शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

सोयाबीन वाळवताना अमरावती जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबे हवालदील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 11:52 IST

पहिल्या पावसात पेरणी साधलेल्या शेतकऱ्यांनी दिवाळीच्या आधी सोयाबीन घरी आणले खरे, मात्र त्यानंतरपासून ते सोयाबीन पायाखाली तुडवताना सर्व कुटुंबीयांचे पाय तुटण्यावर आले आहेत.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांच्या सुट्ट्या गेल्या कामातचफेरे घालून तुटण्यावर आले पाय

धीरेंद्र चाकोलकर।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पहिल्या पावसात पेरणी साधलेल्या शेतकऱ्यांनी दिवाळीच्या आधी सोयाबीन घरी आणले खरे, मात्र त्यानंतरपासून ते सोयाबीन पायाखाली तुडवताना सर्व कुटुंबीयांचे पाय तुटण्यावर आले आहेत. केव्हा एकदा सोयाबीनचा ओलसरपणा कमी होतो आणि यातून सुटका होते, याची सर्वांना प्रतीक्षा लागली आहे.यंदाच्या खरिपात उशिरा पाऊस येऊनही चांगल्या स्थितीत असलेले सोयाबीन परतीच्या पावसाच्या तडाख्यात सापडून सडले. तथापि, सोंगण्याची घाई करून काही जणांनी सोयाबीन घरी आणण्याचा आटापिटा केला. त्यात ते यशस्वी झाले खरे; मात्र दिवाळीच्या आसपास झालेल्या पावसामुळे सोयाबीनची आर्द्रता कायम होती. बाहेर पाऊस कोसळत असल्याने प्रत्येक शेतकऱ्याच्या घरात सोयाबीन पसरले होते.आर्द्रता असल्याने या ढिगाचे तापमान प्रचंड वाढले होते. हे तापमान कमी करण्यासाठी हाता-पायाने सोयाबीन पसरविण्याचे काम सुरू झाले. हे काम साहजिकच शेतकऱ्यांच्या चिमुकल्या मुलांवर आले. दिवाळीच्या सुटीचा आनंद लुटण्याच्या मानसिकतेत असलेल्या मुलांना या कामासाठी हात-पाय झिजवावे लागले.

भारनियमनाची चिंताएरवी ग्रामीण भागात भारनियमनाची चिंता केली जात नाही. तथापि, ओलसर सोयाबीन सुकविण्यासाठी घरात दिवे व पंखे सुरू ठेवण्यासाठी भारनियमनाची चिंता शेतकऱ्यांकडून व्यक्त केली गेली. काही घरांमध्ये कूलर लागले आहेत.मुलांच्या पायांना  आले गोळेघरात पसरविलेले सोयाबीन खाली-वर करण्यासाठी ते तुडविण्याचे काम शेतकरी कुटुंबात मुलांवर आले होते. बाहेर पाऊस कोसळत असल्याने घरात बसण्याशिवाय पर्याय नव्हता. मात्र, घरी त्यांना स्वस्थ बसू न देता सोयाबीनचे काम देण्यात आले. या कामात मुलांच्या पायांना गोळे आले आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरी