शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
4
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
5
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
6
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
7
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
8
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
9
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
10
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
11
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
12
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
13
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
14
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
15
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
16
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
17
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
18
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
19
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
20
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न

शेतकऱ्यांना मताधिकार!

By admin | Updated: February 9, 2017 00:03 IST

राज्यात सत्तेत नसले तरी सहकार क्षेत्रातील बहुतांश संस्थावर कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेसचेच बहुमत आहे. यामध्ये भाजपचाही प्रवेश व्हावा,

शिफारस समिती गठित : जिल्हा बँकेत चंचूप्रवेशाचा सत्तापक्षाचा प्रयत्न गजानन मोहोड अमरावतीराज्यात सत्तेत नसले तरी सहकार क्षेत्रातील बहुतांश संस्थावर कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेसचेच बहुमत आहे. यामध्ये भाजपचाही प्रवेश व्हावा, यासाठी शासनाचे प्रयत्न सुरु आहेत. सर्वच शेतकऱ्यांना सोसायटींचे सभासदत्व दिल्यानंतर सहकारात महत्त्वपूर्ण असणाऱ्या बाजार समितींसह जिल्हा बॅँकेच्या निवडणूक प्रक्रियेत शेतकऱ्यांना थेट मताधिकार देण्यात येणार आहे. यामध्ये आवश्यक ती सुधारणा करून शासनाला शिफारस करण्यासाठी समिती गठित करण्यात आली. शेतकऱ्यांना पीककर्ज पुरवठा तसेच अन्य शेतीसाहित्य पुरवठा करण्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. मात्र, जिल्हा बँका प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्थेच्या संघीय संस्था असल्यामुळे याबँकांच्या संचालक मंडळाची सभासद संस्थेमधून निवडणूक घेण्यात येते. मात्र, राज्यातील प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थेमधील सभासद शेतकऱ्यांना अथवा अन्य संस्थांच्या व्यक्तिगत सभासदांना जिल्हा बॅँकेच्या निवडणुकीत थेट मतदानाची संधी उपलब्ध होत नाही, ही बाब लक्षात घेता जिल्हा मध्यवर्ती बॅँकांच्या निवडणूक प्रक्रियेत जिल्ह्यातील सभासद शेतकऱ्यांना थेट मतदानाचा अधिकार देण्याच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या उपविधीमध्ये अथवा महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६०, नियम १९६१ मध्ये आवश्यक सुधारणा करण्यासाठी व शासनाकडे शिफारस करण्यासाठी सहकार विभागाने २ फेब्रुवारीला सहकारी संस्थेचे अप्पर निबंधक शैलेश कोथमिरे यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय समिती गठित करण्यात आली आहे. समितीचा महिनाभरात अहवालअमरावती : ही समिती महिनाभरात शासनाला अहवाल सादर करणार आहे. यापूर्वी बाजार समितींवर आर्थिक उलाढालीच्या निकषांवर दोन ते तीन तज्ज्ञ संचालकांची नियुक्ती शासनाने केली. सहकारात चंचूप्रवेश करण्याचा हा प्रयत्न असल्याचे मानण्यात येते. शेतमालाचे व्यवहार करणाऱ्या बाजार समितीमध्ये शेतकरी हा महत्त्वाचा घटक असल्याने त्याला देखील या निवडणुकीमध्ये मताधिकार मिळावा, यासाठी ज्या शेतकऱ्यांनी सलग तीन वर्ष बाजार समितींमध्ये व्यवहार केलेत, त्यांना मताधिकार देण्याची मागणी समोर आल्याने शासन यावर गांभीर्याने विचार करीत आहे. शासनाच्या याधोरणामुळे सहकारातील सर्वच महत्त्वपूर्ण संस्थांवर शेतकऱ्यांना मताधिकार मिळण्याची शक्यता बळावली आहे. चार लाख शेतकऱ्यांना सोसायटींचे सभासदत्व सर्वच सातबाराधारक शेतकऱ्यांना गावपातळीवरील सोसायटींचे सभासदत्व मिळावे, यासाठी सहकार विभागाद्वारा विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. यामध्ये जिल्ह्यातील चार लाख १५ हजार ८१८ शेतकऱ्यांपैकी चार लाख ८ हजार ९४१ शेतकऱ्यांना सेवा सहकारी सोसायटींचे सभासदत्व देण्यात आले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत याशेतकऱ्यांना सोसायटींमध्ये आपला प्रतिनिधी निवडण्याची संधी उपलब्ध होणार आहे. जिल्हा बॅँक निवडणुकीत घोडेबजाराला लगामशेतकऱ्यांना जिल्हा सहकारी बॅँकेच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार दिल्यास जिल्हा बॅँकेच्या निवडणुकीत विशिष्ट गटाची व उमेदवारांची मक्तेदारी संपुष्टात येणार आहे. सत्तेसाठी घोडबाजार मांडणाऱ्या शक्तींना लगाम घातला जाणार आहे. सहकारातील प्रस्थापित गटांना याचा हादरा बसून जिल्ह्यातील सहकारात नव्या दमाचे अनेक युवा नेतृत्व उदयास येण्याची शक्यता आहे. शेतकरी हा सहकाराचा कणा आहे. जिल्हा बँकेचा महत्त्वाचा घटक असताना शेतकरी मात्र निवडणूक प्रक्रियेपासून दूर आहे. सहकारातील सर्व संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये शेतकऱ्यांना स्थान देण्यात येणार आहे. सहकार समृद्धीसाठी आता शासनाची हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.- निवेदिता चौधरी संचालिका, जिल्हा सहकारी बॅँक.