शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
4
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
5
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
7
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
8
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
10
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
11
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
12
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
13
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
14
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
15
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
16
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
17
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
18
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
19
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
20
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...

शेतकऱ्यांचे डोळे ढगांकडे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 23:51 IST

जूनचा पंधरवडा उलटला आहे. मृगाला १० दिवस झाले आहेत. या कालावधीत जिल्ह्यात अवघ्या ८.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तापमान चाळीसच्या आत आले तरी पेरणीयोग्य पाऊस कुठेही बरसला नसल्याने शेतकऱ्यांचे डोळे ढगांकडे लागले आहेत.

ठळक मुद्देमृगाची हुलकावणी : १० दिवसात ८.५ मिमी पाऊस; पेरण्या लांबल्या, पाणीपुरवठ्याची चिंता

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जूनचा पंधरवडा उलटला आहे. मृगाला १० दिवस झाले आहेत. या कालावधीत जिल्ह्यात अवघ्या ८.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तापमान चाळीसच्या आत आले तरी पेरणीयोग्य पाऊस कुठेही बरसला नसल्याने शेतकऱ्यांचे डोळे ढगांकडे लागले आहेत. चार वर्षांचा दुष्काळ दिला; यंदा तरी लवकर ये रे बाबा, अशी भाबडी अपेक्षा त्यांना वरुणराजाकडून आहे. दुसरीकडे पाणीपातळी वाढून विहिरी, बोअरला पाणीसमस्या काही अंशी सुटेल, असा नागरिकांचा अंदाज कोरड्या गेलेल्या मृगाने चुकविला आहे.जूनच्या दुसºया, तिसºया आठवड्यात साधारणपणे पेरण्या होत असल्या तरी त्यापूर्वी मृगात दोन-तीन पाऊस जाण्याची अपेक्षा असते. तथापि, महिन्याची १७ तारीख आणि मृगाचा अर्धा कालावधी होत असताना, जमीन ओली होण्याइतपत पाऊस कोसळला नाही. वार्षिक सरासरीच्या तुलनेत आतापर्यंत अवघा एक टक्का पावसाची नोंद झाली. पेरणीसाठी आवश्यक असलेला सरासरी ८० मिमी पाऊस झालेला नाही. त्यामुळे जिल्ह्यात कुठेही खरिपाच्या पेरणीचा अद्याप मागमूसही नाही. चार वर्षांपासून दुष्काळ झेलत असलेल्या शेतकºयांनी शेतीची मशागत, बियाणे सज्ज ठेवले असले तरी जमिनीत पुरेशी ओल येईपर्यंत पेरणी न करण्याचा सावध पवित्रा घेतला आहे.जिल्ह्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी ७.२८ लाख हेक्टर क्षेत्रामध्ये खरिपाची पिके घेतली जातात. गतवर्षी ९४ टक्के अर्थात ६.८४ लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी करण्यात आली होती. २०१९-२० या वर्षात एकूण ७ लाख २८ हजार ११२ हेक्टर क्षेत्रापैकी २.९५ लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन व २.२८ लाख हेक्टर क्षेत्रावर कपाशीची पेरणी अपेक्षित आहे. पावसाने आणखी काही काळ प्रतीक्षा करायला लावल्यास शेतकºयांना पीक पेरणी नियोजन बदलावे लागेल.२२ ला पाऊसभारतीय हवामानशास्त्राच्या माहितीनुसार, अमरावतीच्या आसमंतात आभाळ दररोज मिरवित असले तरी उपयुक्त पाऊस २२ जूनपासूनच सुरू होईल.आतापर्यंत असा झाला पाऊस१ जून ते ३० सप्टेंबर या पावसाळ्याच्या कालावधीत जिल्ह्यात ८१४.५ मिमी पाऊस अपेक्षित असतो. १ ते १७ जून या कालावधीत ८२.७ मिमी पाऊस अपेक्षित असतो. प्रत्यक्षात आतापर्यंत केवळ ८.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यात अमरावती तालुका ७.७, भातकुली १८.९, नांदगाव खंडेश्वर ८.१, चांदूर रेल्वे ८.१, धामणगाव रेल्वे १८, तिवसा ५.२, मोर्शी २.७, वरूड ३.६, अचलपूर १७.३, चांदूरबाजार ५.४, दर्यापूर १५.४, अंजनगाव सुर्जी ४, धारणी १.५ व चिखलदरा तालुक्यात १ ते १६ जून या कालावधीत २.६ मिमी पाऊस पडला. गतवर्षी याच कालावधीत एकूण ३९.३ मिमी पावसाची नोंद करण्यात आली होती.अप्पर वर्धात १२.८५ टक्केजिल्ह्यातील सर्वात मोठ्या ऊर्ध्व वर्धा प्रकल्पात १७ जूनअखेर ७२.४७ दशलक्ष घनमीटर अर्थात १२.८५ टक्के जलसाठा शिल्लक आहे. शहानूर प्रकल्पामध्ये १३.९२ दलघमी (३०.२३ टक्के), चंद्रभागा प्रकल्पात ११.५७ दलघमी (२८.०५ टक्के), पूर्णा प्रकल्पात ८.१८ दलघमी (२३.१३ टक्के) व सपन मध्यम प्रकल्पात १५ दलघमी ( ३८.८६ टक्के) उपयुक्त जलसाठा शिल्लक असल्याची नोंद जलसिंचन विभागाने घेतली आहे.