शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

शेतकऱ्यांनी कंपन्या तयार करणे गरजेचे !

By admin | Updated: September 7, 2016 00:21 IST

शेतकऱ्यांच्या उत्पादनाला भाव मिळत नाही. शेतकऱ्यांमध्ये संघटन नसल्याने आता शेतकऱ्यांनी कंपन्या तयार करून कृषिमालाची विक्री करण्याची वेळ आली आहे.

अमर हबीब : शेतकरी कायदेविषयक परिषदेतील सूर वरूड : शेतकऱ्यांच्या उत्पादनाला भाव मिळत नाही. शेतकऱ्यांमध्ये संघटन नसल्याने आता शेतकऱ्यांनी कंपन्या तयार करून कृषिमालाची विक्री करण्याची वेळ आली आहे. सुविधा आणि फायदे जोपर्यंत शेतकऱ्यांना मिळणार नाही तोपर्यंत शेतकरी सुखी, समाधानी होणार नाही. जगाचा पोशिंदा जगला पाहिजे, शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करणारे कायदे करून सरकारने केलेले कायदे मोडीत काढले पाहिजे, असे प्रतिपादन किसानपुत्र समितीचे अध्यक्ष अमर हबीब यांनी स्थानिक काठीवाले सभागृहात आयोजित शेतकरी कायदेषियक परिषदेत केले. देशात अन्न पिकविणारा शेतकरी आहे. कारखानदाराला कर्ज दिल्यांनतर बुडीत असले तरी जप्ती केली जात नाही. मात्र शेतकऱ्यावर कर्ज असले तर मानहाणीचे प्रकार घडतात. यातूनच शेतकरी आत्महत्या करतो. कारखानदाराकरिता सिलिंग कायदा नाही. मात्र मातीतून अन्न पिकविणाऱ्या शेतकऱ्याकरिता सिलिंगचा कायदा करून शेती बळकावण्याचे प्रयत्न सरकार करते. राजकीय नेते अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टवर बोलतात. मात्र सिलिंंगच्या विरोधात का कधीच बोलत नाही. शेतकऱ्यांच्या मुळावरच घाव घालण्याचे काम सरकारच करीत असल्याचे आरोपसुध्दा करण्यात येऊन राजकारणात शेतकऱ्यांनी पाय रोवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असेही अमर हबीब यांनी पत्रपरिषदेत सांगितले. अध्यक्षस्थानी विचारवंत शेतकरी संघटनेचे नेते अमर हबीब, उदघाटक सहायक आयकर आयुक्त अभय देवरे, स्वागताध्यक्ष सत्यशोधक फाउंडेशनचे अध्यक्ष मनोहर आंडे, प्रमुख अतिथी म्हणून उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, शल्यचिकित्सक सुधाकर बंदे, शेतकरी नेते दिलीप भोयर, वासुदेव लांडगे, विकास हरडे, प्रमुख वक्ते जनमंचचे अध्यक्ष अनिल किल्लोर, शेतकरी आंदोलक गजानन अमदाबादकर, चंद्रकांत वानखडे, शरद पाटील, अच्युत गंगाणे, समाजप्रबोधनचे अध्यक्ष प्रवीण चौधरी, जायन्टस ग्रुपचे अध्यक्ष नितीन खेरडे आदी उपस्थित होते. शेतकरी विरोधी कायद्यामुळे शेतीमध्ये बंदिस्थता आली आहे. शेतकरी गुलाम होत आहे. जगाचा अन्नदाता पोशिंदा उपाशी असताना दुष्काळासोबत सामना करीत आहे, तरी सरकारचे याकडे दुर्लक्ष असल्याचे विचारवंतांनी आपल्या मार्गदर्शनातून सांगितले. अनिल किल्लोर यांनी शेतकऱ्यांना गळफास ठरलेले कायदे व घटना दुरस्त्या, शेतकरी आंदोलक गजानन अमदाबादकर यांनी शेती व शेतकऱ्यांच्या समस्या व समाधान, तर चंद्रकांत वानखडे यांनी शेतकरी आत्महत्येचे वास्तव, शरद पाटील यांनी शेतकऱ्यांनाा सवलती किती खऱ्या आणि किती खोट्या? या विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून शेतकऱ्यांकरिता हिताचे रक्षण करणारे कायदे करणे गरजेचे असल्याचा सूर व्यासपीठावरून उमटत होता. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते वॉटर कप स्पर्धेमध्ये पारितोषिक पात्र गावाच्या सरपंच, उपसरपंचांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन नितीन ठाकरे यांनी, तर आभार पुरुषोत्तम कळमकर यांनी केले. शेतकरी कायदेविषयक परिषदेकरिता सत्यशोधक फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. (तालुका प्रतिनिधी)