शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
3
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
4
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
5
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
6
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
7
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
8
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
9
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
10
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
11
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
12
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
13
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
14
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
15
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
19
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
20
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी चार लाख; फवारणी किट पाच हजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2020 05:00 IST

दोन वर्षांपूर्वी यवतमाळ व अमरावती जिल्ह्यात फवारणी करणारे मजूर लक्षणीय संख्येने विषबाधा होऊन दगावले होते. त्यावेळी वातावरण तापले होते. त्यामुळे फवारणी करताना शेतमजुरांना सुरक्षा किट उपलब्ध करण्याची जबाबदारी शेतकऱ्यांवर टाकण्याचा अध्यादेश तत्कालीन सरकारने घेतला. शेतमजुराचा मृत्यू झाल्यास शेतमालाकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होतो.

ठळक मुद्देपुरवठा तोकडा : सांगा, कसे मिळणार शेतमजुरांना संरक्षण ?

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : तणनाशक फवारणी करताना गत दोन वर्षांत झालेले मृत्यू बघता, साडेपाच हजार सुरक्षा किटची आतापर्यंत तरतूद करण्यात आली आहे, तर ३० हजार लक्ष्य ठेवण्यात आले आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांची संख्या ४ लाख १५ हजार ८५८ आहे. त्यांना खरीप व रबी हंगामाच्या कुठल्या ना कुठल्या टप्प्यात ही किट गरजेची ठरणारच. तेव्हा उर्वरित किट उपलब्ध करण्याबाबत वा शेतकऱ्यांनी ती उपलब्ध करून घेण्याबाबत कुठल्या उपाययोजना जिल्हा परिषदेकडे आहेत, हा प्रश्न अनुत्तरित आहे. विशेष म्हणजे, फवारणी करताना शेतमजूर दगावल्यास संबंधित शेतकऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची तरतूद तत्कालीन भाजप-सेना युतीच्या शासनकाळात अंमलात आली आहे.दोन वर्षांपूर्वी यवतमाळ व अमरावती जिल्ह्यात फवारणी करणारे मजूर लक्षणीय संख्येने विषबाधा होऊन दगावले होते. त्यावेळी वातावरण तापले होते. त्यामुळे फवारणी करताना शेतमजुरांना सुरक्षा किट उपलब्ध करण्याची जबाबदारी शेतकऱ्यांवर टाकण्याचा अध्यादेश तत्कालीन सरकारने घेतला. शेतमजुराचा मृत्यू झाल्यास शेतमालाकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होतो. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक ठरणारा हा अध्यादेश रद्द करण्याचा ठराव गुरुवारी जिल्हा परिषदेच्या सभेत सदस्य प्रकाश साबळे, जयंत देशमुख आदींनी मांडला व तो पारित केला.विशेष म्हणजे, एकीकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या ४ लाख १५ हजार ८५८ एवढी आहे. त्यांना जिल्हा परिषद सेस फंडातून अनुदानावर १६६६ फवारणी सुरक्षा किट पुरविले जाणार आहेत. जिल्हा कृषी विभागाकडून फवारणी करणाऱ्या शेतकरी-शेतमजुरांना सुरक्षा किट उपलब्ध करून देण्यासाठी कृषी आयुक्तालय स्तरावरून खासगी कंपनीला जिल्ह्यासाठी नोडल एजन्सी म्हणून नेमले आहे. या कंपनीकडून पाच हजार किटचा सीआरएस फंडातून प्रशिक्षणादरम्यान पुरवठा होत आहे. याशिवाय अन्य सात खासगी कंपन्यांच्या माध्यमातून २४ हजार सुरक्षा किट पुरविण्यासाठी कृषी विभागाने साकडे घातले आहे. तूर्त एकही किट पुरविण्यात आली नाही. एकंदर सुरक्षा किट पुरविण्यासाठी जिल्हा परिषदेने जास्तीत जास्त जिल्हा निधीची शेतकऱ्यांसाठी तरतूद करावी, यासाठी कृषी विभागाचे प्रयत्नही झाले पाहिजेत.खासगी कंपन्यांवर मदारजिल्हा कृषी विभागाने शेतकरी प्रशिक्षणादरम्यान सुरक्षा किट शेतमजुरांना पुरविण्यासाठी एका खासगी कंपनीला नोडल एजन्सी म्हणून नियुक्त केले. या माध्यमातून पाच हजार किट वितरित करण्यात आले. अन्य सात खासगी कंपन्यांद्वारे २४ हजार किट पुरविण्याची बाब अद्याप प्रस्तावातच आहे.तालुकानिहाय शेतकरी संख्यावरूड - ३९२२७, दर्यापूर - ३८६८०, अचलपूर - ३७६१३, चांदूर बाजार - ३७२२२, मोर्शी - ३६०५४, नांदगाव खंडेश्वर - ३४०१९, अमरावती - ३१४९३, भातकुली -३०२२३, अंजनगाव सुर्जी - २९९६७, धामणगाव रेल्वे - २८३५५, तिवसा - २४३८०, चांदूर रेल्वे - २१३६१, धारणी १६२६४, चिखलदरा ११०००पाच लाखांची तरतूद अन् १६६६ किटजिल्हा परिषद कृषी विभागाने फवारणीदरम्यान विषबाधेसारख्या प्रकाराला आळा घालण्यासाठी यंदा जिल्हा निधीत पाच लाखाची तरतूद केली. त्यामधून ५९ सर्कलमध्ये १ हजार ६६६ किट अनुदानावर उपलब्ध केल्या. यात भरीव तरतूद करून शेतकºयांचे हित जोपासू, असे अध्यक्ष बबलू देशमुख यांनी सांगितले.शेतकरी, शेतमजुरांना फवारणीदरम्यान प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी शासनाकडून तरतूद नाही. मात्र, खासगी कंपन्याच्या माध्यमातून किट पुरविण्यात येत आहे. यासोबतच खबरदारीकरिता शेतकरी व शेतमजुरांमध्ये जनजागृती केली जात आहे. किटचा लाभ जास्तीत जास्त मिळावा, यासाठी पाठपुरावा सुरू आहे.- विजय चवाळेजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती