शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

मोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांना माफक दरात भोजन

By admin | Updated: January 9, 2016 00:29 IST

मोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीला पाच वर्षे पूर्ण झाल्याने शासनाने आपला प्रतिनिधी नियुक्त केला आहे.

मोर्शी : मोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीला पाच वर्षे पूर्ण झाल्याने शासनाने आपला प्रतिनिधी नियुक्त केला आहे. तसेच अप्रशासकीय १८ जणांचे मंडळ नियुक्त केले. हे मंडळ ३ डिसेंबरला नियुक्त केले. त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी अत्यल्प दरात म्हणजे ५ रुपयात जेवण देण्याचा निर्णय घेण्यात आला. या योजनेचे उद्घाटन आ.अनिल बोंडे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रशासक आप्पासाहेब गेडाम यांनी नियुक्त प्रशासक मंडळानी एकाच महिन्याच्या अवधीमध्ये काय केले त्यासंबंधी माहिती दिली. प्रशासक मंडळ नियुक्त झाल्याबरोबरच एक महिन्यात बाजार समितीचे उत्पन्न १० लक्ष रूपयांनी वाढले. शेतकऱ्यांकरिता राहण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था, स्वच्छ पिण्याचे पाणी मोर्शी व लेहेगाव येथे पिण्याच्या पाण्याकरिता बोअर अशा अनेक बाबी करण्याचे ठरविण्यात आले. अगोदर बाजार समितीत हर्रास हा दुपारी ३ नंतर होत होता. त्यामुळे शेतकऱ्यांना रात्री १ ते २ पर्यंत थांबावे लागत होते. परंतु बाजार समितीच्या निर्णयामुळे सचिव लिखितकर यांनी दखल घेऊन हा हर्रास सकाळी सुरू करून शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला. कार्यक्रमाचे उद्घाटन आ.बोंडे यांनी केले. या अगोदर अनेक राजकीय मंडळाने येथे सत्ता भोगली. पण, त्यांनी काहीच केलेले नसताना अशा अनेक लोकांना शेतकरी का निवडून देतात, असा सवालसुद्धा बोंडे यांनी केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शरद भुयार होते. प्रमुख अतिथी म्हणून नवनियुक्त डॉ.पंजाबराव देशमुख बँकेच्या डायरेक्टर प्राध्यापक अंजली ठाकरे उपस्थित होत्या. संचालन सचिव लिखितकर, आभार प्रदर्शन संजय घुलक्षे यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)