शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

जिल्हा परिषदेच्या बजेटमध्ये शेतकरीच केंद्रस्थानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2022 05:00 IST

जिल्ह्याचे मिनीमंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या  जिल्हा परिषदेचा  २०२१ - २२  चा २४  कोटी ४४ लाख ८४  हजार ३०४ रुपयांचा  सुधारित,  तर सन २०२२ - २३चा १९  कोटी २२  लाख ६९ हजार ८४०  रुपयांचा मूळ अर्थसंकल्प मंगळवार, १५  मार्च रोजी अर्थ व आरोग्य समितीचे सभापती बाळासाहेब हिंगणीकर यांनी विशेष  सभेत सादर केला. हा अर्थसंकल्प एकमताने सभागृहाने  मंजूर केला.

जितेंद्र दखनेलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: जिल्ह्याचे मिनीमंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या  जिल्हा परिषदेचा  २०२१ - २२  चा २४  कोटी ४४ लाख ८४  हजार ३०४ रुपयांचा  सुधारित,  तर सन २०२२ - २३चा १९  कोटी २२  लाख ६९ हजार ८४०  रुपयांचा मूळ अर्थसंकल्प मंगळवार, १५  मार्च रोजी अर्थ व आरोग्य समितीचे सभापती बाळासाहेब हिंगणीकर यांनी विशेष  सभेत सादर केला. हा अर्थसंकल्प एकमताने सभागृहाने  मंजूर केला.जिल्हा परिषदेच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात आयोजित अर्थसंकल्पीय सभेच्या अध्यक्षस्थानी अध्यक्ष बबलू देशमुख हे होते. यावेळी उपाध्यक्ष विठ्ठल चव्हाण, सभापती  सुरेश निमकर, दयाराम काळे, पूजा आमले, सीईओ अविश्यांत पंडा, मुख्य लेखा व वित्त अधिकारी चंद्रशेखर खंडारे, ॲडिशनल सीईओ श्रीराम कुलकर्णी, सदस्य प्रताप अभ्यंकर, महेंद्र गैलवार, सुहासिनी ढेपे, शरद मोहोड, दत्ता ढोमणे आदींसह सदस्य व खातेप्रमुख उपस्थित होते. प्रारंभी सभापती हिंगणीकर यांनी बजेटच्या अनुषंगाने अर्थसंकल्पीय मनोगत व्यक्त केल्यानंतर सभेत सन २०२२ - २३च्या सुमारे १९ कोटी  २२ लाख ६९  हजार ८४० रुपयांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली. विशेष म्हणजे गतवर्षीच्या तुलनेत यंदा अर्थसंकल्पात ५ कोटीने वाढ झाली आहे.  यंदा महिला व बालकल्याण, समाज कल्याण, कृषी, शिक्षण आरोग्य आणि वैयक्तिक लाभाच्या योजना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा सौंदर्यीकरणासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे.  नवीन योजना न राबविता जुन्या योजनाच प्रभावीपणे राबवून ग्रामीण भागाचा कायापालट करण्याचा संकल्प सत्ताधारी पक्षाने  सत्तेच्या शेवटच्या विशेष सभेत केला आहे. पालकमंत्री यशोमती ठाकूर  यांच्या माध्यमातून गत पाच वर्षांच्या तुलनेत ग्रामीण भागाच्या विकासासाठी  जवळपास ३५० कोटीचा निधी आणून विकासकामे व योजना ग्रामीण भागात राबविण्यात आल्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख यांनी सभागृहात सांगितले.यावेळी प्रताप अभ्यंकर, प्रकाश साबळे, संजय घुलक्षे, सुहासिनी ढेपे आदी सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या अखेरच्या सभेत आपले अनुभवाचे व कौतुकाचे मनोगत व्यक्त केले. 

उत्पन्नावर आधारित अर्थसंकल्प

झेडपीचे उत्पन्नाचे स्त्रोत मर्यादीत आहेत. प्रामुख्याने मुद्रांक शुल्क, स्थानिक उपकर, वाढीव उपकर, साक्षेप अनुदान, वन अनुदान आदी मार्गाने  प्राप्त होते. यामधून मागासवर्गीयांकरिता २० टक्के, महिला व बालकल्याणकरिता १० टक्के, पाणीपुरवठा  व देखभाल दुरूस्तीसाठी २० टक्के आणि दिव्यांग व शिक्षणाकरिता प्रत्येकी ५ टक्के देणे आवश्यक आहे. त्यासाठीही तरतूद केली आहे

 

टॅग्स :zpजिल्हा परिषद