शहरं
Join us  
Trending Stories
1
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
2
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
3
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
4
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
5
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
6
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
7
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
8
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
9
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
10
"अजित पवारांनी सांभाळून राहावं, त्यांना बळ देऊ नये"; मनोज जरांगे भडकले, धनंजय मुंडेंबद्दल काय बोलले?
11
दिल्ली ब्लास्ट : 'अल-फलाह'चा नेमका अर्थ काय? युनिव्हर्सिटीचा फाउंडर कोण? सुनावली गेलीये तीन वर्षांची शिक्षा!
12
दिल्ली स्फोट प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; उत्तर प्रदेशातील हापुडमधून डॉ. फारुक ताब्यात...
13
फ्रीचं वायफाय पडेल महागात! सार्वजनिक वाय-फाय वापरणाऱ्यांना गुगलने दिला मोठा इशारा; कनेक्ट कराल तर.. 
14
बदल्याची आग! 'तो' वाद टोकाला गेला, पुतण्याने आईच्या मदतीने काढला काकीचा काटा अन्...
15
पंजाबमध्ये दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश, १० ISI एजंटना अटक; मोठ्या हल्ल्याचा कट रचला होता
16
8th Central Pay Commission : आठव्या वेतन आयोगात या कर्मचाऱ्यांचा समावेश होणार, नवीन नियम जाणून घ्या
17
३२ वर्षांची मुलगी एआयच्या प्रेमात पडली, 'आय लव्ह यु' म्हणाली अन् लग्नगाठ बांधली! VIRAL झाला लग्नाचा व्हिडीओ
18
आम्ही गप्पा मारतो, तर पोलिसांना बोलावून बैठक का मोडतात? बीडमध्ये कत्तीने केले वार
19
दिल्ली स्फोट घडवणाऱ्या दहशतवाद्यांकडे एवढा पैसा आला कुठून? आता सगळ्यांची कुंडली काढणार
20
पगारदार कर्मचाऱ्यांसाठी EPFO ची खास योजना; 'VPF' द्वारे मिळवा FD पेक्षा जास्त सुरक्षित परतावा
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचे डोळे ढगांकडे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 23:51 IST

जूनचा पंधरवडा उलटला आहे. मृगाला १० दिवस झाले आहेत. या कालावधीत जिल्ह्यात अवघ्या ८.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तापमान चाळीसच्या आत आले तरी पेरणीयोग्य पाऊस कुठेही बरसला नसल्याने शेतकऱ्यांचे डोळे ढगांकडे लागले आहेत.

ठळक मुद्देमृगाची हुलकावणी : १० दिवसात ८.५ मिमी पाऊस; पेरण्या लांबल्या, पाणीपुरवठ्याची चिंता

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जूनचा पंधरवडा उलटला आहे. मृगाला १० दिवस झाले आहेत. या कालावधीत जिल्ह्यात अवघ्या ८.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तापमान चाळीसच्या आत आले तरी पेरणीयोग्य पाऊस कुठेही बरसला नसल्याने शेतकऱ्यांचे डोळे ढगांकडे लागले आहेत. चार वर्षांचा दुष्काळ दिला; यंदा तरी लवकर ये रे बाबा, अशी भाबडी अपेक्षा त्यांना वरुणराजाकडून आहे. दुसरीकडे पाणीपातळी वाढून विहिरी, बोअरला पाणीसमस्या काही अंशी सुटेल, असा नागरिकांचा अंदाज कोरड्या गेलेल्या मृगाने चुकविला आहे.जूनच्या दुसºया, तिसºया आठवड्यात साधारणपणे पेरण्या होत असल्या तरी त्यापूर्वी मृगात दोन-तीन पाऊस जाण्याची अपेक्षा असते. तथापि, महिन्याची १७ तारीख आणि मृगाचा अर्धा कालावधी होत असताना, जमीन ओली होण्याइतपत पाऊस कोसळला नाही. वार्षिक सरासरीच्या तुलनेत आतापर्यंत अवघा एक टक्का पावसाची नोंद झाली. पेरणीसाठी आवश्यक असलेला सरासरी ८० मिमी पाऊस झालेला नाही. त्यामुळे जिल्ह्यात कुठेही खरिपाच्या पेरणीचा अद्याप मागमूसही नाही. चार वर्षांपासून दुष्काळ झेलत असलेल्या शेतकºयांनी शेतीची मशागत, बियाणे सज्ज ठेवले असले तरी जमिनीत पुरेशी ओल येईपर्यंत पेरणी न करण्याचा सावध पवित्रा घेतला आहे.जिल्ह्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी ७.२८ लाख हेक्टर क्षेत्रामध्ये खरिपाची पिके घेतली जातात. गतवर्षी ९४ टक्के अर्थात ६.८४ लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी करण्यात आली होती. २०१९-२० या वर्षात एकूण ७ लाख २८ हजार ११२ हेक्टर क्षेत्रापैकी २.९५ लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन व २.२८ लाख हेक्टर क्षेत्रावर कपाशीची पेरणी अपेक्षित आहे. पावसाने आणखी काही काळ प्रतीक्षा करायला लावल्यास शेतकºयांना पीक पेरणी नियोजन बदलावे लागेल.२२ ला पाऊसभारतीय हवामानशास्त्राच्या माहितीनुसार, अमरावतीच्या आसमंतात आभाळ दररोज मिरवित असले तरी उपयुक्त पाऊस २२ जूनपासूनच सुरू होईल.आतापर्यंत असा झाला पाऊस१ जून ते ३० सप्टेंबर या पावसाळ्याच्या कालावधीत जिल्ह्यात ८१४.५ मिमी पाऊस अपेक्षित असतो. १ ते १७ जून या कालावधीत ८२.७ मिमी पाऊस अपेक्षित असतो. प्रत्यक्षात आतापर्यंत केवळ ८.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यात अमरावती तालुका ७.७, भातकुली १८.९, नांदगाव खंडेश्वर ८.१, चांदूर रेल्वे ८.१, धामणगाव रेल्वे १८, तिवसा ५.२, मोर्शी २.७, वरूड ३.६, अचलपूर १७.३, चांदूरबाजार ५.४, दर्यापूर १५.४, अंजनगाव सुर्जी ४, धारणी १.५ व चिखलदरा तालुक्यात १ ते १६ जून या कालावधीत २.६ मिमी पाऊस पडला. गतवर्षी याच कालावधीत एकूण ३९.३ मिमी पावसाची नोंद करण्यात आली होती.अप्पर वर्धात १२.८५ टक्केजिल्ह्यातील सर्वात मोठ्या ऊर्ध्व वर्धा प्रकल्पात १७ जूनअखेर ७२.४७ दशलक्ष घनमीटर अर्थात १२.८५ टक्के जलसाठा शिल्लक आहे. शहानूर प्रकल्पामध्ये १३.९२ दलघमी (३०.२३ टक्के), चंद्रभागा प्रकल्पात ११.५७ दलघमी (२८.०५ टक्के), पूर्णा प्रकल्पात ८.१८ दलघमी (२३.१३ टक्के) व सपन मध्यम प्रकल्पात १५ दलघमी ( ३८.८६ टक्के) उपयुक्त जलसाठा शिल्लक असल्याची नोंद जलसिंचन विभागाने घेतली आहे.