शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
2
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
3
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
4
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
5
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
6
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
7
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
8
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
9
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
10
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
11
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
12
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
13
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
14
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
15
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
16
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
17
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
18
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
19
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
20
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल

भांडवलशाही इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांमुळे शेतकऱ्यांचा घात

By admin | Updated: February 7, 2017 00:14 IST

भांडवलशाहीला शेतकऱ्यांच्या जमिनी हव्या आहेत. शेतकरी त्यांच्या जमिनी देणार नाहीत, म्हणून त्यांच्या शेतमालाला भावच दिला जात नाही.

सदानंद देशमुख : शब्दगंध साहित्य संमेलनाचे शानदार उद्घाटनचांदूररेल्वे : भांडवलशाहीला शेतकऱ्यांच्या जमिनी हव्या आहेत. शेतकरी त्यांच्या जमिनी देणार नाहीत, म्हणून त्यांच्या शेतमालाला भावच दिला जात नाही. त्यांची शेती तोट्यात जाईल, असेच राजकारण सुरू आहे. हे सर्व स्वातंत्र्यापासून सुरू आहे. आज भांडवलशाही, इलेक्ट्रॉनिक्स माध्यमे व व्यवस्था शेतकऱ्यांचा घात करीत आहे, असे प्रतिपादन साहित्यिक सदानंद देशमुख यांनी केले. ते चांदूरेल्वे येथील कर्मयोगी गाडगेबाबा साहित्य नगरी जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, चांदूररेल्वे येथे आयोजित पाचव्या विदर्भस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष म्हणून अध्यक्षीय भाषणादरम्यान ते बोलत होते. उद्घाटक शिवाजी महाविद्यालय, अमरावतीचे मास कम्यूनिकेशन विभागप्रमुख कुमार बोबडे, प्रमुख अतिथी म्हणून वीरेंद्र जगताप, यवतमाळ आकाशवाणीचे उद्घोषक प्रमोद बाविसकर, उद्घोषक मंगला माळवे, कार्यक्रम अधिकारी जयंत शेटे व नगराध्यक्ष शिट्टू ऊर्फ नीलेश सूर्यवंशी व शब्दगंध परिषदेचे अध्यक्ष कृष्णकुमार पाटील आदी उपस्थित होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात झाली. यावेळी शब्दगंध साहित्य आणि सांस्कृतिक परिषदेचे माजी अध्यक्ष हरगोविंद वानरे, मनोहर बाविसकर व सदस्य योगी नाईक यांना सामूहिक मौन श्रद्धांजली वाहण्यात आली. उद्घाटक कुमार बोबडे यांनी आजची प्रसारमाध्यमे भांडवलदारांनी विकत घेतली आहेत. आता ‘फोर जी’चा जमाना आला असून, राजकारणही ‘जी’मय झाले आहे. त्यांना सर्वसामान्यांच्या व्यथा व वेदनेशी काही घेणे देणे नाही, असे सांगीतले. आ.वीरेंद्र जगताप यांनी साहित्यातून समाजातील खरे व्यथा व दु:ख मांडले गेले पाहिजे, असे सांगितले. प्रमोद बाविस्कर यांनी संत ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, रामदास, एकनाथ यासह अनेक संतांनी ओवी, अभंग, भारूड यातून दहा लाखांच्यावर काव्याची निर्मिती करून ते लोकांपर्यंत पोहचविल्याचे सांगीतले. स्वागताध्यक्ष नगराध्यक्ष शिट्टू सूर्यवंशी यांनी आपले विचार मांडले. यावेळी संमेलन अध्यक्ष सदानंद देशमुख, आ. वीरेंद्र जगताप, कुमार बोबडे, प्रमोद बाविस्कर, मंगला माळवे यांचा गौरव करण्यात आला. प्रास्ताविक शब्दगंध साहित्य व सांस्कृतिक परिषदचे अध्यक्ष कृष्णकुमार पाटील यांनी, संचालन प्रसेनजित तेलंग व आभार रवींद्र मेंढे यांनी मानले. कार्यक्रमासाठी शब्दगंध साहित्य आणि सांस्कृतिक परिषदेचे कृष्णकुमार पाटील, प्रशांत ठाकरे, नानासाहेब डोंगरे, रवींद्र मेंढे, खुशाल गुल्हाने प्रमोद भागवत, राजीव अंबापुरे, संजय चौधरी, प्राचार्य विश्वास दामले, दीपक सोळंके, अमोल गवळी, विवेक राऊत, निशा जोशी, कविता कटकतलवारे, गोकुल राय, प्रतापसिंह खंडार, उज्वल पंडेकर, भूषण नाचवणकर, अजय वाघ, राहुल तायडे, धीरज जवळकर, दीपिका वाजपेयी, अमोल म्हसतकर, अनुश्री चौधरी, शिवश्री चौधरी, अनिल वाडेकर यांनी प्रयत्न केलेत. (तालुका प्रतिनिधी)