शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनी कंपन्या तयार करणे गरजेचे !

By admin | Updated: September 7, 2016 00:21 IST

शेतकऱ्यांच्या उत्पादनाला भाव मिळत नाही. शेतकऱ्यांमध्ये संघटन नसल्याने आता शेतकऱ्यांनी कंपन्या तयार करून कृषिमालाची विक्री करण्याची वेळ आली आहे.

अमर हबीब : शेतकरी कायदेविषयक परिषदेतील सूर वरूड : शेतकऱ्यांच्या उत्पादनाला भाव मिळत नाही. शेतकऱ्यांमध्ये संघटन नसल्याने आता शेतकऱ्यांनी कंपन्या तयार करून कृषिमालाची विक्री करण्याची वेळ आली आहे. सुविधा आणि फायदे जोपर्यंत शेतकऱ्यांना मिळणार नाही तोपर्यंत शेतकरी सुखी, समाधानी होणार नाही. जगाचा पोशिंदा जगला पाहिजे, शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करणारे कायदे करून सरकारने केलेले कायदे मोडीत काढले पाहिजे, असे प्रतिपादन किसानपुत्र समितीचे अध्यक्ष अमर हबीब यांनी स्थानिक काठीवाले सभागृहात आयोजित शेतकरी कायदेषियक परिषदेत केले. देशात अन्न पिकविणारा शेतकरी आहे. कारखानदाराला कर्ज दिल्यांनतर बुडीत असले तरी जप्ती केली जात नाही. मात्र शेतकऱ्यावर कर्ज असले तर मानहाणीचे प्रकार घडतात. यातूनच शेतकरी आत्महत्या करतो. कारखानदाराकरिता सिलिंग कायदा नाही. मात्र मातीतून अन्न पिकविणाऱ्या शेतकऱ्याकरिता सिलिंगचा कायदा करून शेती बळकावण्याचे प्रयत्न सरकार करते. राजकीय नेते अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टवर बोलतात. मात्र सिलिंंगच्या विरोधात का कधीच बोलत नाही. शेतकऱ्यांच्या मुळावरच घाव घालण्याचे काम सरकारच करीत असल्याचे आरोपसुध्दा करण्यात येऊन राजकारणात शेतकऱ्यांनी पाय रोवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असेही अमर हबीब यांनी पत्रपरिषदेत सांगितले. अध्यक्षस्थानी विचारवंत शेतकरी संघटनेचे नेते अमर हबीब, उदघाटक सहायक आयकर आयुक्त अभय देवरे, स्वागताध्यक्ष सत्यशोधक फाउंडेशनचे अध्यक्ष मनोहर आंडे, प्रमुख अतिथी म्हणून उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, शल्यचिकित्सक सुधाकर बंदे, शेतकरी नेते दिलीप भोयर, वासुदेव लांडगे, विकास हरडे, प्रमुख वक्ते जनमंचचे अध्यक्ष अनिल किल्लोर, शेतकरी आंदोलक गजानन अमदाबादकर, चंद्रकांत वानखडे, शरद पाटील, अच्युत गंगाणे, समाजप्रबोधनचे अध्यक्ष प्रवीण चौधरी, जायन्टस ग्रुपचे अध्यक्ष नितीन खेरडे आदी उपस्थित होते. शेतकरी विरोधी कायद्यामुळे शेतीमध्ये बंदिस्थता आली आहे. शेतकरी गुलाम होत आहे. जगाचा अन्नदाता पोशिंदा उपाशी असताना दुष्काळासोबत सामना करीत आहे, तरी सरकारचे याकडे दुर्लक्ष असल्याचे विचारवंतांनी आपल्या मार्गदर्शनातून सांगितले. अनिल किल्लोर यांनी शेतकऱ्यांना गळफास ठरलेले कायदे व घटना दुरस्त्या, शेतकरी आंदोलक गजानन अमदाबादकर यांनी शेती व शेतकऱ्यांच्या समस्या व समाधान, तर चंद्रकांत वानखडे यांनी शेतकरी आत्महत्येचे वास्तव, शरद पाटील यांनी शेतकऱ्यांनाा सवलती किती खऱ्या आणि किती खोट्या? या विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून शेतकऱ्यांकरिता हिताचे रक्षण करणारे कायदे करणे गरजेचे असल्याचा सूर व्यासपीठावरून उमटत होता. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते वॉटर कप स्पर्धेमध्ये पारितोषिक पात्र गावाच्या सरपंच, उपसरपंचांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन नितीन ठाकरे यांनी, तर आभार पुरुषोत्तम कळमकर यांनी केले. शेतकरी कायदेविषयक परिषदेकरिता सत्यशोधक फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. (तालुका प्रतिनिधी)