शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

कृषिमंत्र्यांच्या जिल्ह्यातील शेतकरी पीक कर्जापासून वंचित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 1:25 PM

सलग दुष्काळ, नापिकी यामुळे गंभीर आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात देणारा खरीप कर्ज वितरण हंगाम बँकांनी अवघ्या ३२ टक्क्यांवर गुंडाळून टाकला.

ठळक मुद्दे३२ टक्क्यांवर गुंडाळला खरीप हंगाम११४५ कोटींचे कर्जवाटप झालेच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सलग दुष्काळ, नापिकी यामुळे गंभीर आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात देणारा खरीप कर्ज वितरण हंगाम बँकांनी अवघ्या ३२ टक्क्यांवर गुंडाळून टाकला. शेतकऱ्यांना पीक कर्जापासून वंचित ठेवणारी, शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळणारी ही विदारक स्थिती राज्याचे कृषिमंत्री अनिल बोंडे यांच्या जिल्ह्यातील आहे.यंदाच्या हंगामात बँकांना १६८५ कोटी रुपयांचे लक्ष्यांक देण्यात आले होते. त्यापैकी अवघे ५४२ कोटी ८८ लाख रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले. १,१४५ कोटींचे कर्जवाटप बँकांनी केलचे नाही. शेतकऱ्यांना मदत न करण्याच्या या भूमिकेबाबत बँकांना राज्याचे कृषिमंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल बोंडे यांनी ना जाब विचारला, ना कारवाईचे आदेश दिले.अटी-शर्तींच्या जाचक अटींमुळे हजारो शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत. नापिकी कायम आहे. शेतकरी आत्महत्यांचा सिलसिला सुरूच आहे. अशा स्थितीत आवर्जून मदत करण्याऐवजी बँकांनी कर्जवाटपात हात आखडता घेतल्याने शेतकऱ्यांसमोरील मार्गच बंद करण्यात आले आहेत. मुळात कर्जवाटपाची प्रक्रिया उशिरा म्हणजे जूनअखेर आरंभली गेली. ऑगस्टअखेर ती थांबविली गेली. यंदाच्या खरिपासाठी जिल्ह्यातील बँकांना १,६८,५०० शेतकरी खातेदारांना १,६८५ कोटींच्या कर्जवाटपाचे लक्ष्यांक असताना सद्यस्थितीत ४९,०६६ शेतकऱ्यांना ५४२ कोटी ८८ लाखांचे कर्जवाटप केले आहे. यामध्ये सर्वाधिक शेतकरी खातेदार असलेल्या जिल्हा बँकेनेदेखील शेतकऱ्यांची निराशा केली. या बँकेला ९२ हजार शेतकऱ्यांना ५३० कोटींच्या कर्जवाटपाचे लक्ष्यांक असताना, २१,३८० शेतकऱ्यांना १६६.५३ कोटींचे कर्जवाटप केले. ही टक्केवारी ३१ इतकी आहे. राष्ट्रीयीकृत बँकांच्या १,६६,५५७ सभासदांना ११४०.५० कोटींच्या कर्जवाटपाचे लक्ष्यांक असताना २७,२२५ शेतकऱ्यांना ३७१.३२ कोटींचे कर्जवाटप केले. ही टक्केवारी ३३ आहे. ग्रामीण बँकांना २,००० शेतकऱ्यांना १४.५० कोटींच्या कर्जवाटपाचे लक्ष्यांक असताना, ४६१ शेतकऱ्यांना ५.०२ कोटींचे कर्जवाटप केले. ही टक्केवारी ३५ आहे.साप्ताहिक बैठकीचा फार्सकर्जवाटपाचा टक्का वाढावा, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली दर आठवड्याच्या मंगळवारी पीक आढावा बैठक घेण्यात आली. मात्र, कर्जवाटपाचा टक्का अखेरपर्यंत वाढलाच नाही. पालकमंत्री अनिल बोंडे अन् जिल्हाधिकारी शैलेश नवाल केवळ इशारे देत राहिले. कारवाई करण्याचे धाडस कुणीच दाखविलेच नाही. त्यामुळेच बँकांचे फावले. कर्जवाटपाचा टक्का माघारला अन् साप्ताहिक बैठकी दिशाभूल करणाऱ्या  ठरल्या. गावनिहाय मेळावे आदी प्रकार केवळ फार्स ठरले आहेत.हंगामअखेर बँकनिहाय कर्जवाटपअलाहाबाद बँकद्वारे २.६७ कोटी, आंध्रा बँक १.१३ कोटी, बँक ऑफ बडोदा ३.२५ कोटी, बँक ऑफ इंडिया ९.४४ कोटी, बँक ऑफ महाराष्ट्र ६७.९७ कोटी, कॅनरा बँक ३.९६ कोटी, सेंट्रल बँक ऑफ इंडिया ६७.९६ कोटी, कार्पोरेशन बँक १७ लाख, देना बँक १०.३२ कोटी, आयडीबीआय २.८५ कोटी, इंडियन बँक ४.५१ कोटी, इंडियन ओव्हरसीज बँक ३.४९ कोटी, पंजाब नॅशनल बँक ३.७२ कोटी, एसबीआय १३८.८५ कोटी, सिंडिकेट बँक ११ लाख, युको बँक २.१३ कोटी, युनियन बँक ऑफ इंडिया १४.८३ कोटी, विजया बँक ११ लाख, अ‍ॅक्सीस बँक ३.९३ कोटी, एचडीएफसी २१.०३ कोटी, आयसीआयसीआय १०.८५ कोटी, रत्नाकर बँक ४० लाख व विदर्भ कोकण ग्रामीण बँकद्वारे ५.०२ कोटींचे वाटप करण्यात आले.त्या कारवाईची आजही चर्चातत्कालीन जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांची पीक कर्जाबाबतची दक्षता परिणामकारक होती. वारंवार दिलेल्या तंबीला न जुमानणाऱ्या बँकांची जिल्हाधिकारी कार्यालयातील सात बँक खाती एका झटक्यात त्यांनी बंद करवून या मुजोर बँकांना वठणीवर आणले होते. आता खुद्द कृषिमंत्रीच पालकमंत्री असताना शेतकरी नागावला जात असताना त्या कारवाईची अनेकांना आवर्जून आठवण येते.लक्ष्यांक हा सात लाख हेक्टरसाठी नाबार्डने दिलेला आहे. प्रत्यक्षात सर्वच शेतकरी पीककर्ज घेत नाहीत, त्यामुळे झालेले वाटप जवळपास ८० टक्के म्हणता येईल. अनेक शेतकऱ्यांनी कर्जाचे पुनर्गठन केलेले नाही, काही बँकांनी प्रामुख्याने जिल्हा बँकेने शेतकऱ्यांना सहकार्य केलेले नाही.अनिल बोंडे, कृषिमंत्री

टॅग्स :agricultureशेती