शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

पीक विम्यात ‘शेतकरी कंगाल, कंपन्या मालामाल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2022 00:03 IST

पीक विम्याच्या मार्गदर्शक सूचनांनुसार यंदा ‘हंगामातील प्रतिकूल परिस्थिती’ या घटकांतर्गत बाधित मूग, उडदाला परतावा व जिल्हाधिकाऱ्यांनी ८० महसूल मंडळांसाठी अधिसूचना काढली असल्याने सोयाबीनला आतापर्यंत विमा परताव्याचा २५ टक्के अग्रीम मिळायला पाहिजे होता. मात्र, पीक विम्यात सहभागी एकाही शेतकऱ्यांना कंपनीद्वारा परतावा दिलेला नसल्याने पीक विम्यात फक्त कंपनीचेच चांगभले होत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.

गजानन मोहोडलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : नैसर्गिक आपत्तीच्या कठीण प्रसंगी परतावा मिळण्यासाठी यंदाच्या खरिपात शेतकऱ्यांनी २०.४४ कोटींचा पीक विमा हप्ता भरला. राज्य व केंद्र शासनाचे हिस्सा मिळून पीक विमा कंपनीकडे किमान १०० कोटी रुपये जमा होत आहे. त्या तुलनेत बाधित शेतकऱ्यांना छदामही मिळाला नसल्याने पीक विम्यात ‘शेतकरी कंगाल, कंपन्या मालामाल’ असल्याचे वास्तव आहे.पीक विम्याच्या मार्गदर्शक सूचनांनुसार यंदा ‘हंगामातील प्रतिकूल परिस्थिती’ या घटकांतर्गत बाधित मूग, उडदाला परतावा व जिल्हाधिकाऱ्यांनी ८० महसूल मंडळांसाठी अधिसूचना काढली असल्याने सोयाबीनला आतापर्यंत विमा परताव्याचा २५ टक्के अग्रीम मिळायला पाहिजे होता. मात्र, पीक विम्यात सहभागी एकाही शेतकऱ्यांना कंपनीद्वारा परतावा दिलेला नसल्याने पीक विम्यात फक्त कंपनीचेच चांगभले होत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. नैसर्गिक आपत्ती, कीड व रोगांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे, हा प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा प्रमुख उद्देश आहे. या योजनेमध्ये अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा, यासाठी कृषी विभागाने जनजागृती केली. यामध्ये २.१९ लाख शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवीत दोन टक्के म्हणजेच २०,४३,४७,७७२ रुपयांचा हप्ता भरला, याशिवाय उर्वरित ९८ टक्के हिस्सा राज्य व केंद्र शासन भरणार आहेत. ८० कोटींचा हिस्सा शासनाचा राहणार आहे.

पिकनिहाय शेतकरी हिस्साकृषी विभागाच्या माहितीनुसार, यंदाच्या खरिपात २.१९ लाख शेतकऱ्यांनी २०.२३ कोटींचा विमा हप्ता भरला आहे. यामध्ये उडदासाठी ५९.२० लाख, मुगासाठी १.१२ कोट, कपाशी ४.३६ कोटी, धान १४,७२४ रुपये, तूर १.११ कोटी, ज्वार १.९३ लाख व सोयाबीनसाठी सर्वाधिक १३.२५ कोटी रुपयांचा प्रीमियम शेतकऱ्यांनी कंपनीकडे भरणा केला आहे.

तालुकानिहाय शेतकरी प्रीमियम अचलपूर तालुक्यात ७०.०७ लाख, अमरावती १.४० कोटी, अंजनगाव सुर्जी १.५६ कोटी, भातकुली १.८४ कोटी, चांदूर रेल्वे १.२४ कोटी, चांदूरबाजार १.०७, चिखलदरा ११.४० लाख, दर्यापूर ३ कोटी, धामणगाव १.२९ कोटी, धारणी २२.७३ लाख, मोर्शी १.५९ लाख, वरूड ४६.५७ लाख, तिवसा १.७३ कोटी व नांदगाव तालुक्यात ४.१८ कोटींचा प्रीमियम शेतकऱ्यांनी भरला.

अधिसूचनेवरील कंपनीचे आक्षेप निकाली काढले आहे. पीक विमा कंपनीने शेतकऱ्यांना विमा परताव्याचा अग्रिम द्यावा, यासाठी कंपनीला पत्र दिले आहे. कृषी आयुक्तालयानेही कंपनीला पत्र दिलेले आहे. - अनिल खर्चान, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.

 

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाFarmerशेतकरी