शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

पीक विम्यात ‘शेतकरी कंगाल, कंपन्या मालामाल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2022 00:03 IST

पीक विम्याच्या मार्गदर्शक सूचनांनुसार यंदा ‘हंगामातील प्रतिकूल परिस्थिती’ या घटकांतर्गत बाधित मूग, उडदाला परतावा व जिल्हाधिकाऱ्यांनी ८० महसूल मंडळांसाठी अधिसूचना काढली असल्याने सोयाबीनला आतापर्यंत विमा परताव्याचा २५ टक्के अग्रीम मिळायला पाहिजे होता. मात्र, पीक विम्यात सहभागी एकाही शेतकऱ्यांना कंपनीद्वारा परतावा दिलेला नसल्याने पीक विम्यात फक्त कंपनीचेच चांगभले होत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.

गजानन मोहोडलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : नैसर्गिक आपत्तीच्या कठीण प्रसंगी परतावा मिळण्यासाठी यंदाच्या खरिपात शेतकऱ्यांनी २०.४४ कोटींचा पीक विमा हप्ता भरला. राज्य व केंद्र शासनाचे हिस्सा मिळून पीक विमा कंपनीकडे किमान १०० कोटी रुपये जमा होत आहे. त्या तुलनेत बाधित शेतकऱ्यांना छदामही मिळाला नसल्याने पीक विम्यात ‘शेतकरी कंगाल, कंपन्या मालामाल’ असल्याचे वास्तव आहे.पीक विम्याच्या मार्गदर्शक सूचनांनुसार यंदा ‘हंगामातील प्रतिकूल परिस्थिती’ या घटकांतर्गत बाधित मूग, उडदाला परतावा व जिल्हाधिकाऱ्यांनी ८० महसूल मंडळांसाठी अधिसूचना काढली असल्याने सोयाबीनला आतापर्यंत विमा परताव्याचा २५ टक्के अग्रीम मिळायला पाहिजे होता. मात्र, पीक विम्यात सहभागी एकाही शेतकऱ्यांना कंपनीद्वारा परतावा दिलेला नसल्याने पीक विम्यात फक्त कंपनीचेच चांगभले होत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. नैसर्गिक आपत्ती, कीड व रोगांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे, हा प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा प्रमुख उद्देश आहे. या योजनेमध्ये अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा, यासाठी कृषी विभागाने जनजागृती केली. यामध्ये २.१९ लाख शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवीत दोन टक्के म्हणजेच २०,४३,४७,७७२ रुपयांचा हप्ता भरला, याशिवाय उर्वरित ९८ टक्के हिस्सा राज्य व केंद्र शासन भरणार आहेत. ८० कोटींचा हिस्सा शासनाचा राहणार आहे.

पिकनिहाय शेतकरी हिस्साकृषी विभागाच्या माहितीनुसार, यंदाच्या खरिपात २.१९ लाख शेतकऱ्यांनी २०.२३ कोटींचा विमा हप्ता भरला आहे. यामध्ये उडदासाठी ५९.२० लाख, मुगासाठी १.१२ कोट, कपाशी ४.३६ कोटी, धान १४,७२४ रुपये, तूर १.११ कोटी, ज्वार १.९३ लाख व सोयाबीनसाठी सर्वाधिक १३.२५ कोटी रुपयांचा प्रीमियम शेतकऱ्यांनी कंपनीकडे भरणा केला आहे.

तालुकानिहाय शेतकरी प्रीमियम अचलपूर तालुक्यात ७०.०७ लाख, अमरावती १.४० कोटी, अंजनगाव सुर्जी १.५६ कोटी, भातकुली १.८४ कोटी, चांदूर रेल्वे १.२४ कोटी, चांदूरबाजार १.०७, चिखलदरा ११.४० लाख, दर्यापूर ३ कोटी, धामणगाव १.२९ कोटी, धारणी २२.७३ लाख, मोर्शी १.५९ लाख, वरूड ४६.५७ लाख, तिवसा १.७३ कोटी व नांदगाव तालुक्यात ४.१८ कोटींचा प्रीमियम शेतकऱ्यांनी भरला.

अधिसूचनेवरील कंपनीचे आक्षेप निकाली काढले आहे. पीक विमा कंपनीने शेतकऱ्यांना विमा परताव्याचा अग्रिम द्यावा, यासाठी कंपनीला पत्र दिले आहे. कृषी आयुक्तालयानेही कंपनीला पत्र दिलेले आहे. - अनिल खर्चान, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.

 

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाFarmerशेतकरी