शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

पीक विम्यात ‘शेतकरी कंगाल, कंपन्या मालामाल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2022 00:03 IST

पीक विम्याच्या मार्गदर्शक सूचनांनुसार यंदा ‘हंगामातील प्रतिकूल परिस्थिती’ या घटकांतर्गत बाधित मूग, उडदाला परतावा व जिल्हाधिकाऱ्यांनी ८० महसूल मंडळांसाठी अधिसूचना काढली असल्याने सोयाबीनला आतापर्यंत विमा परताव्याचा २५ टक्के अग्रीम मिळायला पाहिजे होता. मात्र, पीक विम्यात सहभागी एकाही शेतकऱ्यांना कंपनीद्वारा परतावा दिलेला नसल्याने पीक विम्यात फक्त कंपनीचेच चांगभले होत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.

गजानन मोहोडलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : नैसर्गिक आपत्तीच्या कठीण प्रसंगी परतावा मिळण्यासाठी यंदाच्या खरिपात शेतकऱ्यांनी २०.४४ कोटींचा पीक विमा हप्ता भरला. राज्य व केंद्र शासनाचे हिस्सा मिळून पीक विमा कंपनीकडे किमान १०० कोटी रुपये जमा होत आहे. त्या तुलनेत बाधित शेतकऱ्यांना छदामही मिळाला नसल्याने पीक विम्यात ‘शेतकरी कंगाल, कंपन्या मालामाल’ असल्याचे वास्तव आहे.पीक विम्याच्या मार्गदर्शक सूचनांनुसार यंदा ‘हंगामातील प्रतिकूल परिस्थिती’ या घटकांतर्गत बाधित मूग, उडदाला परतावा व जिल्हाधिकाऱ्यांनी ८० महसूल मंडळांसाठी अधिसूचना काढली असल्याने सोयाबीनला आतापर्यंत विमा परताव्याचा २५ टक्के अग्रीम मिळायला पाहिजे होता. मात्र, पीक विम्यात सहभागी एकाही शेतकऱ्यांना कंपनीद्वारा परतावा दिलेला नसल्याने पीक विम्यात फक्त कंपनीचेच चांगभले होत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. नैसर्गिक आपत्ती, कीड व रोगांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे, हा प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा प्रमुख उद्देश आहे. या योजनेमध्ये अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा, यासाठी कृषी विभागाने जनजागृती केली. यामध्ये २.१९ लाख शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवीत दोन टक्के म्हणजेच २०,४३,४७,७७२ रुपयांचा हप्ता भरला, याशिवाय उर्वरित ९८ टक्के हिस्सा राज्य व केंद्र शासन भरणार आहेत. ८० कोटींचा हिस्सा शासनाचा राहणार आहे.

पिकनिहाय शेतकरी हिस्साकृषी विभागाच्या माहितीनुसार, यंदाच्या खरिपात २.१९ लाख शेतकऱ्यांनी २०.२३ कोटींचा विमा हप्ता भरला आहे. यामध्ये उडदासाठी ५९.२० लाख, मुगासाठी १.१२ कोट, कपाशी ४.३६ कोटी, धान १४,७२४ रुपये, तूर १.११ कोटी, ज्वार १.९३ लाख व सोयाबीनसाठी सर्वाधिक १३.२५ कोटी रुपयांचा प्रीमियम शेतकऱ्यांनी कंपनीकडे भरणा केला आहे.

तालुकानिहाय शेतकरी प्रीमियम अचलपूर तालुक्यात ७०.०७ लाख, अमरावती १.४० कोटी, अंजनगाव सुर्जी १.५६ कोटी, भातकुली १.८४ कोटी, चांदूर रेल्वे १.२४ कोटी, चांदूरबाजार १.०७, चिखलदरा ११.४० लाख, दर्यापूर ३ कोटी, धामणगाव १.२९ कोटी, धारणी २२.७३ लाख, मोर्शी १.५९ लाख, वरूड ४६.५७ लाख, तिवसा १.७३ कोटी व नांदगाव तालुक्यात ४.१८ कोटींचा प्रीमियम शेतकऱ्यांनी भरला.

अधिसूचनेवरील कंपनीचे आक्षेप निकाली काढले आहे. पीक विमा कंपनीने शेतकऱ्यांना विमा परताव्याचा अग्रिम द्यावा, यासाठी कंपनीला पत्र दिले आहे. कृषी आयुक्तालयानेही कंपनीला पत्र दिलेले आहे. - अनिल खर्चान, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.

 

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाFarmerशेतकरी