शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

शेतकऱ्यांचे डोळे ढगांकडे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 23:51 IST

जूनचा पंधरवडा उलटला आहे. मृगाला १० दिवस झाले आहेत. या कालावधीत जिल्ह्यात अवघ्या ८.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तापमान चाळीसच्या आत आले तरी पेरणीयोग्य पाऊस कुठेही बरसला नसल्याने शेतकऱ्यांचे डोळे ढगांकडे लागले आहेत.

ठळक मुद्देमृगाची हुलकावणी : १० दिवसात ८.५ मिमी पाऊस; पेरण्या लांबल्या, पाणीपुरवठ्याची चिंता

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जूनचा पंधरवडा उलटला आहे. मृगाला १० दिवस झाले आहेत. या कालावधीत जिल्ह्यात अवघ्या ८.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तापमान चाळीसच्या आत आले तरी पेरणीयोग्य पाऊस कुठेही बरसला नसल्याने शेतकऱ्यांचे डोळे ढगांकडे लागले आहेत. चार वर्षांचा दुष्काळ दिला; यंदा तरी लवकर ये रे बाबा, अशी भाबडी अपेक्षा त्यांना वरुणराजाकडून आहे. दुसरीकडे पाणीपातळी वाढून विहिरी, बोअरला पाणीसमस्या काही अंशी सुटेल, असा नागरिकांचा अंदाज कोरड्या गेलेल्या मृगाने चुकविला आहे.जूनच्या दुसºया, तिसºया आठवड्यात साधारणपणे पेरण्या होत असल्या तरी त्यापूर्वी मृगात दोन-तीन पाऊस जाण्याची अपेक्षा असते. तथापि, महिन्याची १७ तारीख आणि मृगाचा अर्धा कालावधी होत असताना, जमीन ओली होण्याइतपत पाऊस कोसळला नाही. वार्षिक सरासरीच्या तुलनेत आतापर्यंत अवघा एक टक्का पावसाची नोंद झाली. पेरणीसाठी आवश्यक असलेला सरासरी ८० मिमी पाऊस झालेला नाही. त्यामुळे जिल्ह्यात कुठेही खरिपाच्या पेरणीचा अद्याप मागमूसही नाही. चार वर्षांपासून दुष्काळ झेलत असलेल्या शेतकºयांनी शेतीची मशागत, बियाणे सज्ज ठेवले असले तरी जमिनीत पुरेशी ओल येईपर्यंत पेरणी न करण्याचा सावध पवित्रा घेतला आहे.जिल्ह्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी ७.२८ लाख हेक्टर क्षेत्रामध्ये खरिपाची पिके घेतली जातात. गतवर्षी ९४ टक्के अर्थात ६.८४ लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी करण्यात आली होती. २०१९-२० या वर्षात एकूण ७ लाख २८ हजार ११२ हेक्टर क्षेत्रापैकी २.९५ लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन व २.२८ लाख हेक्टर क्षेत्रावर कपाशीची पेरणी अपेक्षित आहे. पावसाने आणखी काही काळ प्रतीक्षा करायला लावल्यास शेतकºयांना पीक पेरणी नियोजन बदलावे लागेल.२२ ला पाऊसभारतीय हवामानशास्त्राच्या माहितीनुसार, अमरावतीच्या आसमंतात आभाळ दररोज मिरवित असले तरी उपयुक्त पाऊस २२ जूनपासूनच सुरू होईल.आतापर्यंत असा झाला पाऊस१ जून ते ३० सप्टेंबर या पावसाळ्याच्या कालावधीत जिल्ह्यात ८१४.५ मिमी पाऊस अपेक्षित असतो. १ ते १७ जून या कालावधीत ८२.७ मिमी पाऊस अपेक्षित असतो. प्रत्यक्षात आतापर्यंत केवळ ८.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यात अमरावती तालुका ७.७, भातकुली १८.९, नांदगाव खंडेश्वर ८.१, चांदूर रेल्वे ८.१, धामणगाव रेल्वे १८, तिवसा ५.२, मोर्शी २.७, वरूड ३.६, अचलपूर १७.३, चांदूरबाजार ५.४, दर्यापूर १५.४, अंजनगाव सुर्जी ४, धारणी १.५ व चिखलदरा तालुक्यात १ ते १६ जून या कालावधीत २.६ मिमी पाऊस पडला. गतवर्षी याच कालावधीत एकूण ३९.३ मिमी पावसाची नोंद करण्यात आली होती.अप्पर वर्धात १२.८५ टक्केजिल्ह्यातील सर्वात मोठ्या ऊर्ध्व वर्धा प्रकल्पात १७ जूनअखेर ७२.४७ दशलक्ष घनमीटर अर्थात १२.८५ टक्के जलसाठा शिल्लक आहे. शहानूर प्रकल्पामध्ये १३.९२ दलघमी (३०.२३ टक्के), चंद्रभागा प्रकल्पात ११.५७ दलघमी (२८.०५ टक्के), पूर्णा प्रकल्पात ८.१८ दलघमी (२३.१३ टक्के) व सपन मध्यम प्रकल्पात १५ दलघमी ( ३८.८६ टक्के) उपयुक्त जलसाठा शिल्लक असल्याची नोंद जलसिंचन विभागाने घेतली आहे.