शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतरिम दिलासा हवा असेल तर मजबूत युक्तिवाद सादर करा; वक्फ सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
2
वेगवान वाऱ्यासह कोसळलेल्या पावसानं ठाणे, रायगड, पालघरला झोडपलं; कोकण रेल्वेलाही फटका
3
'आतापर्यंतचे पेपर चांगले गेले, उद्या गावाकडे येणार...'; गायत्रीने सकाळी केला आईला शेवटचा काॅल..!
4
भारत-पाक संघर्षावेळीही ज्योती ‘आका’च्या संपर्कातच एनआयए, आयबीकडून चौकशीतून निष्पन्न
5
आजचे राशीभविष्य २१ मे २०२५ : अचानक धनलाभ, मित्रांंसाठी खर्च कराल...
6
गावालाच जवानांचा वेढा, ५ जहाल माओवादी ताब्यात; तीन महिलांचा समावेश, ३६ लाख रुपयांचे होते बक्षीस
7
कल्याणमध्ये स्लॅब कोसळून सहा ठार; सहा जखमी; मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांचे अर्थसहाय्य
8
आंदोलनाची धार कमी झाल्यानंतर भुजबळांना मिळाली मंत्रिपदाची संधी; धनंजय मुंडेंचे दोर कापले
9
राज्यात पाच वर्षांत ३५ लाख घरे; झोपडपट्टीमुक्त शहरांचा संकल्प 
10
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
11
वैभव सूर्यंवशीनं धरले MS धोनीचे पाय; मग रंगली स्फोटक बॅटरमध्ये दडलेल्या संस्कारी मुलाची चर्चा
12
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
13
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड
14
कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री बावनकुळे यांचा इशारा
15
कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली
16
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
17
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
18
गुड न्यूज! नागपूर -बिलासपूर मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला आणखी आठ डब्बे जोडणार
19
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
20
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?

मोर्शी तहसील कार्यालयावर धडकले शेतकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 06:00 IST

माजी कृषिमंत्री अनिल बोंडे तहसील कार्यालयापुढे शेतकऱ्यांना संबोधित केले. महाआघाडी सरकार सत्तेत येऊन पाच महिने झाले तरी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला नाही. अतिवृष्टी व गारपिटीमुळे हवालदिल झालेल्या बागायतदारांना हेक्टरी ५० हजार व कोरडवाहू शेतकऱ्यांना २५ हजारांची मदत देण्यात यावी. राज्य सरकारने तूर खरेदीची मर्यादा १४ क्विंटल करावी.

ठळक मुद्देमहाआघाडी सरकारचा निषेध : भाजपकडून तूर, ज्वारी, घरकुलाचा मुद्दा

मोर्शी : शासनाकडे प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांसाठी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वात शेतकरी मंगळवारी तहसील कार्यालयावर धडकले. धरणे आंदोलनानंतर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.माजी कृषिमंत्री अनिल बोंडे तहसील कार्यालयापुढे शेतकऱ्यांना संबोधित केले. महाआघाडी सरकार सत्तेत येऊन पाच महिने झाले तरी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला नाही. अतिवृष्टी व गारपिटीमुळे हवालदिल झालेल्या बागायतदारांना हेक्टरी ५० हजार व कोरडवाहू शेतकऱ्यांना २५ हजारांची मदत देण्यात यावी. राज्य सरकारने तूर खरेदीची मर्यादा १४ क्विंटल करावी. ज्वारीची तात्काळ खरेदी सुरू करण्यात यावी. घरकुल लाभार्थींना थकीत हप्त्याचे वाटप करण्यात यावे. अपंग निधी त्वरित खर्च करण्यात यावा. विद्यार्थ्यांना मोफत बस प्रवास व परीक्षा शुल्कमाफी द्यावी. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेंतर्गत भूमिहीन शेतमजुरांना शेळीचे वाटप करावे. ठिंबक सिंचनाचे अनुदान ८० टक्के करण्यात यावे. जलयुक्त शिवार योजना, ठिंबक सिंचन व तुषार सिंचनासाठी अनुदान योजना, कृषिसमृद्धी अनुदान योजना तसेच शासकीय मत्स्य विज्ञान महाविद्यालय, खत कारखाना आदी प्रकल्पांना गती द्यावी आदी मागण्या अनिल बोंडे यांनी मांडल्या. नगरपालिका उपाध्यक्ष आप्पासाहेब गेडाम, जिल्हा परिषद सदस्य संजय धुलक्षे, सारंग खोडस्कर, नगरसेवक मनोहर शेंडे, हर्षल चौधरी, सुनील ढोले, ब्रह्मानंद देशमुख, सुनीता कोहळे, पंचायत समिती सभापती यादवराव चोपडे, प्रमोद बोबडे, दक्षता समितीचे अध्यक्ष प्रमोद हरणे, देव बुरंगे, रवि मेटकर, किशोर जयस्वाल, अजय आगरकर, ज्योतिप्रसाद मालवीय, नीलेश चौधरी, अशोक खवले, प्रतिभाताई राऊत, माया बासुंदे, चिकू फंदे, भाऊराव शापाने, सुशील सुरोशे यांच्यासह शेकडो शेतकरी-शेतमजूर याप्रसंगी उपस्थित होते.

टॅग्स :Farmerशेतकरी