शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

पीक विमाही महागल्याने शेतकरी आर्थिक संकटात

By admin | Updated: June 23, 2015 00:46 IST

नैसर्गिक आपत्ती आणि वाढत्या महागाईमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

अतिरिक्त भुर्दंड : कपाशीच्या हप्त्यात तिप्पट वाढअमरावती : नैसर्गिक आपत्ती आणि वाढत्या महागाईमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. ऐन दुष्काळी परिस्थितीत पीक विम्यासाठी भराव्या लागणाऱ्या प्रतीहेक्टर हप्त्याच्या रकमेतही विमा कंपनीने वाढ केली आहे. कपाशीसाठी सर्वसाधारण विमा हप्त्याचा दर ६.९० टक्क्यांवरुन २१ टक्क्यांपर्यंत म्हणजेच तीनपटीने वाढला आहे. खते, बियाणे व कीटकनाशकांच्या दरवाढीनंतर आता शेतकऱ्यांना पीकविमा हप्त्याच्या दरातही भाववाढीची झळ सोसावी लागणार आहे. कपाशीचा सर्वसाधारण विमा संरक्षणासाठी प्रतीहेक्टर ६.९० टक्के दराने जवळपास १४०० रुपये हप्ता भरावा लागत होता. मात्र आता यामध्ये तीनपट वाढ झाल्याने म्हणजेच २१ टक्के दराने विमा रक्कम भरावी लागणार आहे. कपाशीसाठी बहुभूधारक शेतकऱ्यांना प्रतीहेक्टर सर्वसाधरण हप्ता ४ हजार ७८८ रुपये तर अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना ४ हजार ३०९ रुपये हप्ता भरावा लागणार आहे. १५० टक्क्यांपर्यंत अतिरिक्त विमा संरक्षण हवे असल्यास बहुधारक शेतकऱ्यांना प्रतिहेक्टर ७ हजार १८२ रुपये तर अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना ६ हजार ४६४ रुपये विमा भरावा लागणार आहे. याशिवाय सोयाबीनच्या अतिरिक्त संरक्षणासाठी प्रतिहेक्टर १९ टक्के दरावरुन म्हणजेच ३६ टक्के दराने हप्ता महागला आहे. इतर पिकांना सर्वसाधारण विमा संरक्षणाच्या प्रतिहेक्टर विमा हप्ता दरामध्ये कोणतीही वाढ नसली तरी अतिरिक्त विमा संरक्षणाच्या विमा हप्ता दरात मोठी वाढ झाली आहे. यात भात पिकाचा विमा हप्ता दर १२ टक्क्यांवरुन १५ टक्के खरीप ज्वारीचा हप्ता ८.५० टक्के हप्त्यावरुन २० टक्के बाजरीचा हप्ता १९.५० टक्क्यांवरुन २० टक्के, तुरीचा हपता ९ टक्के दरावरुन तीन पटीपेक्षाही जास्त म्हणजेच ३० टक्के, उडीद पिकाचा प्रतीहेक्टर दर २४ टक्क्यांवरुन २७ टक्के, भूईमुगाचा दर १३ टक्क्यांवरुन १६ टक्के, तिळाचा दर १६ टक्क्यांवरुन १९ टक्के, सूर्यफुलाचा दर ६ टक्क्यांवरुन १८ टक्के वाढला. (प्रतिनिधी)कपाशीसह विविध पिकांचा सर्वसाधारण विमा संरक्षणाचे तसेच अतिरिक्त विमा संरक्षणाचे प्रतीहेक्टर दर माफक असल्याचे आतापर्यंत विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठी होती. मात्र आता विमा हप्ता दर मोठ्या प्रमाणात वाढल्याने शेतकऱ्यांना जास्तीचे पैसे मोजण्याची वेळ आली आहे. यामुळे विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत घट होण्याची शक्यता आहे. - साहेबराव बनसोड, शेतकरी.