाच एकच शेती आहे. त्यावर २०१४ मध्ये पापळ येथील अलाहाबाद बँकेच्या शाखेतून साडेतीन लाख रुपये पीक कर्ज घेतले आहे. सततच्या नापिकीमुळे व शेतमालाला हमीभाव नसल्यामुळे कर्जाचा बोजा वाढतच राहिला. यंदाच्या हंगामातही अपुऱ्या पावसामुळे खरीपाचे पीक उद्ध्वस्त झाले. उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण, आणि शेतीसाठी लागणारा उत्पादन खर्चही पिकातून काढणे कठीण झाले. वसुलीचा तगादा कायमच होता. कंटाळून हे पाऊल उचलले.

कर्जमाफीसाठीचे अर्ज प्रक्रियेत आहे. घडलेल्या घटनेची माहिती घेतो. वस्तुनिष्ठ अहवाल शासनाला पाठवितो.- पीयूष सिंगविभागीय आयुक्त, अमरावती

टॅग्स :Farmerशेतकरी