शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

ऐन दिवाळीत शेतकरी संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 01:31 IST

ऐन दिवाळीच्या तोंडावर आलेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील सोयाबीन, कपाशी, उडीद, तूर, संत्रा पालेभाज्या आदी पिके नेस्तनाबूत झाले. या नुकसानामुळे शेतकरी राजा आर्थिक संकटात सापडला आहे. एकीडके दिवाळी, तर दुसरीकडे पिकांचे मोठ्या प्रमाणात झालेले नुकसान यामुळे हाता-तोंडाशी आलेली पिके गेल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

ठळक मुद्देनुकसानभरपाईची मागणी : युवा स्वाभिमानचे निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दिवाळी सणाला प्रारंभ होताच अवकाळी पावसाचे दमदार आगमन झाल्यामुळे जिल्हाभरात शेतीपिकांचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे सोयाबीन, कापूस, संत्रा व अन्य पिकांचे तातडीने पंचनामे करून नुकसानभरापाई देण्यात यावी, अशी मागणी गुरूवार, ३१ आॅक्टोबर रोजी युवा स्वाभिमान पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनाव्दारे अपर जिल्हाधिकारी संजय पवार यांच्यामार्फत शासनाकडे केली आहे.ऐन दिवाळीच्या तोंडावर आलेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील सोयाबीन, कपाशी, उडीद, तूर, संत्रा पालेभाज्या आदी पिके नेस्तनाबूत झाले. या नुकसानामुळे शेतकरी राजा आर्थिक संकटात सापडला आहे. एकीडके दिवाळी, तर दुसरीकडे पिकांचे मोठ्या प्रमाणात झालेले नुकसान यामुळे हाता-तोंडाशी आलेली पिके गेल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. सलग तीन-चार वर्षांपासून नापिकीने धाराशाही पडलेल्या शेतकऱ्यांना सावरण्याकरिता या सर्व नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून शासनाने ५० हजार रुपये भरपाई द्यावी, अशी मागणी युवा स्वाभिमानने केली आहे. निवेदन देताना जिल्हाध्यक्ष राजू रोडगे, आशिष कावरे, मंगेश इंगोले, उमेश ढोणे, अमोल पवार, प्रवीण पवार, मधुकर जाधव, रामेश्र्वर सरडे, विजय पिंपळक व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती